शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
3
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
4
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
5
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
6
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
7
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
8
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
9
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
10
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
11
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
12
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
13
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
14
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
15
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
16
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
17
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
18
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
19
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
20
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर

“मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात, अमेरिकेतून आल्यापासून शेअर मार्केट कोसळले”: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:17 IST

Prakash Ambedkar News: विरोधी पक्षांना लकवा मारल्याची टीका करत, महाकुंभमेळ्यात एक हजार लोक मृत्युमुखी पडल्याचा दावा प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.

Prakash Ambedkar News: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोन्ही राजांनी इतिहास निर्माण केला तो प्रेरणादायी आहे. पण त्यात अडकून राहण्यापेक्षा त्यातून प्रेरणा घेत आपण नवा इतिहास निर्माण केला पाहिजे. ही मनस्थिती मराठा समाज केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना राहुल गांधी यांनी श्रद्धांजली वाहिली म्हणून भाजपावाले दंगा करीत आहेत. पण श्रद्धांजलीची पहिली पोस्ट खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच टाकली होती. राहुल गांधी यांनी ती कॉपी केली असावी, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. 

गेल्या काही दिवासांपासून भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरु समजतात. पण पंतप्रधान अमेरिकेला जाऊन आल्यापासून ते आजपर्यंत शेअर मार्केट पूर्णपणे कोसळत आहे. दुसरीकडे अमेरिकन डॉलर महाग होत चालला आहे.  शासनाकडे येणारा जीएसटीचा ओघ कमी होत चालला आहे. अर्थव्यवस्थेवर हे मोठे संकट आहे. विरोधी पक्षाने दुर्दैवाने या घसरत चाललेल्या आर्थिक परिस्थितीवर मौन पाळलेले दिसत आहे. अमेरिका आणि अदानी यांचे काय होईल ते होईल पण याचा बागलबुलवा म्हणून वापर केला जात आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. ते पत्रकारांशी बोलत होते. 

महाकुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत १ हजार लोक गेलेत

महाकुंभमेळावा हा लोकांचा भावनिक, वैयक्तिक प्रश्न आहे. या महाकुंभ मेळाव्याची उत्तर प्रदेश  सरकारने सोय केली. पण ज्या पद्धतीने कुंभमेळ्याचे मार्केटिग चाललेले आहे, त्याचा निषेध आहे. या महाकुंभमेळ्यात १ हजारांहून अधिक लोक चेंगराचेंगरीत गेले, हे दुर्दैवी आहे. शासनाने फक्त ३८ लोकांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले आहे. हिंदू संघटनाना आवाहन आहे की, या लोकांचे अंत्यविधी कसे केले हे जाहीर करावे. या सगळ्या घटना पाहता धर्माचे राजकारण हे देशाला आता धोक्याच्या घटकेपर्यत पोचवत आहे. विरोधी पक्षाने याची चर्चा केली पाहिजे. विरोधी पक्ष लकवा मारलेल्या परिस्थितीत गेला आहे. त्यातून त्यांनी स्वतःला  सावरत दुरुस्त करावे  आणि हिटलरशाहीच्या सरकारचा विरोध करावा, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत सायंकाळी सहानंतर ७६ लाख मतदान झाल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. हे संशयास्पद आहे. त्याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. १८ मार्चरोजी सुनावणी होईल. त्यावेळी आयोगाने न्यायालयात खरे सांगावे यासाठी लोकांनी नैतिक दबाव आणला पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदीKumbh Melaकुंभ मेळाVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीGSTजीएसटी