शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

राज्य शासनाच्या मुद्रांक अभय योजनेचे नेमके फायदे काय?, जाणून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2024 16:21 IST

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३-२४ राज्य सरकारकडून सध्या राबवण्यात येत आहे.

महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३-२४ राज्य सरकारकडून सध्या राबवण्यात येत आहे. या योजनेत शासनाकडून प्रथमच दंडाच्या रकमेबरोबर मुद्रांक शुल्कात देखील सूट देण्यात आली आहे. त्यामुळे व्यक्ती आणि संस्थांना दिला मिळालेला आहे. सदर योजनेत राज्यातील विविध दस्तऐवजांनी मुद्रांक शुल्क आणि वडामध्ये सूट प्रदान करण्यासाठी केली आहे. चकीत मुद्धाक शुल्काचा बोजा कमी होत असल्याने अपनेला मोठा दिलासा मिळाला आहे.

अभय योजनेचे उद्दीष्ट व परिणाम:

वस्तू आणि सेवा करानंतर मुद्रांक शुल्क हा महाराष्ट्र शासनाचा दुसरा सर्वोच्च महसूल स्त्रोत आहे. महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क अभय योजना लागू केल्याने मुद्रांक शुल्क थकीत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात निष्पादित दस्त व नोंदणीसाठी संबंधित निबंधकांकडे दाखल होणारे दस्त यावर मुद्रांक अधिनियम १९५८ खाली मुद्रांक शुल्क आकारणी केली जाते. निष्पादित नोंदणी झालेल्या दस्तांची लेखा परिक्षक/महालेखापाल पथकाद्वारे तपासणी केली जाते. त्यात कमी मद्रांक शुल्क भरल्याची बाब निदर्शनास येते. अशा कमी मुद्रांकित दस्तामध्ये अडकलेल्या मुद्रांक शुल्काची व त्यावरील दंडाची वसुली करण्यात येते. अशा प्रकारच्या दस्तांची निर्गती होण्यासाठी व शासनाच्या महसूली उत्पनात वाढ होण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ लोकहितास्तव लागू करण्यात आली आहे. 

अभय योजनेत पहिल्या गटातील दस्त (१९८० ते २००० कालावधीत निष्यादित) योजनेच्या पहिल्या तप्प्यात (२९ फेब्रुवारी, २०२४ पर्यंत सादर केल्यास जर थकीत मुद्रांक शुल्क १ लाखाच्या आत असेल तर देय मुद्रांक शुल्क व दंडाची रक्कम संपूर्णपणे (१००%) माफ होईल. तर देय मुद्रांक शुल्लक १ लाखापेक्षा जास्त असेल तर देय मुद्रांक शुल्काच्या रकमेत ५० टक्के तर दंडाच्या रकमेत १०० टक्के सूट मिळेल.

या व्यतिरिक्त दुसऱ्या गटातील दस्त (२००१ ते २०२० कालावधीत निष्पादित) दस्तऐवजांसाठी देय मुद्रांक शुल्कावर २५ टक्क्यांपर्यंत आणि दंडामध्ये ९० टक्क्यांपर्यंत सूट/माफी (जास्तीत जास्त देय रु. २५ लाख) सूट मिळेल. अशा प्रकारे अभय योजना दस्त निष्पादन कालावधी व अभय योजनेमध्ये अर्ज करण्याच्या तारखेचा कालावधी यावर आधारित असून त्याप्रमाणे योजनेचा लाभ कमी अधिक प्रमाणात मिळू शकतो.

महाराष्ट्र अभय योजना अंतर्गत मुद्रांक शुल्कात सूट मिळण्यासाठी कोणते दस्तऐवज पात्र आहेत?

अभय योजनेत दिनांक १ जानेवारी, १९८० ते ३१ डिसेंबर, २००० आणि १ जानेवारी, २००१ से २१ डिसेंबर, २०२० दरम्यान निष्पादित केलेल्या दस्तऐवजांसाठी लागू आहे. सदर दस्ताने प्रकार दिनाक ७ डिसेंबर, २०२३ रोजीच्या शासन आदेशाच्या परिशिष्टात नमूद केले आहेत.

-रमेश प्रभू, गृहनिर्माण अभ्यासक (rsprabhu13@gmail.com)

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMaharashtraमहाराष्ट्रRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदे