शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

150 किमीची पदयात्रा करा, मतदारांना भेटा; 'त्या' सर्वेक्षणानंतर भाजपाच्या आमदारांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 7:15 AM

अंतर्गत सर्वेक्षणातून भाजपाच्या 40 टक्के आमदारांची निराशाजनक असल्याची माहिती समोर

मुंबई: मतदारांसोबतचा संपर्क वाढवण्यासाठी पदयात्रा करण्याच्या सूचना प्रदेश भाजपाकडूनआमदारांना देण्यात आल्या आहेत. शेतीशी संबंधित प्रश्न, दुष्काळसदृश्य परिस्थिती, इंधनाचे वाढते दर यामुळे सर्वसामान्य जनतेत सरकारविरोधात नाराजी आहे. त्यातच भाजपाच्या 40 टक्के आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचं पक्षाकडून करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे. या सर्वेक्षणाची भाजपा नेतृत्त्वानं चांगलीच धास्ती घेतली आहे. मतदारसंघात पदयात्रा करा, लोकांना भेटा, अशा सूचना प्रदेश भाजपानं सर्व आमदारांना दिल्या आहेत. संपर्क अभियानाच्या अंतर्गत भाजपाच्या सर्व आमदारांना 150 किलोमीटरची पदयात्रा करावी लागणार आहे. यामुळे मतदारांशी असलेला संपर्क आणखी वाढेल, अशी माहिती पक्षाच्या एका नेत्यानं दिली. 'महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत. गांधींचं जयंती वर्ष विधायक कामानिमित्त लक्षात राहावं, यासाठी ही पदयात्रा केली जाणार आहे,' अशी माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. 'संपर्क अभियान कशा पद्धतीनं राबवायचं, त्याचा नेमका हेतू काय, पक्षाला यातून नेमकं काय अपेक्षित आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती 121 आमदारांना देण्यात आली आहे,' असंदेखील या पदाधिकाऱ्यानं सांगितलं.  2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 122 आमदार निवडून आले. मात्र नागपूरचे आमदार आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्यानं भाजपाच्या आमदारांची संख्या 121 वर आली आहे. त्यातच गेल्याच आठवड्यात भाजपानं केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारी पुढे आली. दिल्लीतील चाणक्य या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, भाजपाच्या 40 टक्के आमदारांची कामगिरी खूपच निराशाजनक आहे. आमदारांच्या मतदारसंघातील जनतेला प्रश्न विचारुन हे सर्वेक्षण करण्यात आलं होतं. त्यामुळेच प्रदेश भाजपानं रस्त्यावर उतरुन मतदारांना भेटण्याच्या, त्यांच्याशी संवाद साधण्याच्या सूचना केल्याची माहिती राजकीय विश्लेषकांनी दिली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस