शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

आखाडातील रविवारवर वरुणराजाचीही कृपादृष्टी

By admin | Updated: July 31, 2016 03:52 IST

आखाडातील शेवटचा रविवार मनमुराद साजरा करता यावा, यासाठी वरुणराजाही कृपादृष्टी दाखवणार आहे.

पुणे : आखाडातील शेवटचा रविवार मनमुराद साजरा करता यावा, यासाठी वरुणराजाही कृपादृष्टी दाखवणार आहे. येत्या ४८ तासांत कोकण वगळता राज्यात सर्वदूर श्रावणासारख्या रिमझिम सरी बरसतील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. सध्या कोकण आणि विदर्भात मान्सून सक्रिय आहे़ शनिवारी कोकण, गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. मुंबईतही बहुतांश ठिकाणी दमदार सरी पडल्या. कोकणातील अलिबाग येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली. याशिवाय पुणे ३, कोल्हापूर ३, महाबळेश्वर २६, नाशिक ०़२, सांगली १, सोलापूर ०़५, मुंबई २९, अलिबाग ४०, रत्नागिरी १९, पणजी २९, डहाणू २५, उस्मानाबाद १४, औरंगाबाद १ मिमी पाऊस झाला.मध्य महाराष्ट्रात इगतपुरी, महाबळेश्वर ३०, गगनबावडा, हरसूल, ओझरखेडा, पारोळा, राधानगरी, शिरोळ २० मिमी पाऊस झाला़मराठवाड्यातील परभणी ८०, माहूर ५०, चाकूर, पूर्णा ४०, उदगिर ३०, बिल्लोली, जिंतूर, रेणापूर २० मिमी पाऊस झाला़ विदर्भात बल्लारपूर, चंद्रपूर, जोईती, महागाव, सावली, उमरखेड ४०, धानोरा, कळमेश्वर, सावनेर ३०, चामोर्शी, चिमूर, गडचिरोली, गोंदिया, कोरपना, मोहाडी फाटा, मूल, नागभिड, वाशिम २० मिमी पाऊस झाला आहे़ (प्रतिनिधी) >२०७ तालुक्यात शंभर टक्के पाऊस!राज्यात जुलैमध्ये सर्वदूर मुसळधार पाऊस झाल्याने मान्सूनचा जूनमधील बॅकलॉग भरुन निघाला आहे. ३५५ पैकी २०७ तालुक्यात शंभर टक्के पाऊस झाला आहे. १३९.६४ लाख हेक्टरपैकी १२५.४० लाख हेक्टरवर पेरण्या आटोपल्या असून, पीक परिस्थिती सर्वत्र उत्तम आहे; परंतु एकूण ३५५ तालुक्यांपैकी दोन तालुक्यात २५ ते ५० तर ३४ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.