शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 05:38 IST

राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी तावडे यांची पत्र परिषद झाली. गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत यासाठीच राहुल गांधी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असा आरोप तावडेंनी केला.

मुंबई : आपल्याला राजीव गांधी पंतप्रधान असताना अनेक प्रकल्पांची कामे मिळाल्याचे उद्योगपती अदानी यांनीच म्हटले होते. राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडमध्ये कोट्यवधी रुपयांची कंत्राटे अदानींनाकाँग्रेसच्या काळातच मिळाली. तिथे ते गोड वाटतात आणि इकडे महाराष्ट्रात नियमानुसार त्यांना कंत्राट मिळाले तर कोणत्या तोंडाने टीका करता, असा सवाल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केला.

राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तरे देण्यासाठी तावडे यांची पत्र परिषद झाली. ते म्हणाले की, अशोक गहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री असताना अदानींना ४६ हजार कोटींचा सौर ऊर्जा प्रकल्प, जयपूर विमानतळाचे कंत्राट मिळाले होते. तेलंगणात रेवंत रेड्डींच्या सरकारने अदानींशी १२,४०० कोटींचे करार केले आहेत. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सहा एसईझेड अदानींना बहाल केले, छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल मुख्यमंत्री असताना खाणींचे कंत्राट दिले, हिमाचलमध्येही कंत्राटे मिळाली. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारशी अदानींचा संबंध जोडून राहुल गांधी हे काँग्रेस व अदानींमधील जुने नाते लपवू पहात आहेत

धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत म्हणूनच विरोध

- धारावी पुनर्विकासात जमिनीचा एक तुकडाही अदानींना दिलेला नाही. ते केवळ विकासक आहेत आणि संपूर्ण प्रक्रियेचा अवलंब करूनच त्यांना कंत्राट मिळाले. या प्रक्रियेत दुसरे स्पर्धक हे अबुधाबीचे शेख होते, त्यांना कंत्राट मिळाले नाही म्हणून तर राहुल गांधी टीका करत नाहीत ना?

- गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत यासाठीच राहुल गांधी धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करीत आहेत.  गरीबांना पक्की घरे मिळू नये, त्यांनी आयुष्यभर झोपडीतच रहावे, अशी राहुल गांधींची इच्छा असल्यानेच ते प्रकल्पाला विरोध करीत आहेत, असेही तावडे म्हणाले.

तिजोरीवरून खिल्ली

राहुल गांधींनी दिल्लीवरून तिजोरी आणली, मातोश्रीवरून आणायला हवी होती, त्यातून काही तरी निघाले असते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल यांच्या पत्रपरिषदेवर लगावत हा तर निव्वळ बालिशपणा असल्याची टीका केली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vinod Tawdeविनोद तावडेRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसAdaniअदानी