शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

इकडे विधान परिषदेची निवडणूक, काँग्रेसचे आमदार वारीला निघून गेले, एकेक मत....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 10:41 IST

Vidhan Parishad Election Updates: शिवसेना आणि काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकडून तिकडून मते गोळा करावी लागणार आहेत. अशातच एकेक मत महत्वाचे असताना काँग्रेसचे बरेचसे आमदार फुटल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना आणि काँग्रेस वगळता इतर सर्व पक्षांच्या उमेदवारांना एकडून तिकडून मते गोळा करावी लागणार आहेत. अशातच एकेक मत महत्वाचे असताना काँग्रेसचे बरेचसे आमदार फुटल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. यातच एक आमदार एवढी महत्वाची निवडणूक असताना पंढरपूर वारीला निघून गेल्याने खळबळ उडाली आहे. 

पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप हे वारीला गेले आहेत. यामुळे ते मतदानाला उपस्थित राहतील की नाही हे काँग्रेसही सांगू शकत नाहीय. जगताप यांनी याबाबत पक्षाला कळविले होते, असे काँग्रेसने स्पष्ट केल्याचे वृत्त आजतकने दिले आहे. तर अन्य दोन बैठकीला अनुपस्थित असलेल्या आमदारांपैकी एक अशोक चव्हाणांचे खास जितेश अंतापुरकर आणि नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले बाबा सिद्धीकी यांचे पूत्र जीशान सिद्धीकी हे आहेत. 

काँग्रेसकडे जादाची १४ मते आहेत. यामुळे आणखी काही आमदार महायुतीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. सुलभा खोडके आणि हीरामन खोसकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे. 

 नवाब मलिक देखील विधानभवनात पोहोचले आहेत. मलिकांनी काल शरद पवार गटाच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यांनी शरद पवार, जयंत पाटलांचीही भेट घेतल्याची चर्चा आहे. यामुळे मलिक अजित पवारांच्या उमेदवाराला मतदान करतात की शरद पवारांच्या याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

हे आहेत रिंगणात

भाजप : पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे, योगेश टिळेकर शिंदेसेना : भावना गवळी, कृपाल तुमाने अजित पवार गट : राजेश विटेकर, शिवाजी गर्जे काँग्रेस : प्रज्ञा सातव उद्धवसेना : मिलिंद नार्वेकर शेकाप : जयंत पाटील 

मतांचे गणित काय...भाजपला आपले पाचही उमेदवार निवडून आणण्याचा विश्वास असला तरी पहिल्या पसंतीची तीन मते त्यांना कमी पडतात. शिंदेसेनेचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे ३९ आमदार असून त्यांना १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने ते सुस्थितीत आहेत.  शेकापचे जयंत पाटील यांच्या स्वत:च्या पक्षाचे एकच आमदार आहेत. त्यांना शरद पवार गटाने पाठिंबा दिला असून त्यांचे १५ आमदार आहेत. याचा अर्थ जयंत पाटील यांच्याकडे १६ मते आहेत. त्यांना आणखी सात मतांची जुळवाजुळव करावी लागेल.  अजित पवार गटाचे ३९ आमदार आहेत. त्यांना आणखी सात मते लागतील. काही अपक्ष, लहान पक्ष आणि काँग्रेसमधील तीन मतांच्या भरवशावर त्यांचे गणित जुळेल, असे म्हटले जात आहे. उद्धवसेनेकडे १५ आमदार आहेत, त्यांना आणखी ८ मते लागतील. एक अपक्ष त्यांच्यासोबत आहेत. काँग्रेसची मते या निवडणुकीत सर्वात महत्त्वाची आहेत. त्यांच्याकडे ३७ मते आहेत आणि त्यांच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांना जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची केवळ २३ मते लागतील. याचा अर्थ काँग्रेसकडे १४ मते अतिरिक्त आहेत, ती कुठे वळतात यावर बरेच अवलंबून असेल.

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूक 2024congressकाँग्रेसBJPभाजपा