शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
2
सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
3
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
4
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
5
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
6
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
7
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
8
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
9
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
10
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
11
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
12
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
13
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
14
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
15
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
16
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
17
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
18
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

उद्धव ठाकरे व राहुल गांधींना शेतीतील काय समजते? ते विरोधच करणार; नारायण राणेंचा प्रहार

By देवेश फडके | Published: January 07, 2021 3:15 PM

केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार; भाजप नेते नारायण राणे यांचा घणाघात

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना शेतीमधील काय कळते? नारायण राणेंचा सवालशेतकऱ्यांचे आंदोलन राजकीय, त्यात समेट घडून येणार नाही : नारायण राणेंचा दावाकेंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांचा हिताचा : नारायण राणेंचे मत

कणकवली : केंद्रीय कृषी कायदा शेतकऱ्यांसाठी हिताचा आहे. नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांवरील बहुतांश बंधने काढून टाकण्यात आली आहेत. या केंद्र सरकारचे काही चुकलेले नाही. दिल्ली आणि अन्य ठिकाणी सुरू असलेली आंदोलने ही राजकीय आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शेतीमधील काय समजते? ते या कायद्याला विरोधच करणार, अशी जोरदार टीका भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी केली. कणकवली येथे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीदरम्यान ते बोलत होते. 

केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यांच्या नारायण राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. कृषी कायद्याच्या समर्थनार्थ कणकवली येणे आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार रविंद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित होते. ''मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत कृषी विधेयक सादर करण्यात आले तेव्हा त्यावर चांगली चर्चा झाली. विरोधकांपैकी कुणीही कृषी विधेयकाला विरोध दर्शवला नाही. याउलट अनेक विरोधक सदस्यांनी या विधेयकाचे कौतुकच केले. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसला जे जमलं नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. काँग्रेसला संधी असून, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही केले नाही. आता विरोध करताहेत. आंदोलन करताहेत. शेतकऱ्यांवर बंधने लादणारे कायदे व नियम मोडीत काढण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले'', असे नारायण राण यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, शेतकरी या देशातील प्रमुख घटक आहे. शेतकऱ्यांना सबळ आणि आर्थिक आघाडीवर समृद्ध करणे, कष्टकऱ्याला केलेल्या श्रमातून फायदा मिळवून देणे, या दृष्टिकोनातून कृषी कायदा तयार करण्यात आला आहे, असे नारायण राणे यांनी यावेळी नमूद केले. आपला शेतकरी बांधव कष्टाने जे पिकवतो, उत्पादन घेतो. त्याचा जास्त मोबदला मिळेल, अशा ठिकाणी त्यांनी माल विकावा. योग्य मोबदला मिळालाचे समाधान शेतकऱ्याला लाभले पाहजे. माल कुठे विकायचा? कसा विकायचा? दलालांमार्फत विकायचा का? कष्टाचे पैसै मिळाले नाहीत, तर तोट्यात जाऊन विकायचा? अशी बंधने कृषी कायद्यामुळे दूर होणार आहेत. ही सर्व बंधने काढून टाकली तर मग काय चुकले? का आंदोलने केली जात आहेत? ही आंदोलने राजकीय असून, यात समेट घडून येईल, असे मला वाटत नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शेतीमधील काय समजते आणि शेतकऱ्यांना पाठिंबा द्यायला निघाले आहेत. आंदोलक शेतकरी ठराविक राज्यातील आहेत. आंदोलन करणारे बहुतांश दलाल आहेत, असा आरोप नारायण राणे यांनी यावेळी केला.

 

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे Farmer strikeशेतकरी संपRahul Gandhiराहुल गांधीUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस