शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
2
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
3
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
4
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
5
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
6
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
7
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
8
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
11
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
12
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
13
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
14
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
15
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
16
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
17
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
18
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
19
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
20
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
Daily Top 2Weekly Top 5

हात पसरणाऱ्यांची अगतिकता कायम

By admin | Updated: June 30, 2014 00:42 IST

कोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने सक्तीचे शिक्षण कायदा अंमलात आणला; एवढेच नव्हे तर परिस्थितीपुढे हात टेकून भिक्षा मागण्याची किंवा कोणापुढे हात पसरण्याची वेळ

कायदा हतबल : बालकल्याण समित्या केवळ कागदावरमनोज ताजने - गोंदियाकोणतेही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने सक्तीचे शिक्षण कायदा अंमलात आणला; एवढेच नव्हे तर परिस्थितीपुढे हात टेकून भिक्षा मागण्याची किंवा कोणापुढे हात पसरण्याची वेळ बालकांवर येऊ नये म्हणून शासनाने या बालकांसाठी सुधारगृहासोबतच विविध सोयी उपलब्ध करून दिल्या, पण रेल्वेमध्ये साफसफाई करून कोणापुढे हात पसरणारी किंवा विविध कसरती दाखवून मनोरंजन करीत पैसे मागणारी बालके सर्रास दिसत आहेत. राजरोसपणे हा प्रकार सुरू असताना त्याला आळा घालण्यात संबंधित यंत्रणेला मात्र अपयश येत आहे.गोंदियासारख्या राज्याच्या टोकावरील जिल्ह्यापासून तर राजधानी मुंबईपर्यंत शेकडो चालत्या रेल्वेगाड्यांमध्ये ४ ते १४ वर्षांची मुले कधी भिक्षा मागताना तर कधी साफसफाई करताना दिसतात. प्रवासी खूश होऊन एक-दोन रुपयांचे नाणे त्यांच्या हातावर टेकवतात. सोबतच विविध कसरती दाखवून प्रवाशांचे मनोरंजन करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारी चार-पाच वर्षांची मुले रेल्वेत हमखास पाहायला मिळतात. प्रवाशांनी टाकून दिलेल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या जमा करून त्या विकून चार पैसे मिळवण्यासाठी या बालकांची धडपड सुरू असते. मात्र, हा प्रकार थांबविण्यात रेल्वे पोलीस, बालकल्याण समितीला अपयश येत असल्याचे दिसून येते़ राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पाने फेब्रुवारीमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार गोंदिया जिल्ह्यात २७६ बालमजूर आढळले. बालमजुरांसाठी सहायक कामगार कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सात संक्रमण शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला. मात्र हा प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. याशिवाय सहायक आयुक्त कामगार कार्यालयाच्या माहितीप्रमाणे २८ जून २०१३ पर्यंत जिल्ह्यात १ हजार ४७७ बालमजूर होते. या बालमजुरांसाठी ‘इंडस’च्या माध्यमातून ४० विशेष प्रशिक्षण देणाऱ्या शाळा होत्या. त्या सर्व शाळा बंद करून त्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या नावावर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात आले. परंतु बालमजुरीचे प्रमाण अजूनही कमी झाल्याचे दिसून येत नाही. जिल्हा बालकल्याण समिती अशा बालकांचे आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन करते. मात्र पालक भूलथापा देत आपल्या पाल्याला संक्रमण शाळांमध्ये घालण्याऐवजी आम्हीच त्याला शिकवतो, असे लिहून देऊन मोकळे होतात. पुढे तोच बालक पुन्हा कामाचे स्वरूप बदलवून लोकांपुढे हात पसरताना नजरेस पडतो. अशा पालकांवर कायद्याचा कोणताही बडगा नसल्याचे दिसून येते.