शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Parishad Election: दोन्ही उमेदवार विजयी पण शिवसेनेची ३ मते कुठे गेली?; चर्चा सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 22:30 IST

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांना २९ आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना २८ मते पडली

मुंबई - राज्यसभा निकालानंतर विधान परिषद निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत भाजपाला पहिल्या पसंतीची जवळपास १३३ मते पडली आहेत. त्यामुळे ही वाढलेली मते कुणाची याची कुजबूज सुरू झाली आहे. त्यात शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मते पडली. मग शिवसेनेची हक्काची ३ मते कुणाला गेली? अशी चर्चा सुरू झाली आहे. 

शिवसेनेचे उमेदवार सचिन आहिर, आमश्या पाडवी यांना पहिल्या पसंतीची २६ मते पडल्याने दोघंही विजयी झाले. परंतु या विजयानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे. कारण शिवसेनेचे एकूण ५६ आमदार होते. त्यातील रमेश लटके यांचे निधन झाल्यानंतर शिवसेनेकडे ५५ आमदारांचं संख्याबळ होते. शिवसेनेकडे ५५ आमदारांव्यतिरिक्त काही अपक्ष, घटक पक्षांची मते होती. परंतु विधान परिषद निकालात शिवसेनेच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची ५२ मते पडली. 

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांना २९ आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना २८ मते पडली. राष्ट्रवादीकडे एकूण मतांच्या ६ मते जास्त पडली आहेत. त्याचसोबत भाजपाचे प्रविण दरेकर यांना २९, श्रीकांत भारतीय ३०, उमा खापरे २७ आणि राम शिंदे यांना ३० मते पडली आहेत. त्याचसोबत प्रसाद लाड यांना पहिल्या पसंतीची १७ मते पडली आहेत. 

दहाव्या जागेसाठी सस्पेन्सविधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात होते. मात्र या निकालात राष्ट्रवादी २, शिवसेना २ आणि भाजपाचे ४ उमेदवार निवडून गेले. परंतु नवव्या आणि दहाव्या जागेसाठी ३ उमेदवारांमध्ये चुरस निर्माण झाली. यात भाजपाचे प्रसाद लाड, काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांच्यात अटीतटीची लढत दिसून येत आहे. दरम्यान, हा विजय शिवसेनेचा आहे. उद्धव ठाकरेंनी जेव्हा माझे नाव घेतले तेव्हाच माझाच विजय झाला. माझ्या समाजासोबत सर्वांसाठी मी काम करणार आहे असं शिवसेनेची विजयी उमेदवार आमश्या पाडवी यांनी म्हटलं.  

टॅग्स :Vidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस