शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

विदर्भामधील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 6:58 AM

दुष्काळामुळे विदर्भातील दुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई  - दुष्काळामुळेविदर्भातीलदुष्काळग्रस्तांचे लोंढे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. वाशीम व यवतमाळ जिल्ह्यामधून हजारो शेतकरी व शेतमजुरांनी कुटुंबासह मार्च महिन्यापासूनच नवी मुंबईत स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही जिल्ह्यांमधील कुटुंबांनी सानपाडा येथील दत्त मंदिराजवळील उड्डाणपूल, नेरूळ, जुईनगर, एमआयडीसीमधील मोकळ्या भूखंडावर संसार थाटला आहे.पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल, अशा ठिकाणी निवारा करून उघड्यावरच दगडाची चूल करून त्यावर स्वयंपाक केला जात आहे. ते सकाळी तुर्भे, नेरूळ व वाशीमधील नाक्यावर कामाच्या शोधात उभे राहत आहेत. बहुतांश दुष्काळग्रस्त नाका कामगार म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.दुष्काळामुळे गावाकडे पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. एक ते दोन किलोमीटर पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शेतीमध्ये काही पिकत नाही व गावाकडे रोजगाराचे कोणतेच साधन नसल्यामुळे स्थलांतर करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याची माहिती त्यांनी दिली.महापालिका प्रशासनाने दुष्काळग्रस्तांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पाणी, आरोग्य सुविधा, फिरते शौचालय उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी दुष्काळग्रस्तांनी केली आहे.गावामध्ये पाण्याची सोय नाही, मुलाचा ४० वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. नातवाचा अपघात झाल्यामुळे उपचारासाठी कर्ज काढावे लागले. गावाकडे रोजगारही मिळत नसल्यामुळे मुंबईत आलो असून, पावसाळ्यापर्यंत येथेच थांबणार आहोत.- शंकर कालापहाड, बाभूळगाव, वाशिमगावी दोन एकर जमीन आहे; पण दुष्काळामुळे काही पिकत नाही. नाका कामगार म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.- भारत गोविंद महाजन,माळवा, (ता. महागाव, जि. यवतमाळ)दुष्काळामुळे शेती ओस पडली आहे. मजुरीची कामेही मिळत नाहीत. उपासमारीची वेळ आल्यामुळे येथे मिळेल ते काम करून उपजीविका करत आहोत.- अमृत सखाराम गजभार, बोरगाव (ता. मालेगाव, जि. वाशिम)फेब्रुवारी महिन्यापासून गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. येथे रोजंदारीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहोत.- वंदना कालापहाड, मांडवा डिब्रस (ता. हरसूल, जि. यवतमाळ)मुंबईतही समस्यांचा डोंगरविदर्भातील दुष्काळग्रस्तांच्या समस्या मुंबई व नवी मुंबईमध्ये आल्यानंतरही संपलेल्या नाहीत. येथे पुलाखाली उघड्यावरच दगडाची चूल करून स्वयंपाक करावा लागत आहे. मंदिर किंवा गळती सुरू असलेल्या जलवाहिनीवरून पाणीभरावे लागत आहे. रात्री पुलाखाली व मोकळ्या भूखंडावर थांबणे धोकादायक असल्याने अनेक जण रेल्वे स्टेशन, पादचारी पुलावर मुक्कामासाठी जात आहेत.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रdroughtदुष्काळVidarbhaविदर्भMumbaiमुंबई