शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

५१ बैलगाडीतून वऱ्हाड पोहचले लग्नाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2017 22:28 IST

सध्या पुरंदर तालुक्यात लग्नाचा हंगाम जोरात सुरु आहे. यानिमित्त सर्वत्र लग्न कार्यालयात पोहचण्यासाठी चारचाकीच्या युगात पारंपारीकतेला देखील महत्व आले आहे

ऑनालइन लोकमतसासवड, दि. 9 : सध्या पुरंदर तालुक्यात लग्नाचा हंगाम जोरात सुरु आहे. यानिमित्त सर्वत्र लग्न कार्यालयात पोहचण्यासाठी चारचाकीच्या युगात पारंपारीकतेला देखील महत्व आले आहे. वऱ्हाडी मंडळींना लग्न कार्यालयात पोहोचविण्यासाठी गाड्याच्या गाड्या डझनाने बुकिंग केल्या जात आहेत. अशी स्थिती असताना नारायणपूर येथील बोरकर कुंटुंबातील नवरदेव चक्क बैलगाडीतून लग्नाला आला. संपूर्ण बाजारपेठेतून मिरवणूक जात असताना नागरिक रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी करून हा सोहळा पाहत होते.नारायणपूर येथील बाजीराव काळुराम बोरकर यांचे चिरंजीव नाथसाहेब बोरकर आणि शिवरी येथील पंढरीनाथ दत्तात्रय कदम यांची कन्या स्वाती कदम यांचा विवाह सोहळा सासवड जवळील एका कार्यालयात नुकताच मोठ्या थाटामाठात पार पडला. दोन्ही कुटुंबियांच्या वतीने हा सोहळा नयनरम्य होण्यासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती. वधूकडच्या मंडळींनी वऱ्हाडी मंडळींसाठी चार चाकी गाड्या बुक केल्या होत्या. त्यामुळे ते सर्व वऱ्हाड मोटारींमधून आले. सध्या गावोगावी दुष्काळ पडला असून अनेक गावांमध्ये तर बैलगाड्या पाहायलाही मिळत नाही. मात्र नारायण पूरचे माजी सरपंच रामभाऊ बोरकर यांच्याकडून आधुनिक काळातही शेतीचे आणि बैलाचे नाते कायम राहावे, तसेच कोणतेही प्रदूषण न होता लग्नसोहळाही पर्यावरण पूरक व्हावा याची काळजी घेण्यात आली होती. यानिमित्त वर मंडळींनी आपले वऱ्हाड चार चाकी गाड्यांमधून न नेता बैलगाडी जुंपून नेण्याचे ठरविले. घरातील बैलगाडी होतीच, त्याबरोबरच गावातील आणि परिसरातील मित्रांना लग्नाला येताना चारचाकी गाडी न आणता बैलगाडी घेऊन येण्याचे विंनंतीपूर्वक निमंत्रण देण्यात आले.विशेष म्हणजे सर्वांनीच बैलगाडीचे निमंत्रण स्वीकारत सकाळीच दारात बैलगाड्या जुंपून हजर केल्या. तसेच बैलगाड्या नीटनेटक्या दिसाव्यात यासाठी बैलांना सजविण्यात आले.नवरदेवासाठीच्या गाडीची सजावट घरीच विकास कामठे यांनी केली. बैलांच्या अंगावर रंगबिरंगी झूल पांघरून गळ्यात घुंगऱ्याच्या माळा, पायात चाळ आणि गाडीच्या चाकालाही घुंगरे लावण्यात आली. नवरदेव, मित्रमंडळी व इतर वऱ्हाड गाडीमध्ये बसवून लग्न सोहळ्यासाठी प्रस्थान सुरु केले.गावचे माजी सरपंच रामभाऊ बोरकर, नाथशेठ बोरकर, बबन बोरकर, भारतनाना क्षीरसागर, चंद्रकांत बोरकर, अरूण बोरकर, भुजंग बोरकर, संजय न्हालवे, सदानंद बोरकर, नारायण गायकवाड , बाबुराव गायकवाड, मेघनाथ झेंडे, भगवान गोळे आदी ऊपस्थीत होते.