शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

“...तर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शक्य”; अजितदादांचे नाव घेत प्रकाश आंबेडकरांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 17:11 IST

Prakash Ambedkar News: राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीपर्यंत आरक्षणाचा मुद्दा झुलवत ठेवायचा आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

Prakash Ambedkar News: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही गटांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. पुढील विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये थेट लढत असली, तरी राज्यात तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. तिसऱ्या आघाडीचा प्रयोग प्रत्यक्षात येणार का, तिसरी आघाडी झाली तरी त्यात कोण कोण असेल आणि निवडणुकीत कसा परिणाम दिसू शकेल, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचेप्रकाश आंबेडकर यांनी तिसऱ्या आघाडीबाबत सूचक विधान केले आहे. 

पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी अनेकविध मुद्द्यांवर भाष्य केले. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून तेढ निर्माण झाली आहे ही खरी गोष्ट आहे. शेवटी आरक्षण कुणाला द्यायचे आणि कुणाला द्यायचे नाही, हे सरकारच्या हातात आहे. दंगली करून काय साध्य करणार? त्यातून काही साध्य होणार नाही. दंगल करूच नका. दोघांनी बसून सरकारच्या विरोधात लढा. आपापसात कशाला लढता, मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिले की, सर्व राजकीय पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करा. राजकीय पक्ष आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. या राजकीय पक्षांना आरक्षणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीपर्यंत झुलवत ठेवायचे आहे. मतदारांना माझे असे आवाहन राहील की, त्यांनी आपल्याला झुलवत ठेवले तर आपणही त्यांना झुलवत ठेवायला हवे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

...तर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग शक्य

अजित पवार हे जोपर्यंत भाजपसोबत आहेत, तोपर्यंत तिसरी आघाडी शक्य नाही. अजित पवार जर महायुतीतून बाहेर पडले तरच तिसऱ्या आघाडीचा प्रयोग होऊ शकतो, असे सूचक विधान प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचे सांगितले जात आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या २८८ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांनी आता निवडणुकीच्या तयारीला लागायला हवे, आपल्या घोषणेची पूर्तता त्यांनी केली पाहिजे, अशी अपेक्षा प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, शरद पवार आणि राज्य सरकार २ महिन्यांचे आहे. मनोज जरांगे यांची मागणी आहे की, मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून द्या. यावर आपली आणि शरद पवार यांची काय भूमिका आहे? ती स्पष्ट करावी, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीने एक्सवर एक पोस्ट करत केले आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी