शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोही साहित्य संमेलनात शक्तिपीठ महामार्ग रद्दसह विविध ठराव मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:30 IST

अध्यक्ष काॅ. धनाजी गुरव यांनी संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर निवडणुकीत लक्ष घालावे लागेल, असे सांगून महाराष्ट्रात विद्रोहीचं वादळ घोंगावताना दिसेल, असा इशाराही दिला

सातारा : शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांवर लादला आहे. कर्ज काढून मार्ग केला जातोय, तो रद्द करावा यासह किल्ले अजिंक्यताऱ्यावर छत्रपती शाहू महाराज (थोरले) आणि महाराणी ताराबाई यांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभे करावे, मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे, यासह विविध ठराव विद्रोहीच्या संमेलनात एकमताने झाले. याचवेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष काॅ. धनाजी गुरव यांनी संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर निवडणुकीत लक्ष घालावे लागेल, असे सांगून महाराष्ट्रात विद्रोहीचं वादळ घोंगावताना दिसेल, असा इशाराही दिला.

साताऱ्यातील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असणाऱ्या १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचा समोराप रविवारी झाला. यामध्ये विविध मान्यवरांनी विचार मांडले. तसेच सर्वांच्या साक्षीने ठरावही मंजूर केले. यावेळी संमेलनाचे अध्यक्ष शाहीर संभाजी भगत, माजी अध्यक्ष डाॅ. भारत पाटणकर, कवी वाहरु सोनवणे, सह स्वागताध्यक्ष सुहास महाराज फडतरे, काॅ. धनाजी गुरव, अविनाश कदम, ॲड. वर्षा देशपांडे, डाॅ. प्रशांत पन्हाळकर, ॲड. राजेंद्र गलांडे, प्रा.डाॅ. रवींद्र चव्हाण, विजय मांडके, प्रा. गाैतम काटकर यांच्यासह विद्रोहीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

समारोप कार्यक्रमात सुरूवातीला मान्यवरांनी आपले विचार मांडले. वाहरु सोनवणे म्हणाले, मानवजातीला आलेल्या अडचणींना ठोकर मारून पुढे जाणारा विद्रोह आहे. गाव, तालुका, राज्य आणि देशातही विद्रोह झाला पाहिजे. यासाठी आपण जागृती करायला हवी. आम्ही स्पर्धा करणारे नाही तर विचार पुढे घेऊन जाणारे आहोत. संमेलनाचे अध्यक्ष शाहीर संभाजी भगत यांनी नवं आणि पर्यायी सांस्कृतिक राजकारण हे महिलांच्या खांद्यावरून येणार आहे. महिलांनी या प्रवाहाबरोबर जुळवून घ्यावे, असे आवाहन केले. तसेच त्यांनी एक शाहिरीही गायली. याला कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. यानंतर संमेलनात विविध ठराव घेण्यात आले.

विद्रोहीच्या संमेलनातील ठराव...

  • किल्ले संवर्धनात किल्ल्यांच्या इतिहासाला महत्व देण्यात यावे.
  • पुण्यातील शनिवारवाड्यासमोर महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांचे भव्य पुतळे उभारावेत.
  • शनिवारवाड्यात छत्रपती शाहू महाराज यांचा सिंहासनारूढ पुतळा उभा करावा.
  • साताऱ्यात प्रतिसरकारचे यथायोग्य स्मारक उभे करावे.
  • शाळा बंद विरोधी आंदोलन करणे.
  • पंढरपूरच्या मंदिरातील महापुजेत पुरूषसुक्त काढून वारकरी संतांचे अभंग वापरावेत.
  • एसटी वाचविणे
  • छत्रपती संभाजी महाराज यांच्या बदनामीबद्दल विश्वास पाटील यांचा निषेध.
  • साताऱ्यातील भीमाबाई आंबेडकर स्मारक आणि भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राहत्या घराबाबत शासनाने लक्ष घालून लवकर स्मारक पूर्णत्वास न्यावे.
  • महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा.
  • जातनिहाय जनगणना करावी.
  • बेळगावसह सर्व मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडावा.
English
हिंदी सारांश
Web Title : Resolutions passed at Vidrohi Sahitya Sammelan: Highway cancellation, memorials, awards demanded.

Web Summary : Vidrohi Sahitya Sammelan passed resolutions demanding cancellation of the Shaktipeeth highway, memorials for historical figures, renaming Mumbai University after Annabhau Sathe, Bharat Ratna awards, caste census and inclusion of Marathi-speaking regions into Maharashtra. Activists emphasized the need to safeguard democracy through electoral participation.