शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

गोंधळातच वाजले अधिवेशनाचे सूप, विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरूप विधानसभा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 06:20 IST

भाजपाच्या ‘त्या’ १२ आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांचे मंगळवारी एकमत झाले.

मुंबई : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीही विरोधी भाजप सदस्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकत जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभेच्या पायऱ्यांवरच त्यांनी प्रतिरूप अधिवेशन भरवले. विधान भवनात विनापरवाना माईक, स्पीकर आणून विरोधकांनी तेथेच भाषणबाजी केली. त्याला आक्षेप घेताच भाजप सदस्यांनी दिवसभर पत्रकार कक्षातच मुक्काम ठोकला. या गोंधळातच अधिवेशनाचे सूप वाजले. (Vidhan sabha adhiveshan End of assembly session in commotion )दुसरीकडे सत्ताधारी पक्षांनी विविध विधेयके सभागृहात सादर केली. १२ आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर सत्ताधारी पक्षांचे एकमत झाले आहे. फडणवीस यांच्या काळातील फोन टॅपिंगची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. सरकारने शेतकऱ्यांसाठी तीन विधेयके सादर केली. केंद्राचा शेतकरी कायदा कसा जाचक आहे, यावर भाषणे केली. केंद्राचे कायदे योग्य होते तर त्यावर भाष्य करण्यासाठी भाजप सदस्य सभागृहात का आले नाहीत, असा सवाल सत्ताधाऱ्यांनी केला. मात्र त्याचे उत्तर देण्यासाठीही भाजप सदस्य सभागृहात आले नाहीत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी  केली. कोरोनामुळे गेल्या वर्षी नागपुरात हिवाळी अधिवेशन होऊ शकले नव्हते.

आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर एकमत!भाजपाच्या ‘त्या’ १२ आमदारांचे निलंबन कायम ठेवण्यावर महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांचे मंगळवारी एकमत झाले. याच कालावधीत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यासाठी राज्यपालांनीच तारीख ठरवून दिली पाहिजे असा नियम आहे. त्यामुळे यावरूनही आता वेगळे राजकारण रंग घेईल.

केंद्राच्या कृषी कायद्यांवर राज्याची कुरघोडी- केंद्राने आणलेले तीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या नाही तर फक्त मूठभर उद्योगपतींच्या फायद्याचे आहेत. - यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होईल असे सांगत सरकारने यात सुधारणा करणारी तीन विधेयके सादर केली. - ही तिन्ही विधेयके जनता, शेतकरी व सामाजिक संस्था, संघटनांना देऊ. त्यांच्याकडून सूचना व हरकती मागवू, असेही सरकारने विधानसभेत सांगितले.

युतीच्या चर्चेवर पूर्णविराम; "तीस वर्षे एकत्र असून काही घडले नाही, आता काय होणार"- तीस वर्षे युतीत एकत्र होतो, तरी काही झाले नाही. तर, आता काय होणार, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना-भाजप युतीच्या चर्चांवर पूर्णविराम लावला. शिवाय, आता महाविकास आघाडीत माझ्या एका बाजूला काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी आहे. यातून मी कुठे कसा जाणार, असा मिश्किल सवालही त्यांनी केला. - मुख्यमंत्री ठाकरे यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांची भाजपसोबत जवळीक वाढल्याच्या चर्चा सुरू आहेत. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला मिश्किलपणे टोलवतानाच त्यांनी  युतीच्या चर्चांवर मात्र पूर्णविराम लागले.

...तर पंतप्रधानांच्या योजनांत घोटाळा : मुख्यमंत्रीओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडे डाटा देण्याची मागणी ठरावाद्वारे केली. यात विरोधकांना मिरच्या झोंबण्यासारखे आणि आकांडतांडव करण्यासारखे काय होते, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी उपस्थित केला. तसेच केंद्राकडील डाटामध्ये आठ कोटी चुका असल्याचे विरोधक म्हणत आहेत. तसे असेल तर याच डाटावर चालविल्या जाणाऱ्या केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये घोटाळा, गडबड झाली म्हणायचे का, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.१८ जणांचे निलंबन केले असते : अजित पवारराज्यपालांनी बारा आमदारांची नियुक्ती रखडविल्याने भाजपच्या बारा सदस्यांचे निलंबन केलेले नाही. सभागृहात आणि अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घालणारे बारा जण होते म्हणून तितक्यांचे निलंबन झाले. तेथे १८ जण असते त्यांच्यावर कारवाई केली असती, असे सांगत निलंबनाची कारवाई ठरवून केली नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे