शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

विदर्भात जलाशयांतील पाण्याची स्थिती गंभीर, वन्यप्राणी, पक्षांसमोरही जलसंकट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 5:56 PM

पूर्व व पश्र्चिम विदर्भातील जलाशयाची स्थिती गंभीर असून, जानेवारी महिन्यात काही जलाशयांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात वन्यप्राणी, पक्षांसमोर भीषण जलसंकट उभे राहणार असल्याचे संकेत आतापासून मिळू लागले आहे.

अमरावती - पूर्व व पश्र्चिम विदर्भातील जलाशयाची स्थिती गंभीर असून, जानेवारी महिन्यात काही जलाशयांतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात वन्यप्राणी, पक्षांसमोर भीषण जलसंकट उभे राहणार असल्याचे संकेत आतापासून मिळू लागले आहे.

यावर्षी पाऊस अत्यल्प कोसळल्याने जमिनीत पाण्याची पातळी फारच कमी आहे. मात्र, जलाशयांतदेखील पाणीसंकट उभे ठाकले आहे. परिणामी, विदर्भातील जलाशयावर विदेशातून स्थलांतरित होणा-या पक्ष्यांना पाणी समस्येसह खाद्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. वाशिम जिल्ह्यातील एकपर्णी, यवतमाळ जिल्ह्यातील इसापूर, निभोना, लालखेड, अमरावती जिल्ह्यातील मालखेड तलाव, केकतपूर, कोंडेश्र्वर, छत्री तलाव, फुटका आदी जलाशयांची पाण्याची पातळी कमी असल्याची स्थिती आहे. या जलाशयावर वन्यप्राण्यांसह पक्षांचे थवेच्या थवे दिसून येतात. जलाशयावर मासेमारीसुद्धा जोरात सुरू आहे. त्यामुळे पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असलेल्या मासेदेखील कमी झाले असून, पक्षीसंवर्धनाची बिकट समस्या उभी झाली आहे. नागपुरातील गोरेवाडा, बुलडाणा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील जलाशयांचीसुद्धा चांगली स्थिती नाही. उन्हाळा सुरू होण्यास अवधी असला तरी जंगलात वन्यप्राण्याची आतापासून पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. जंगलाशेजारील जलाशयांवर वन्यप्राणी, पशू पाण्यासाठी अवलंबून राहतात. मात्र, जानेवारी महिन्यातच  जलाशये आटू लागल्याने एप्रिल, मे महिन्यात जलाशयांमध्ये पाणी कसे राहणार, हा चिंतनाचा विषय आहे. अकोला, अमरावती जिल्ह्यात जलाशयांमध्ये पुरेशे पाणीसाठा नाही. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीवांना पाण्यासाठी दाहीदिशा करावी लागेल, असे चित्र आहे.  विशिष्ट जलाशयावर विदेशी पक्षीविदर्भात विशिष्ट जलाशयावर विदेशी पक्षाचे आगमन झाले आहे. भारतात दरवर्षी १५९ प्रजातीचे पक्षी  स्थलांतर करून येतात. यात थापट्या, शेंडीबदक, लालसरी, थोरले व धाकटे मराल, गडवाल, उचाट, सोनटीरवा, कुतवार, राजहंस, मंगोलिया, क्रौंच, सायबेरिया आदी पक्षांचा समावेश आहे. यंदा जलाशयांमध्ये पाणी कमी असल्याने पशू, पक्षाची संख्या रोडावणार, असे संकेत मिळत आहे. राजहंस पक्षी हिमालय पालथा घालून ३ ते ४ चार किमी प्रवास करून येतो.  पक्षांचे खाद्य झाले कमीजलाशयात पाणी नसल्याने पक्ष्यांसमोर खाद्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. यात छोटे कीटक, शिंपले, मासे आदी हे पक्ष्यांचे खाद्य आहे. मात्र, जलाशयात पाण्याची पातळी कमी झाल्याने पक्ष्यांना खाद्यदेखील मिळणे दुरापास्त झाले आहे. विदेशी व जंगल पक्षाची आतापासून पाणी, खाद्यासाठी वनवन भटकंती सुरू झाली आहे. पक्ष्यांचे स्थलांतर ही पर्यावरण संतुलनासाठी अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. परंतु, जलाशयाची अवस्था फारच गंभीर आहे. जलाशयाची पातळी वाढविणे गरजेचेपाणी अडवून जिरवणे ही मानसिकता बंद झाली आहे. शेतात बांदबंधिस्ती प्रथा बंद झाली. पाण्याची भूजल पातळी खोल गेली. तलावातील पाणी शेतीला दिले जाते. विहिरींचा वापर हळूहळू बंद होत आहे. उद्योगासाठी तलावातील पाणी वापर केला जातो. त्यामुळे जलाशयांकडे केवळ राजकारण म्हणून बघितले जाते. मात्र, विदर्भातील जलाशयांची पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवारमधून तलावातील गाळ काढून तो शेतकºयांना देणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतीला सुपिकता येईल. तलावांचे खोलीकरण झाले पाहिजे. पशू, पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करणे हे मोठे आव्हान आहे. जलाशयांची स्थिती फार गंभीर आहे. शासन, प्रशासन स्तरावरून दखल घेतली नाही तर उन्हाळ्यात पाण्याअभावी पशू, पक्ष्यांना जीव गमवावा लागेल.   - यावद तरटे पाटील,    पक्षी अभ्यासक, अमरावती

टॅग्स :Vidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र