शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून मिळवला विजय, आशिष शेलार यांचा शिवसेनेला टोला   

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 12:28 IST

मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप येथील प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे.

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या भांडुप येथील प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार जागृती पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटरवरून शिवसेनेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे. "भांडुपमधील पोटनिवडणुकीत मोठ मोठे दावे करणाऱ्यांचे पोट फाडून भाजपाने विजय मिळवला," असे ट्विट करत शेलारांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. काढला आहे. 

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपावर शिवसेना नेतृत्वाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर भांडुपमधील पोटनिवडणूक शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेची केली होती. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार विजयी झाल्यानंतर शिवसेनेवर पलटवार करण्याची संधी भाजपाच्या मुंबईतील नेतृत्वाने सोडली नाही. " या पोटनिवडणुकीत मोठमोठे दावे करणाऱ्या विरोधकांचे पोट फाडून भाजपाने विजय मिळवला आहे. या विजयामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मुंबईकरांचा विश्वास कायम असल्याचे सिद्ध झाले आहे. हा विजय विकासाचाच आहे. आता सांगा कोण वेडे ठरले?, असा चिमटा शेलार यांनी ट्विटरवरून काढला." 

 आज राज्यातील विविध ठिकाणच्या पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. मुंबईत भांडुपमधल्या प्रभाग क्रमांक 116 च्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सगळयांचे लक्ष लागले होते. इथून भाजपाच्या उमेदवार जागृती पाटील यांनी मोठा विजय मिळवला आहे.  त्यांनी 5 हजार मतांनी विजय मिळवला. भाजपा उमेदवार जागृती पाटील यांना एकूण 11229 मते मिळाली तर, शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना 6337 मते मिळाली.  

काँग्रेस नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती.  भाजपाने ही जागा मिळविण्यासाठी प्रमिला पाटील यांची सून जागृती पाटील यांना उमेदवारी दिली, तर शिवसेनेची मदार विद्यमान आमदार अशोक पाटील यांच्या पत्नी मीनाक्षी पाटील यांच्यावर होती. त्यामुळे दोन पाटलांमध्येच या प्रभागात रस्सीखेच सुरू झाली. विशेष म्हणजे, ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी उभय पक्षांचे बडे नेतेच प्रभागात तळ ठोकून होते.  यासाठी महापालिकेतील सर्व बैठका रद्द करण्यात आल्या. या पोटनिवडणुकीत एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत शिवसेना व भाजपामध्येच दिसून आली. आपल्या जास्तीतजास्त मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी सेना-भाजपाच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धावपळ सुरू होती, परंतु मतदारांमध्ये महिला मतदार आघाडीवर होत्या. संध्याकाळी साडेपाचपर्यंत ५०.६४ टक्के मतदान झाले.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMumbaiमुंबईElectionनिवडणूक