शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 18:57 IST

केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार; दिल्लीला जाऊन राज्यासाठी मोठे प्रकल्प घेऊन येतो.

Eknath Shinde : आगामा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. राज्य सरकार सातत्याने आपल्या कामांचा पाढा वाचत आहेत. दरम्यान, आज(दि.25) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सरकारच्या कार्यपद्धतीपासून ते दिल्लीवारी आणि आगामी निवडणुकीची रणनीती...अशा विविध विषयांवर भाष्य केले. 

"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  

राज्यातील सरकार दिल्लीतून चालवले जात असल्याचा आरोप महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करत आहेत. या आरोपाबाबत सीएम शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही दिल्लीला जातो, ते महाराष्ट्राच्या विकासासाठी. दिल्लीला गेल्यावर महाराष्ट्रासाठी काहीतरी घेऊन येतो. मुख्यमंत्री बनण्यासाठी आम्ही दिल्लीत जात नाही. दिल्लीत जाऊन आम्ही रेल्वे, रस्ते, सिंचन, शहरी विकासाचे प्रस्ताव आणतो. केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार असेल, तर त्याचा फायदा होतो आणि महाराष्ट्रालाही त्याचा फायदा झाला आहे. वाधवन बंदरात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी राज्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. राज्यात सेमी कंडक्टर कंपनी येत आहे, नवी मुंबईत विमानतळ बांधले जात आहे. विरोधक आम्हाला याचे कधीच श्रेय देणार नाहीत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका तुमच्या नेतृत्वाखाली लढल्या जात आहेत की, तीन चाकी इंजिन आहे? या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, आम्ही एक टीम म्हणून काम करतो, खुर्चीचा लोभ नाही. भविष्यातही आम्ही एक टीम म्हणून काम करू. महिलांसाठी सुरु केलेली रोख लाभ योजना कोणाची आहे? ही अजित पवार लाडकी बहीण योजना आहे, देवेंद्र फडणवीस लाडकी बीण योजना आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे? या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, आम्ही तिघांनीही एक टीम म्हणून एकत्र काम केले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवानंतर लाडकी बहीण योजनेची गरज का भासली? या प्रश्नावर ते म्हणाले की, या योजनेची तयारी दीड वर्षापासून सुरू होती. कोणतीही योजना अचानक येत नाही. आमचे सरकार गरिबांचे सरकार आहे, आम्ही गरिबी पाहिली आहे. आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना आणि बेरोजगारांना स्टायपेंड देत आहोत, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर काय फरक पडला? या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोणताही बदल झालेला नाही. कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करेन. आपल्याला काय मिळेल याचा कधीच विचार केला नाही. जनतेच्या इच्छेनुसार मी काम करत राहिलो आणि मुख्यमंत्रीपद मिळाले. आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. जागावाटपाच्या प्रश्नावर कोणतीही अडचण नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४