शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 18:57 IST

केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार; दिल्लीला जाऊन राज्यासाठी मोठे प्रकल्प घेऊन येतो.

Eknath Shinde : आगामा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. राज्य सरकार सातत्याने आपल्या कामांचा पाढा वाचत आहेत. दरम्यान, आज(दि.25) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सरकारच्या कार्यपद्धतीपासून ते दिल्लीवारी आणि आगामी निवडणुकीची रणनीती...अशा विविध विषयांवर भाष्य केले. 

"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  

राज्यातील सरकार दिल्लीतून चालवले जात असल्याचा आरोप महाराष्ट्रातील विरोधी पक्ष करत आहेत. या आरोपाबाबत सीएम शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले की, आम्ही दिल्लीला जातो, ते महाराष्ट्राच्या विकासासाठी. दिल्लीला गेल्यावर महाराष्ट्रासाठी काहीतरी घेऊन येतो. मुख्यमंत्री बनण्यासाठी आम्ही दिल्लीत जात नाही. दिल्लीत जाऊन आम्ही रेल्वे, रस्ते, सिंचन, शहरी विकासाचे प्रस्ताव आणतो. केंद्रात आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार असेल, तर त्याचा फायदा होतो आणि महाराष्ट्रालाही त्याचा फायदा झाला आहे. वाधवन बंदरात हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी राज्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. राज्यात सेमी कंडक्टर कंपनी येत आहे, नवी मुंबईत विमानतळ बांधले जात आहे. विरोधक आम्हाला याचे कधीच श्रेय देणार नाहीत, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका तुमच्या नेतृत्वाखाली लढल्या जात आहेत की, तीन चाकी इंजिन आहे? या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, आम्ही एक टीम म्हणून काम करतो, खुर्चीचा लोभ नाही. भविष्यातही आम्ही एक टीम म्हणून काम करू. महिलांसाठी सुरु केलेली रोख लाभ योजना कोणाची आहे? ही अजित पवार लाडकी बहीण योजना आहे, देवेंद्र फडणवीस लाडकी बीण योजना आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे? या प्रश्नावर शिंदे म्हणाले की, आम्ही तिघांनीही एक टीम म्हणून एकत्र काम केले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या पराभवानंतर लाडकी बहीण योजनेची गरज का भासली? या प्रश्नावर ते म्हणाले की, या योजनेची तयारी दीड वर्षापासून सुरू होती. कोणतीही योजना अचानक येत नाही. आमचे सरकार गरिबांचे सरकार आहे, आम्ही गरिबी पाहिली आहे. आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना आणि बेरोजगारांना स्टायपेंड देत आहोत, असेही शिंदे यावेळी म्हणाले.

'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

मुख्यमंत्री होण्यापूर्वी आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर काय फरक पडला? या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोणताही बदल झालेला नाही. कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, आजही काम करतो आणि उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करेन. आपल्याला काय मिळेल याचा कधीच विचार केला नाही. जनतेच्या इच्छेनुसार मी काम करत राहिलो आणि मुख्यमंत्रीपद मिळाले. आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. जागावाटपाच्या प्रश्नावर कोणतीही अडचण नसल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४