शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

गोंधळातच वाजले अधिवेशनाचे सूप, विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 06:20 IST

भाजपाच्या ‘त्या’ १२ आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांचे मंगळवारी एकमत झाले.

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी भाजप सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेच्या पायऱ्यांवरच त्यांनी प्रतिरूप अधिवेशन भरवले. विधान भवनात विनापरवाना माईक, स्पीकर आणून विरोधकांनी तेथेच भाषणबाजी केली. त्याला आक्षेप घेताच भाजप सदस्यांनी दिवसभर पत्रकार कक्षातच मुक्काम ठोकला. या गोंधळातच अधिवेशनाचे सूप वाजले. (Vidhan sabha adhiveshan End of assembly session in commotion )दुसरीकडे सत्ताधारी पक्षांनी विविध विधेयके सभागृहात सादर केली. १२ आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर सत्ताधारी पक्षांचे एकमत झाले आहे. फडणवीस यांच्या काळातील फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन विधेयके सादर केली. केंद्राचा शेतकरी कायदा कसा जाचक आहे, यावर भाषणे केली. केंद्राचे कायदे योग्य होते तर त्यावर भाष्य करण्यासाठी भाजप सदस्य सभागृहात का आले नाहीत, असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केला. मात्र त्याचे उत्तर देण्यासाठीही भाजप सदस्य सभागृहात आले नाहीत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी  केली. कोरोनामुळे गेल्या वर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते.

आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर एकमत!भाजपाच्या ‘त्या’ १२ आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांचे मंगळवारी एकमत झाले. याच कालावधीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासाठी राज्यपालांनीच तारीख ठरवून दिली पाहिजे असा नियम आहे. त्यामुळे यावरूनही आता वेगळे राजकारण रंग घेईल.

केंद्राच्या कृषी कायद्यांवर राज्याची कुरघोडी- केंद्राने आणलेले तीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या नाही तर फक्त मूठभर उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. - यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होईल असे सांगत सरकारने यात सुधारणा करणारी तीन विधेयके सादर केली. - ही तिन्ही विधेयके जनता, शेतकरी व सामाजिक संस्था, संघटनांना देऊ. त्यांच्याकडून सूचना व हरकती मागवू, असेही सरकारने विधानसभेत सांगितले.

युतीच्या चर्चेवर पूर्णविराम; "तीस वर्षे एकत्र असून काही घडले नाही, आता काय होणार"- तीस वर्षे युतीत एकत्र होतो, तरी काही झाले नाही. तर, आता काय होणार, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांवर पूर्णविराम लावला. शिवाय, आता महाविकास आघाडीत माझ्या एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आहे. यातून मी कुठे कसा जाणार, असा मिश्किल सवालही त्यांनी केला. - मुख्यमंत्री ठाकरे यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला मिश्किलपणे टोलवतानाच त्यांनी  युतीच्या चर्चांवर मात्र पूर्णविराम लागले.

...तर पंतप्रधानांच्या योजनांत घोटाळा : मुख्यमंत्रीओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे डाटा देण्याची मागणी ठरावाद्वारे केली. यात विरोधकांना मिरच्या झोंबण्यासारखे आणि आकांडतांडव करण्यासारखे काय होते, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी उपस्थित केला. तसेच केंद्राकडील डाटामध्ये आठ कोटी चुका असल्याचे विरोधक म्हणत आहेत. तसे असेल तर याच डाटावर चालविल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये घोटाळा, गडबड झाली म्हणायचे का, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.१८ जणांचे निलंबन केले असते : अजित पवारराज्यपालांनी बारा आमदारांची नियुक्ती रखडविल्याने भाजपच्या बारा सदस्यांचे निलंबन केलेले नाही. सभागृहात आणि अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घालणारे बारा जण होते म्हणून तितक्यांचे निलंबन झाले. तेथे १८ जण असते त्यांच्यावर कारवाई केली असती, असे सांगत निलंबनाची कारवाई ठरवून केली नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे