शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सगळ्यात मोठा अपेक्षाभंग उद्धव ठाकरेंनी केला की अजित पवारांनी?; देवेंद्र म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 20:14 IST

महिनाभर चाललेल्या सत्ता नाट्यावर देवेंद्र फडणवीसांचं भाष्य

मुंबई: राज्याच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिलेला असतानाही शिवसेना आणि भाजपाला सरकार स्थापन करता आलं नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेनं भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. तत्पूर्वी भाजपानं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मात्र भाजपाचा तो प्रयत्न फसला आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या ८० तासांमध्ये कोसळलं. यावर भाष्य करताना फडणवीसांनी या काळात झालेल्या सर्वात मोठा अपेक्षाभंग कोणी केला, याचं उत्तर दिलं. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास महिनाभर सत्तासंघर्ष चालला. त्यावेळी सर्वात मोठा अपेक्षाभंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यातल्या मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. मात्र उद्धव यांनी निकाल लागताच आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटलं. त्यानंतर शिवसेनेनं थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीशी बोलायला वेळ होता. मात्र माझे फोन घ्यायला वेळ नव्हता, असं फडणवीस म्हणाले.शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी बोलणी सुरू केल्यानं आम्ही अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आम्ही अजित पवारांकडे गेलो नव्हतो. तेच आमच्याकडे आले होते. त्यांनी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिल्यानं आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करुन सकाळी शपथविधी घेतला, असं फडणवीस म्हणाले. या संपूर्ण घटनाक्रमाची शरद पवारांना कल्पना होती. मात्र त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या अर्धसत्य आहे. त्यांच्यात आणि मोदींमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे पुढे कळेलच, असं म्हणत फडणवीस यांनी सस्पेन्स कायम ठेवला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार