शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

पाणीच उठले गावकऱ्यांच्या ‘जीवना’वर

By admin | Published: January 11, 2015 12:45 AM

पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे,

फ्लोराईडयुक्त पाणी : लिंगटीतील अनेकांना ‘फ्लोरोसिस’ने जखडले!प्रवीण पिन्नमवार - पांढरकवडा (यवतमाळ) पाणी म्हणजेच जीवन. मात्र हेच पाणी आता गावकऱ्यांच्या जीवनावर उठले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी प्राशनाने अख्खे गाव ‘फ्लोरोसिस’ या दुर्धर आजाराने ग्रस्त झाले आहे. कुणी कमरेतून वाकला आहे, कुणाचे दात लाल-काळे तर कुणाला सरळ चालता येत नाही. फ्लोरोसिसने जखडलेले हे गाव आहे, पांढरकवडा तालुक्यातील लिंगटी (भाडउमरी).पांढरकवडापासून २० किलोमीटर अंतरावर लिंगटी आहे. ४०० ते ५०० लोकवस्तीचे गाव आदिवासीबहुल आहे. मात्र अज्ञान आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येथील नागरिकांना उपलब्ध साधनसामग्रीवर चरितार्थ चालवावा लागतो. या गावाची मुख्य समस्या म्हणजे फ्लोराईडयुक्त पाणी आणि हेच पाणी आता नागरिकांना मरणाच्या दाढेत ढकलत आहे. गावात प्रवेश करताच ४० वर्षीय श्रावण पेंदोर भेटला. कमरेतून वाकलेला आणि मान हलवता न येण्याच्या स्थितीत तो जगत आहे. अशा स्थितीत तो आपले काम कसेबसे करीत होता. त्याची संपूर्ण पाठही अकडल्याचे दिसत होते. याबाबत विचारले असता श्रावण म्हणाला, ‘हा त्रास पाच ते सहा वर्षांपासून आहे. नागपूरला रुग्णालयातही जाऊन आलो. त्याठिकाणी ५० ते ६० हजार खर्च येईल, असे सांगितले. आर्थिक परिस्थिती नसल्याने उपचार न घेताच गावी परत आलो आणि आज अशा स्थितीत तुमच्यासमोर उभा आहे’. तानाबाई नैताम या ५० वर्षीय महिलेच्या हाताची सर्व बोटे लुळी पडली होती. त्याही कमरेतून वाकून चालत होत्या. तानाबाईशी संवाद सुरू असतानाच एक २० वर्षीय तरूण अडखळत चालत आला. त्याला विचारले तर तोही चार ते पाच वर्षांपासून हाडाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे समजले. बघता-बघता कमलाबाई पेंदोर, जंगोबाई सुरपाम, भीमराव आत्राम, परशराम आत्राम असे अनेक स्त्री-पुरूष तेथे गोळा झाले. प्रत्येकाला हाडाशी संबंधित कोणता ना कोणता जडलेला होता. या भागात जमिनीतील पाण्यात फ्लोराईड हा क्षार अधिक प्रमाणात आहे. गावात असलेली विहीर ही गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत आहे. याच विहिरीतून मिळणारे फ्लोराईडयुक्त पाणी गावकऱ्यांसाठी घातक ठरत आहे. काय आहे फ्लोराईड ? फ्लोराईड हा क्षार असून पाण्याच्या माध्यमातून तो शरीरात जातो. फ्लोराईडचे शरीरातील प्रमाण वाढल्याने फ्लोरोसिस हा आजार होतो. यात हाडांवर परिणाम होऊन ती वाकतात तसेच हाडे ठिसूळ होतात व सहज तुटतात, दातही वाकडे तिकडे होतात. त्याला डेन्टल फ्लोरोसिस म्हणतात. हा आजार टाळण्यासाठी फ्लोराईडयुक्त पाणी पिण्यासाठी वापरू नये, हाच उपाय असल्याचे वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. बाबा येलके यांनी सांगितले.