शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

गुंजभर सोन्यासाठी बदलावा लागणार वजनकाटा--‘लोकमत टीम’ने या व्यवसायाचा घेतलेला धंडोळा...!

By admin | Updated: March 25, 2015 00:44 IST

आता म्हणे विदेशी वजन काटा घ्या : वैद्यमापन शास्त्र विभागाच्या निर्णयाला सराफ, सुवर्णकारांचा विरोध

असं म्हणतात की ज्याच्याकडे सोने जास्त तो अधिक श्रीमंत! जो जास्त श्रीमंत तो जास्त आखडू! जो जास्त आखडू तो सर्वांपासून दूर....! चला आता आठवूया सराफी व्यावसायिक.... दिवसभर सोन्याकडे पाठ करून बसणाऱ्या या सराफांकडे कित्येक किलो सोने असते. पण त्यांच्याकडे आखडूपणा कधीच पहायला मिळत नाही. ग्राहकांना ताई, वहिनी, मावशी म्हणत आपली चोख सेवा पुरविणाऱ्या या सराफांच्या मागे आता शासनाचा ससेमिरा लागला आहे. अनेक जाचक अटी लादल्या गेल्यामुळे स्मितहास्य असणाऱ्या चेहऱ्यांवर आता रागाची छटा दिसू लागली आहे. राज्यातील विविध ठिकाणांहून आलेल्या सराफी व्यावसायिकांचे अधिवेशन बुधवार दि. २५ रोजी महाबळेश्वर येथे होत आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत टीम’ने या व्यवसायाचा घेतलेला धंडोळा...!सोने-चांदी या मौल्यवान वस्तूंच्या व्यवहारासाठी महाराष्ट्र वैद्यमापन शास्त्राने अचूक व पारदर्शक व्यवहार होण्यासाठी आता सुवर्णकारांना जुन्या वजनकाट्यांऐवजी ०.००१ मिली ग्रॅम अचूकतेचा काटा वापरण्यास बंधनकारक केले आहे. त्यामुळे गुंजभर सोन्यासाठी सराफांना ३० ते ७० हजार रुपयांचा विदेशी वजन काटा वापरावा लागणार आहे.महाराष्ट्र वैद्यमापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार दि. १ एप्रिल २०१५ पासून सर्व सोने-चांदी व्यावसायिक व सर्व सुवर्णकार कारागीर यांना वजन, तोलमापन यंत्र हे ०.००१ मिलीग्रॅम अचूकतेचे ठेवणे बंधनकारक केले आहे. या नियमाची अमलबजावणी वीस दिवसांच्या आत करावयाची आहे.सध्या सोने-चांदी व्यावसायिक ०.१० मिलीगॅ्रम अचूकतेचा इलेक्ट्रॉनिक्स वजनकाटा वापरत आहेत. त्याची तपासणी दरवर्षी वैद्यमापन शास्त्र विभागाकडून करून घेणे बंधनकारक आहे. ०.०१ मिलीग्रॅम अचूकतेचे भारतीय कंपनीचे वजनकाटे उपलब्ध नाहीत. विदेशी बनावटीचे हे वजनकाटे असून त्याची किंमत सर्वसाधारणपणे ३० ते ७० हजार रुपये आहे. बाजारभावातील सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमला २६ हजार रुपये असा गृहीत धरल्यास ०.१० मिलीग्रॅमची किंमत २६ रुपये होते. त्याची अचूकता सराफ काट्यानुसार तोलन मापन शास्त्रात देत नाहीत. त्यामुळे व्यवहार पारदर्शक होण्यासाठी वैद्यमापन शास्त्र विभागाने ०.००१ मिलीग्रॅम अचूकतेचा काटा वापरण्यास बंधनकारक केले आहे. यामुळे आजच्या दराप्रमाणे २.६० पैसे एवढी अचूकता येर्ईल.नवीन काट्यासाठी दुकानात वातानुकूलित यंत्रणा आवश्यकनवीन वजन मापन काट्यांचा वापर करावयाचा झाल्यास सराफ दुकानात वातानुकूलित यंत्रणा बसविणे आवश्यक आहे. कारण हवेचा व वातावरणात बदल झाल्यास काट्याची अचूकता मिळत नाही. महाराष्ट्र सरकार दरबारी त्यांच्या वापरात असणारे प्रयोगशाळेतील काटे ०.१० ते ०.५० मिलीग्रॅम अचूकतेचे असतात. नाकाने फुंकले तरी वाढतं वजनसोन्या-चांदीच्या दुकानात इलेक्ट्रॉनिक्स वजन काटे आहेत. तसेच साध्या पद्धतीचेही वजन काटे पाहायला मिळतात. एका काचेच्या पेटीत ते ठेवलेले असतात. हवेची झुळूक आली तरी वजनात फरक पडत असल्यामुळे वजनकाटे काचेच्या पेटीत ठेवलेले असतात. मात्र, सगळ्याच ग्राहकांना एवढी सगळी माहिती नसते. व्यावसायिक चलाखी करून कमी वजनाच्या दागिन्यांचे वजन वाढवून ग्राहकांना दाखवितात. याबाबत एका व्यावसिकाने गंमत म्हणून सांगितलेला किस्सा असा की, वजनकाटा इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा साधा, काउंटरच्या एका कप्प्यात काचेच्या पेटीत ठेवलेल्या वजनकाट्यावर ग्राहकाशी बोलता-बोलता नाकाने जोरात हवा सोडली तरी गुंजभर वजन वाढविता येतं. गंमत म्हणून घडणाऱ्या या प्रकारामुळे ग्राहकांना मात्र आर्थिक भार सहन करावा लागतो.पावणेदोन लाख जुने काटे होणार रद्दवैद्यमापन शास्त्र विभागाच्या आदेशानुसार आता सर्व सराफ व सुवर्णकारांना नवीन विदेशी काटे खरेदी करावे लागणार आहेत. सध्या महाराष्ट्रात सराफ व सुवर्णकार यांची संख्या १ लाख ७० हजार एवढी आहे. त्यांचे जुने काटे रद्दबातल होऊ शकतात.व्यावसायिकांची कोंडी... ग्राहकांची अडचण... नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने महिला घराबाहेर पडू लागल्या. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव कमी वजनाचे दागिने वापरण्याचा ट्रेंड आला. पण लग्न कार्यात भरजरी आणि जड दागिने घालण्याचा ट्रेन्ड अद्यापही कायम आहे. पण शासनाच्या या काही जाचक अटी व्यावसायिकांना अडचणीच्या ठरणार आहेत. - संतोष निकम (सराफी व्यवस्थापक, सातारा)सराफी व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यात आता वजनकाटा बदलण्याची सक्ती चुकीची आहे. शासन जे वजन काटे घेण्याचे बंधन घालतायत त्यासाठी ‘एअर टाईट रूम’ बनवावी लागेल अशी चिन्हे दिसत आहेत. वजन काट्यासाठी आता दोन लाखांची खोली बांधायला लावणं म्हणजे आमचा शासनाने मांडलेला छळ आहे.- रूपलाल नागोरी (व्यावसायिक, सातारा)सराफी व्यावसायिक अत्यंत प्रामाणिकपणे व्यवसाय करतात. त्यांच्या सुरक्षे विषयी ‘हाताची घडी तोंडावर बोट’ अशी भूमिका घेणाऱ्या शासनाने एक लाखांच्या खरेदीसाठी पॅन कार्डची सक्ती केली आहे. ही सक्तीने आम्हाला अमान्य आहे. शासनाने सराफी व्यावसायिकांची पिळवणूक थांबवून व्यावसायिक आणि ग्राहकांच्या हिताची भूमिका घ्यावी, असे वाटते.- विजय लष्करे (उपाध्यक्ष, सराफ असोसिएशन )