शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

जिल्हा वार्षिक योजनांमध्ये विदर्भाला ३८१ कोटींचा फटका; पश्चिम महाराष्ट्राला जादा पैसे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 02:01 IST

उत्तर महाराष्ट्रावरही कृपा । पश्चिम महाराष्ट्राला ३७९ कोटी रुपये जादा दिले

यदु जोशीमुंबई : राज्यातील ३६ जिल्ह्यांना आगामी आर्थिक वर्षासाठी (२०२०-२१) जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत निधी देताना विदर्भावर मोठ्या प्रमाणात अन्याय झाल्याचे समोर आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विदर्भाचे तब्बल ३८१ कोटी रुपये कमी करण्यात आले. देवेंद्रफडणवीस मुख्यमंत्री असताना विदर्भाला जेवढा निधी मिळाला त्यापेक्षा जास्त निधी मिळणे तर सोडाच पण मोठा कट लावण्यात आल्याबद्दल विदर्भातील सर्वपक्षीय आमदारांमध्ये नाराजी आहे. या निधीतून विविध प्रकारची विकास कामे केली जातात.

विदर्भाला २०१९-२० मध्ये २५०९ कोटी रुपये मिळाले होते. यंदा २२२८ कोटी रुपये मिळाले. विदर्भातील ज्या जिल्ह्यांचा निधी किती कोटी रुपयांनी कमी झाला, त्याची आकडेवारी अशी : वर्धा - २७ कोटी, नागपूर - १२५ कोटी, भंडारा - ३१ कोटी, गोंदिया - १० कोटी, चंद्रपूर - १२७ कोटी. विदर्भातील अमरावती विभागात असलेल्या पाच जिल्ह्यांचा निधी मात्र वाढविण्यात आला पण नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांच्या निधीत कपात करण्यात आली. आमदार आशीष जयस्वाल यांनी ‘लोकमत’कडे या बाबतची आकडेवारी दिली.

गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि पशु संवर्धन मंत्री सुनील केदार हे तीन-तीन कॅबिनेट मंत्री नागपूर जिल्ह्याचे असताना या जिल्ह्याला १२५ कोटी रुपयांचा फटका बसला. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले हे भंडारा जिल्ह्याचे आहेत. तिथेही ३१ कोटी कमी झाले. बहुजन विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्याचा निधी यावर्षी तब्बल १२७ कोटी रुपयांनी कमी झाला.

मराठवाड्याचा निधी वाढलागेल्यावर्षी आठ जिल्हे मिळून १,७६५ कोटी रुपये मिळाले होते. यंदा २०१० कोटी रु.मिळाले. सर्वाधिक ४७ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या बीड जिल्ह्याला वाढवून मिळाला. ते अजित पवार यांचे निकटवर्ती मानले जातात. पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना गेल्यावर्षी १,६३५ कोटी रुपये मिळाले होते. त्यात ३७९ कोटी रुपये वाढवून दिले असून २,०१४ कोटी रु.मिळाले.

मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यांना गेल्यावर्षी १,५५४ कोटी रु. मिळाले होते. यंदा १०८ कोटी रुपयांची वाढ करीत १,६६२ कोटी रु. दिले. उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरसह चार जिल्ह्यांना २२६ कोटी रुपये वाढवून मिळाले, पण त्यात मोठा लाभार्थी हा अहमदनगर जिल्हा ठरला.तीन पक्षांच्या बैठकीत चर्चा व्हावीविदर्भावर या निधीवाटपात मोठा अन्याय झाला आहे. तो दूर झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे. आम्ही मंत्र्यांनी वित्त मंत्री अजित पवार यांच्या कानावर ही भावना घातली आहे. मी तर त्यांना पत्रदेखील दिलेले आहे. निधीवाटपातील भेदभाव त्यांनी अन्य मार्गाने दूर करावा. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तीन पक्षांच्या बैठकीत याबाबत भूमिका मांडावी, अशी विनंती मी त्यांना केली आहे.- डॉ. नितीन राऊत; ऊर्जा मंत्री व पालकमंत्री, नागपूरविदर्भातील लोकप्रतिनिधींनी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. मी स्वत: विधानसभेत या विरुद्ध आवाज उठवेन. आधीच्या सरकारमध्ये जादा निधी मिळतो आणि आमच्या सरकारमध्ये अन्याय होतो हे फारच क्लेशदायक आहे. एखाद्या विभागाचा निधी वाढला म्हणून आकस नाही पण विदर्भावरील अन्याय का सहन करावा? - आशिष जयस्वाल, आमदार, रामटेक

टॅग्स :Vidarbhaविदर्भNitin Rautनितीन राऊतAjit Pawarअजित पवार