शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

हात पसरणाऱ्यांची अगतिकता कायम

By admin | Updated: June 30, 2014 00:42 IST

कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने सक्तीचे शिक्षण कायदा अंमलात आणला; एवढेच नव्हे तर परिस्थितीपुढे हात टेकून भिक्षा मागण्याची किंवा कोणापुढे हात पसरण्याची वेळ

कायदा हतबल : बालकल्याण समित्या केवळ कागदावरमनोज ताजने - गोंदियाकोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने सक्तीचे शिक्षण कायदा अंमलात आणला; एवढेच नव्हे तर परिस्थितीपुढे हात टेकून भिक्षा मागण्याची किंवा कोणापुढे हात पसरण्याची वेळ बालकांवर येऊ नये म्हणून शासनाने या बालकांसाठी सुधारगृहासोबतच विविध सोयी उपलब्ध करून दिल्या, पण रेल्वेमध्ये साफसफाई करून कोणापुढे हात पसरणारी किंवा विविध कसरती दाखवून मनोरंजन करीत पैसे मागणारी बालके सर्रास दिसत आहेत. राजरोसपणे हा प्रकार सुरू असताना त्याला आळा घालण्यात संबंधित यंत्रणेला मात्र अपयश येत आहे.गोंदियासारख्या राज्याच्या टोकावरील जिल्ह्यापासून तर राजधानी मुंबईपर्यंत शेकडो चालत्या रेल्वेगाड्यांमध्ये ४ ते १४ वर्षांची मुले कधी भिक्षा मागताना तर कधी साफसफाई करताना दिसतात. प्रवासी खूश होऊन एक-दोन रुपयांचे नाणे त्यांच्या हातावर टेकवतात. सोबतच विविध कसरती दाखवून प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारी चार-पाच वर्षांची मुले रेल्वेत हमखास पाहायला मिळतात. प्रवाशांनी टाकून दिलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या जमा करून त्या विकून चार पैसे मिळवण्यासाठी या बालकांची धडपड सुरू असते. मात्र, हा प्रकार थांबविण्यात रेल्वे पोलीस, बालकल्याण समितीला अपयश येत असल्याचे दिसून येते़ राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाने फेब्रुवारीमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार गोंदिया जिल्ह्यात २७६ बालमजूर आढळले. बालमजुरांसाठी सहायक कामगार कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सात संक्रमण शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र हा प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. याशिवाय सहायक आयुक्त कामगार कार्यालयाच्या माहितीप्रमाणे २८ जून २०१३ पर्यंत जिल्ह्यात १ हजार ४७७ बालमजूर होते. या बालमजुरांसाठी ‘इंडस’च्या माध्यमातून ४० विशेष प्रशिक्षण देणाऱ्या शाळा होत्या. त्या सर्व शाळा बंद करून त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या नावावर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात आले. परंतु बालमजुरीचे प्रमाण अजूनही कमी झाल्याचे दिसून येत नाही. जिल्हा बालकल्याण समिती अशा बालकांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करते. मात्र पालक भूलथापा देत आपल्या पाल्याला संक्रमण शाळांमध्ये घालण्याऐवजी आम्हीच त्याला शिकवतो, असे लिहून देऊन मोकळे होतात. पुढे तोच बालक पुन्हा कामाचे स्वरूप बदलवून लोकांपुढे हात पसरताना नजरेस पडतो. अशा पालकांवर कायद्याचा कोणताही बडगा नसल्याचे दिसून येते.