शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कोकण,गोव्यासह मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवस धुवाधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 21:14 IST

पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता

ठळक मुद्देगुरुवारी राज्यात दिवसभरात महाबळेश्वर येथे ७८ मिमी पावसाची नोंद विदर्भात सर्व प्रमुख शहरात हलका पाऊस सुरुकोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस जोरदारचा पाऊस राहणार आहे.

पुणे : कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला असून विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. घाटमाथ्यावरील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. पुढील चार दिवस कोकणात जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील घाट विभागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात सर्वदूर पाऊस होण्याच्या दृष्टीने सध्या अनुकूल परिस्थिती आहे. कोकणात सर्वदूर जोरदार पाऊस झाला आहे. भिरा २००, माथेरान १६०, कल्याण १३०, जव्हार, तलासरी १२०, कर्जत, माणगाव, विक्रमगड ११०, सुधागड पाली, ठाणे, उल्हासनगर १००, अंबरनाथ, भिवंडी, चिपळूण, डहाणु, वाडा ९०, पोलादपूर ८०, दोडामार्ग, मंडणगड, म्हसाळा, मुरबाड, रोहा, शहापूर येथे ७० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरील ताम्हिणी, शिरगाव, अम्बोणे २१०, दावडी, डोंगरवाडी १९०, लोणावळा १४०, खंद, वाणगाव, वळवण १२०, खोपोली ११०, भिवपुरी, ठाकूरवाडी ९०, कोयना, शिरोटा ८० मिमी पाऊस झाला होता. मध्य महाराष्ट्रात इगतपुरी १५०, नवापूर १४०, महाबळेश्वर १३०, ओझरखेडा, राधानगरी, वेल्हे ९०, पेठ ८०, त्र्यंबकेश्वर ७०, हर्सुल, सुरगाणा ६०, पौड मुळशी ५० मिमी पाऊस पडला. याशिवाय सर्वत्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस झाला. विदर्भात कुरखेडा ८०, पौनी ६०, आमगाव, भिवापूर, कोरची, लाखंदूर, नागभीड, उमरेड येथे ५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.गुरुवारी राज्यात दिवसभरात महाबळेश्वर येथे ७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सातारा ४१, नागपूर १५, गोंदिया १६, पुणे १०, नाशिक १५, सोलापूर व डहाणु येथे ७ मिमी पावसाची नोंद झाली असून विदर्भात सर्व प्रमुख शहरात हलका पाऊस सुरु आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस जोरदारचा पाऊस राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पुढील चार दिवस जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच औरंगाबाद, जालना जिल्ह्यात १६ ऑगस्ट तर, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात १५ व १६ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी