शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"राजकोट किल्ल्यावर सत्ताधाऱ्यांची झुंडशाही’’, विजय वडेट्टीवार यांचा आरोप   

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2024 15:20 IST

Vijay Wadettiwar Criticize BJP : महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट महायुतीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार आसूड ओढले. 

मालवण - लोकसभा निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागण्यासाठी सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर महाराजांचा पुतळा उभारला. महायुतीच्या टक्केवारीच्या धोरणामुळे या पुतळ्यात सरकारने पैसे खाल्ले. त्यामुळे पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले. परिणामी केवळ आठ  महिन्यात हा पुतळा कोसळला. सर्वांची मान शरमेनं खाली गेली. महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला. महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट महायुतीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार आसूड ओढले. 

सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नेस्तनाबूत झाला. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या मोर्चाला संबोधित करताना विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, महायुतीने गुजरातकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवला आहे. पंडित नेहरूंच्या हस्ते अनावरण झालेले पुतळे आजही भक्कम स्थितीत आहेत. महायुतीच्या चोर, लुटारू, डाकू यांनी महाराष्ट्र लुटला आहे. पुतळा उभारणारा जयदीप आपटे २४ वर्षाचा आहे, त्याला अनुभव नसताना मूर्ती करायला दिली. आता तो फरार आहे. वाऱ्याने या परिसरात एक नारळ पडत नाही, ताडपत्री उडाली नाही. पुतळा कसा पडला हा प्रश्न आहे! आणि मुख्यमंत्री वाऱ्याच्या वेगाचे कारण देत आहेत.

महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे जलपूजन पंतप्रधान मोदींच्या केले. एक वीटही अजून रचली नाही. फक्त लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरून मतांसाठी कार्यक्रम केला.त्यामुळे जनता महायुतीला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही किल्ल्यावर पाहणी करायला गेलो. त्या ठिकाणी सत्ताधाऱ्यांनी गुंडगिरी केली.ही सरकारची झुंडशाही आहे. ही झुंडशाही आता जनता खपवून घेणार नाही असा इशारा देखील विजय वडेट्टीवार यांनी दिला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारsindhudurgसिंधुदुर्गcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती