शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सगळ्यात मोठा अपेक्षाभंग उद्धव ठाकरेंनी केला की अजित पवारांनी?; देवेंद्र म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 20:14 IST

महिनाभर चाललेल्या सत्ता नाट्यावर देवेंद्र फडणवीसांचं भाष्य

मुंबई: राज्याच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिलेला असतानाही शिवसेना आणि भाजपाला सरकार स्थापन करता आलं नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन शिवसेनेनं भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. तत्पूर्वी भाजपानं राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. मात्र भाजपाचा तो प्रयत्न फसला आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अवघ्या ८० तासांमध्ये कोसळलं. यावर भाष्य करताना फडणवीसांनी या काळात झालेल्या सर्वात मोठा अपेक्षाभंग कोणी केला, याचं उत्तर दिलं. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास महिनाभर सत्तासंघर्ष चालला. त्यावेळी सर्वात मोठा अपेक्षाभंग शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केल्याचं फडणवीस म्हणाले. राज्यातल्या मतदारांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. मात्र उद्धव यांनी निकाल लागताच आम्हाला सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटलं. त्यानंतर शिवसेनेनं थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू केली. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीशी बोलायला वेळ होता. मात्र माझे फोन घ्यायला वेळ नव्हता, असं फडणवीस म्हणाले.शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी बोलणी सुरू केल्यानं आम्ही अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आम्ही अजित पवारांकडे गेलो नव्हतो. तेच आमच्याकडे आले होते. त्यांनी आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र दिल्यानं आम्ही सत्ता स्थापनेचा दावा करुन सकाळी शपथविधी घेतला, असं फडणवीस म्हणाले. या संपूर्ण घटनाक्रमाची शरद पवारांना कल्पना होती. मात्र त्यांनी सांगितलेल्या गोष्टी या अर्धसत्य आहे. त्यांच्यात आणि मोदींमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे पुढे कळेलच, असं म्हणत फडणवीस यांनी सस्पेन्स कायम ठेवला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार