शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सीट बेल्ट लावा, जीव वाचवा; विविध यंत्रणांकडून महत्त्व अधोरेखित, नियमांचे काटेकोर पालन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2022 16:45 IST

सीट बेल्ट म्हणजे भीषण अपघातात जीवन आणि मृत्यू यांच्यातील सीमारेखा आहे. या बेल्टमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे.

नितीन जगताप -

मुंबई : देशात रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोक मृत्युमुखी पडतात. रस्ते अपघातात नाहक जाणारे हे बळी रोखण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने वेळोवेळी अनेक नियम तयार केले आहेत. तसेच कायदे आणखी कठोर केले आहेत. त्याचबरोबर गाड्यांमध्ये सीट बेल्ट घालणे अनिवार्य केले आहे. सीट बेल्ट म्हणजे भीषण अपघातात जीवन आणि मृत्यू यांच्यातील सीमारेखा आहे. या बेल्टमुळे आतापर्यंत लाखो लोकांचे जीव वाचल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असतानाही सीट बेल्टकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी अपघातात मृत्यू होतो.  वाहनाच्या चालकाच्या हाती गाडीची स्टेअरिंग असते, ती केवळ गाडी चालवण्यासाठी नव्हे. गाडी सुरू करण्यापूर्वी  सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट घातला आहे हे तपासायला हवे. कारण बऱ्याच अपघातात वाहन चालक आणि त्याच्या शेजारील व्यक्ती सीट बेल्ट लावते पण पाठीमागील प्रवासी सीट बेल्टकडे दुर्लक्ष करतात. मात्र ते प्राणघातक ठरते. 

वैयक्तिक सुरक्षेसाठी महत्त्वाचे कायदा हा शिक्षा करण्यासाठी नसून शिस्त लावण्यासाठी आहे. काहीजण  केवळ कारवाई होईल म्हणून सीट बेल्ट आणि हेल्मेटचा वापर करतात. पण सीट बेल्ट आणि हेल्मेट हे त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेसाठी आहे त्याचा विचार केला पाहिजे.  शहरात असलो की सीटबेल्ट वापरणार नाही केवळ महामार्गावर वापरेन हे चुकीचे असून गाडीत बसले की सीट बेल्टचा वापर व्हावा.- डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्तपाठीमागे बसणाऱ्यांनाही सीट बेल्ट सक्तीची गरज वाहन चालक आणि त्याच्या शेजारील व्यक्ती शिवाय पाठीमागे बसणाऱ्यांनीही सीट बेल्ट घातला पाहिजे याचा वाहन कायद्यात समावेश केला आहे. पण वाहन चालक आणि त्याच्या शेजारील व्यक्तीवर सीट बेल्टची कारवाई केली जाते. मात्र पाठीमागे बसणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. पाठीमागे बसणाऱ्यांनाही  सीट बेल्ट सक्तीची गरज आहे. - रणजित गाडगीळ, वाहतूक तज्ज्ञ

(स्रोत : सेव्ह लाइफ फाऊंडेशन अभ्यास २०१९-२०)

वर्ष     घटना     मृत्यू     जखमी२०२१    ४०३११६    १५५६२२    ३७१८८४२०२०     ३६६१३८    १३१७१४    ३४८२७९२०१९    ४४९००२    १५११३    ४५१३६१२०१८     ४६७०४४    १५१४१७    ४६९४१८२०१७     ४६४९१०    १४७९१३    ४७०९७५२०१६    ४८०६५२    १५०७८५    ४९४६२४

विना सीट बेल्ट २०० रुपये दंड महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. परवाना नसताना वाहन चालविल्यास पूर्वी १००० रुपये दंड होता तो ५००० रुपये करण्यात आला आहे. पण वाहन चालविताना सीटबेल्ट घालून नसल्यास १००० रुपये दंड आकारला जायचा. परंतु नव्या कायद्यात दंडाच्या रकमेत घट करून ती २०० रुपयांवर आणली आहे. 

टॅग्स :Accidentअपघातcarकारroad safetyरस्ते सुरक्षा