शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

“...तर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शक्य”; अजितदादांचे नाव घेत प्रकाश आंबेडकरांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 17:11 IST

Prakash Ambedkar News: राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीपर्यंत आरक्षणाचा मुद्दा झुलवत ठेवायचा आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Prakash Ambedkar News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये थेट लढत असली, तरी राज्यात तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. तिसऱ्या आघाडीचा प्रयोग प्रत्यक्षात येणार का, तिसरी आघाडी झाली तरी त्यात कोण कोण असेल आणि निवडणुकीत कसा परिणाम दिसू शकेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचेप्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीबाबत सूचक विधान केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी अनेकविध मुद्द्यांवर भाष्य केले. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून तेढ निर्माण झाली आहे ही खरी गोष्ट आहे. शेवटी आरक्षण कुणाला द्यायचे आणि कुणाला द्यायचे नाही, हे सरकारच्या हातात आहे. दंगली करून काय साध्य करणार? त्यातून काही साध्य होणार नाही. दंगल करूच नका. दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा. आपापसात कशाला लढता, मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिले की, सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करा. राजकीय पक्ष आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. या राजकीय पक्षांना आरक्षणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीपर्यंत झुलवत ठेवायचे आहे. मतदारांना माझे असे आवाहन राहील की, त्यांनी आपल्याला झुलवत ठेवले तर आपणही त्यांना झुलवत ठेवायला हवे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

...तर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शक्य

अजित पवार हे जोपर्यंत भाजपसोबत आहेत, तोपर्यंत तिसरी आघाडी शक्य नाही. अजित पवार जर महायुतीतून बाहेर पडले तरच तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचे सांगितले जात आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांनी आता निवडणुकीच्या तयारीला लागायला हवे, आपल्या घोषणेची पूर्तता त्यांनी केली पाहिजे, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, शरद पवार आणि राज्य सरकार २ महिन्यांचे आहे. मनोज जरांगे यांची मागणी आहे की, मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून द्या. यावर आपली आणि शरद पवार यांची काय भूमिका आहे? ती स्पष्ट करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने एक्सवर एक पोस्ट करत केले आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी