Vishwas Nangare Patil: नाशिक येथे आयोजित चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात “मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग” या विषयावर विशेष व्याख्यान सत्र पार पडले. या सत्रात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी युवा वर्गाला मार्गदर्शन केले.
अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी ‘जनरेशन Z’ ला दोष देण्यात अर्थ नसल्याचे स्पष्ट केले. आजची पिढी टेक्नोसॅव्ही, क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह आहे. समाजातील बदल आणि ‘दार बंद संस्कृती’मुळे काही प्रवृत्ती निर्माण झाल्या असल्या तरी मुलांचे गुण-दोष हे समाजाचेच प्रतिबिंब असतात, असे त्यांनी सांगितले.
प्रशासनात पूर्वी इंग्रजीचे वर्चस्व होते; मात्र आता मराठीतील कामकाज वाढत आहे. तरीही काही मराठी शब्द न समजल्यास इंग्रजीचा आधार घ्यावा लागतो, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस दलाचा संदेश हा केवळ बंदुकीचा नसून संकेत, शिस्त आणि मूल्यांचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, परिसंवादात युवा पिढीची बौद्धिक आणि श्रमशक्ती ही भारताची ताकद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. प्रभाव दाखवण्यापेक्षा माणूस म्हणून घडणे अधिक महत्त्वाचे आहे, असा संदेश देत मराठी भाषा आणि संस्कृती जागतिक स्तरावर समर्थपणे पुढे नेण्याचे आवाहन या सत्रातून करण्यात आले.
Web Summary : Vishwas Nangare Patil emphasizes understanding Gen Z's tech-savviness, creativity, and innovation at a Marathi literary event. He highlights societal influences on youth and the importance of values and discipline. The discussion underscored youth's strength and promoting Marathi culture globally.
Web Summary : विश्वास नांगरे पाटिल ने मराठी साहित्य सम्मेलन में Gen Z की रचनात्मकता और नवाचार को समझने पर जोर दिया। उन्होंने युवाओं पर सामाजिक प्रभावों और मूल्यों के महत्व को बताया। चर्चा में युवाओं की ताकत और मराठी संस्कृति को बढ़ावा देने की बात कही गई।