शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

Vote for LMOTY 2019: कोण आहे नाटकांमधील अभिनयसम्राट?; 'या' पाच जणांपैकी तुमचं मत कुणाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 6:42 PM

अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

ज्यांच्या मनगटांत महाराष्ट्र आणि मुठीत विश्व अशा महारत्नांचा गौरव म्हणजे 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळा. यंदा २० फेब्रुवारीला मुंबईत हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे. त्यातील रंगभूमी-पुरुष या गटासाठी पाच नामांकनं निश्चित करण्यात आली आहेत. त्यापैकी तुमच्या आवडत्या कलाकाराला तुम्ही खालील बॉक्समध्ये मत देऊ शकतं.  

आस्ताद काळे (तिला काही सांगायचंय) 'तिला काही सांगायचं आहे' हे नाटक आस्तादाचे सध्या रंगभूमीवर जोरदार सुरु आहे. यश पटवर्धन आणि मिताली सहस्रबुद्धे या जोडप्याची ही गोष्ट आहे. यश पटवर्धनची भूमिका आस्ताद काळेने साकारली आहे. यश एका कार्पोरेटमध्ये मोठया हुद्द्यावर आहे तर मिताली एका समाजिक संस्थेमध्ये काम करत असते. मितालीवर खूप प्रेम करणारा, थोडासा पारंपरिक विचारांचा, आपल्या बायकोची तिच्याच ऑफिसमधल्या एका कलीगशी जरा जास्तच असलेली जवळीक आणि त्यामुळे अस्वस्थ होणारा, त्यानंतर तिने एक स्फोटक खुलासा केल्यावर उद्धवस्त होणारा यश, आस्तादने अगदी समर्थपणे साकारला आहे. आजच्या तरुण पिढीला आपलीशी वाटणारी अशी या नाटकाची भाषा आणि संवाद आहेत. यातील आस्तादाने साकारलेला यश रसिक प्रेक्षकांना भावला आहे............भरत जाधव ( वन्स मोअर) भरतचे आणखीन एक नाटक रसिकांच्या भेटीला आले आहे ते म्हणजे 'वन्स मोअर'. या नाटकात भरतने जीवनची भूमिका रंगवली आहे. ही गोष्ट आहे जीवन देशमुख आणि नियती देशमुख यांच्या सुखी कुंटुंबाची. जीवन आणि नियती यांना एक लालू नावाचा शाळेत जाणारा मुलगा असतो. लालूसोबत खेळायला कोणीतरी आणायचं असा विचार जीवन करत असतानाच सरकार फतवा काढते की, या पुढे विवाहित जोडप्यास एकच मुल जन्माला घालता येईल. एक मुलाची गंभीर समस्या हसत-खेळत मांडण्यात आली आहे. त्यामुळे नाटक धमाल करुन जात असताना प्रेक्षकांना अंतमुर्ख व्हायला भाग पाडते. जीवनची मध्यवर्ती भूमिका भरतने समर्थपणे साकारली आहे. .............मोहन जोशी (नटसम्राट) मोहन जोशी यांनी पुण्यातील थिएटरपासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. रंगभूमी असो मालिका असो किंवा सिनेमा असो या तिनही माध्यमांमध्ये मोहन जोशी यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 'नटसम्राट'च्या रुपात त्यांनी एक अजरामर नाट्यकृती रंगभूमीवर आणली. कुणी घर देता का घर? अशी साद देणाऱ्या आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका मोहन जोशी यांनी पुन्हा एकदा जीवंत केली. विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या शोकांतिकांवरुन प्रेरित होऊन वि. वा. शिरवाडकर यांनी 'नटसम्राट' हे नाटक लिहिले होते. सत्तरच्या दशकात या नाटकाने रंगभूमीवर इतिहास रचला होता. या नाटकासाठी नाना पाटेकर यांनी मोहन जोशींची निवड केली आहे. रोहिणी हट्टंगटी यांनी यात मोहनी जोशी यांची पत्नी कावेरीची भूमिका साकारली आहे. ह्रषिकेश जोशी यांनी या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी संभाळली आहे. .............प्रशांत दामले (एका लग्नाची पुढची गोष्ट)लग्नाच्या अनेक वर्षांनंतर पती-पत्नीचे नाते कशा पद्धतीने बदलत जाते, त्यांच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे नाते कसे बदलते हे सगळे हलक्या फुलक्या पद्धतीने या नाटकात मांडण्यात आलेले आहे. सहकाऱ्याच्या सांगण्यावरुन ऑफीसातल्या एका मुलीच्या प्रेमात पडणारा आणि त्यामुळे घरच्या बायकोला सांभाळण्याची त्रेधा तिरपीट सावरणारा मन्या प्रशांतने साकार केलाय 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या सध्या त्यांचे रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकात. कविता लाड आणि प्रशांत दामले यांच्या जोडीचे 'एका लग्नाची गोष्ट' हे नाटक चांगलेच लोकप्रिय ठरले होते. या नाटकात त्यांनी गायलेले 'मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं', हे गाणे आजही लोकप्रिय आहे. पुन्हा एकदा याच जोडीसोबत 'एका लग्नाची पुढची गोष्ट' हे नाटक रसिकांच्या भेटीला आले आहे. या नाटकात प्रशांत दामले यांनी मनोजची (मन्या) भूमिका साकारली आहे. .................वैभव मांगले (अलबत्त्या गलबत्त्या)'अलबत्या गलबत्या' हे सत्तरच्या दशकात गाजलेलं बालनाटय वैभव मांगले यांनी पुन्हा एकदा आपल्या भेटीला येऊन आला आहे. यात वैभवने चेटकणीची भूमिका साकारली आहे. हे नाटक लहान मुलांच्या विश्वात डोकावणार आहे. एका राजाला त्याच्या मुलीचे लग्न करायचे असते, परंतु तिच्या कुंडलीत तिचे लग्न एका अलबत्या गलबत्या नामक व्यक्तीशी होणार असते. राजाला हे कदापि मान्य नसल्यामुळे तो त्याच्या मुलीला नजरकैदेत ठेवतो. राजा त्या अलबत्याला फाशी देण्याचे जाहीर करतो. तर दुसरीकडे चेटकिणीला सर्व जग तिच्या ताब्यात यावे अशी इच्छा असते. तिच्याकडे एक जादूची आगपेटी असते. ही आगपेटी ती चालाकीने अलबत्या गलबत्या म्हणजेच अलबतराव गलबतराव याच्या द्वारे मिळवते अशी काहीशी या नाटकाची गोष्ट आहे. रत्नाकर मतकरी लिखित चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित हे नाटक प्रेक्षकांची मने जिंकत आहे. वैभव मांगले यांनी आपल्या भूमिकेव्दारे बाल रसिकांची दाद मिळवली आहे. 

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Prashant Damleप्रशांत दामलेMohan Joshiमोहन जोशीBharat Jadhavभरत जाधवAstad Kaleअस्ताद काळेvaibhav mangleवैभव मांगले