शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

भाकरी आधी फिरविली अन् पुन्हा...; शरद पवारांनी निर्णय फिरविण्याची ३ कारणे कोणती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 06:49 IST

गेल्या तीन दिवसांत झालेल्या वेगवान घडामोडींनंतर आता त्यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचे ठरविले आहे.

मुंबई - शरद पवार यांनी २ मे रोजी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा परत घेत पदावर राहणे पसंत का केले असेल याविषयी आता विविध तर्क दिले जात आहेत. भाकरी फिरविण्याची सुरुवात स्वत:पासून करण्याची घोषणा पवार यांनी केली खरी; पण ती तीन दिवसांतच त्यांनी मागे घेतली. या निर्णयाने पवार यांनी काय साधले अन् काय गमावले, याची चर्चाही सुरू झाली आहे. 

नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, भाकरी फिरवली नाही तर ती करपते, असे विधान पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबईतील मेळाव्यात अलीकडेच केले होते. नवीन नेतृत्वाला संधी देणार म्हणजे पवार काय करणार? जयंत पाटील, अजित पवार या ओल्ड गार्डस्ऐवजी नवीन चेहरे समोर आणणार का? या चर्चेला ऊत आला होता. मात्र २ मे रोजी त्यांनी स्वत:च पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून जबरदस्त धक्का दिला.

प्रस्थापितांऐवजी नवीन चेहऱ्यांना  मिळणार संधी? गेल्या तीन दिवसांत झालेल्या वेगवान घडामोडींनंतर आता त्यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचे ठरविले आहे. पक्षाला उत्तराधिकारी देण्यासह संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर आपला भर असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ पक्षातील प्रस्थापित नेत्यांऐवजी ते आता नवीन चेहऱ्यांना पुढे आणतील, असे मानले जात आहे. 

शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याची ३ कारणे

  1. ते राजीनामा मागे घेणारच होते. मात्र पक्षावर आजही आपलीच पकड असल्याचे त्यांनी राजीनाम्याच्या घोषणेनंतर जो भावनांचा उद्रेक झाला, त्यावरून सिद्ध केले. पक्ष आपल्यासोबत असल्याचे पवार यांना पक्षात वेगळा विचार करणाऱ्यांना दाखवून द्यायचे होते, ते साध्य झाले. 
  2. पवार यांनी आधी राजीनाम्याची घोषणा तर केली, पण नवीन नेतृत्वाच्या हाती पक्ष देण्याची ही वेळ नाही, कालांतराने तसे करता येईल हे त्यांच्या नंतर लक्षात आले. आज पक्षाध्यक्षपद सोडले तर पक्ष फुटेल व त्याचा फायदा इतर पक्षांना होईल, असा अंदाज त्यांना आला असावा. त्यातून त्यांनी आजचा निर्णय घेतला. 
  3. सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्षपद दिले तर ते पक्षात एकमताने स्वीकारले जाईल का, याबाबत शरद पवार यांना शंका होती. सुप्रिया यांना अध्यक्ष केलेही असते तरी पक्षावर अजित पवार यांचाच प्रभाव राहिला असता. त्यातून पक्षात विसंवाद निर्माण झाला असता. लोकसभा, विधानसभा निवडणूक समोर असताना असे चित्र निर्माण होऊ नये, म्हणून पवार यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याचे ठरविले.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळे