शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

आखाडातील रविवारवर वरुणराजाचीही कृपादृष्टी

By admin | Updated: July 31, 2016 03:52 IST

आखाडातील शेवटचा रविवार मनमुराद साजरा करता यावा, यासाठी वरुणराजाही कृपादृष्टी दाखवणार आहे.

पुणे : आखाडातील शेवटचा रविवार मनमुराद साजरा करता यावा, यासाठी वरुणराजाही कृपादृष्टी दाखवणार आहे. येत्या ४८ तासांत कोकण वगळता राज्यात सर्वदूर श्रावणासारख्या रिमझिम सरी बरसतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. सध्या कोकण आणि विदर्भात मान्सून सक्रिय आहे़ शनिवारी कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मुंबईतही बहुतांश ठिकाणी दमदार सरी पडल्या. कोकणातील अलिबाग येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. याशिवाय पुणे ३, कोल्हापूर ३, महाबळेश्वर २६, नाशिक ०़२, सांगली १, सोलापूर ०़५, मुंबई २९, अलिबाग ४०, रत्नागिरी १९, पणजी २९, डहाणू २५, उस्मानाबाद १४, औरंगाबाद १ मिमी पाऊस झाला.मध्य महाराष्ट्रात इगतपुरी, महाबळेश्वर ३०, गगनबावडा, हरसूल, ओझरखेडा, पारोळा, राधानगरी, शिरोळ २० मिमी पाऊस झाला़मराठवाड्यातील परभणी ८०, माहूर ५०, चाकूर, पूर्णा ४०, उदगिर ३०, बिल्लोली, जिंतूर, रेणापूर २० मिमी पाऊस झाला़ विदर्भात बल्लारपूर, चंद्रपूर, जोईती, महागाव, सावली, उमरखेड ४०, धानोरा, कळमेश्वर, सावनेर ३०, चामोर्शी, चिमूर, गडचिरोली, गोंदिया, कोरपना, मोहाडी फाटा, मूल, नागभिड, वाशिम २० मिमी पाऊस झाला आहे़ (प्रतिनिधी) >२०७ तालुक्यात शंभर टक्के पाऊस!राज्यात जुलैमध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने मान्सूनचा जूनमधील बॅकलॉग भरुन निघाला आहे. ३५५ पैकी २०७ तालुक्यात शंभर टक्के पाऊस झाला आहे. १३९.६४ लाख हेक्टरपैकी १२५.४० लाख हेक्टरवर पेरण्या आटोपल्या असून, पीक परिस्थिती सर्वत्र उत्तम आहे; परंतु एकूण ३५५ तालुक्यांपैकी दोन तालुक्यात २५ ते ५० तर ३४ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.