शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पुणे शहराची पाण्याची समस्या अखेर संपणार

By admin | Updated: July 13, 2016 14:35 IST

गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी उघडीप घेतली

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 13 - गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणा-या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी उघडीप घेतली. खडकवासला धरणसाखळीमधील पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये सुमारे 12.90 टीएमसी (45 टक्के ) पाणीसाठा तयार झाला असून हे पाणी शहरासाठी राखीव ठेवल्यास पुढील वर्षभर पुरेल एवढे आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत या चारही धरणांमध्ये अवघा 7.10 टीएमसी पाणीसाठा होता. दरम्यान, सोमवार (दि. 13) पासून खडकवासला धरणातून सुरू करण्यात आलेला नऊ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग आज सकाळी अकरा वाजता 4 हजार क्यूसेक करण्यात आला आहे. पुणे शहराला दररोज एकवेळ पाणी पुरवठा करण्यासाठी वर्षभर तब्बल 13 टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. मात्र, मागील वर्षी पावसाने दगा दिल्याने आॅक्टोबर 2015 अखेर पर्यंत ही धरणांमध्ये अवघा 15 टीएमसी (50 टक्के) पाणीसाठा होता. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांपासून आधी एकवेळ नंतर दिवसआड पाणी कपातीचा सामना पुणेकरांना करावा लागला होता. त्यातच यंदा जून महिना संपूनही पाऊस न पडल्याने या चारही धरणांमध्ये अवघा 7 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे ही कपात वाढण्याचे संकट ओढावले होते. मात्र, 2 जुलैपासून या चारही धरणांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अवघ्या 12 दिवसांमध्ये पाणीसाठा 45 टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे या पावसाने तूर्तास पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.