शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

"व्वा, ताई बी टीम म्हणून शिव्या आम्हालाच देता आणि..."; काँग्रेसच्या पराभवानंतर वंचितने साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:16 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसवर टीका केली

Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत भाजपने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा दारुण पराभव केला. भाजपने २७ वर्षांनी दिल्लीत सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे, दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही. या निवडणुकीत इंडिया आघाडीत एकत्र असलेल्या काँग्रेस आणि आपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता निकालानंतरी काँग्रेसने आपवर निशाणा साधला होता. यावरुनच वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेस आणि आपवर निशाणा साधायला सुरुवात केली होती. त्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी आपवरच टीका केली. आपला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आमची नाही, आम्ही राजकीय पक्ष आहोत, असं सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या. सुप्रिया श्रीनेत यांच्या या विधानावरुन वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ढोंगीपणालाही मर्यादा असतात, असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं आहे.

"आम्ही आम आदमी पार्टीला विजयी करण्याची जबाबदारी घेतलेली नाही. आम आदमी पार्टीला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आमची नाही. आम्ही एनजीओ नाही, आम्ही एक राजकीय पक्ष आहोत," असं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं. त्यावर वंचित बहुजन आघाडीने एक्स पोस्टवरुन सुप्रिया श्रीनेत यांच्यावर हल्लाबोल केला.

"व्वा, ताई, व्वा! ढोंगीपणालाही मर्यादा असतात. लोकसभा निवडणुकीनंतर वंचितने काँग्रेसचा कसा पराभव केला याचे विश्लेषण करणाऱ्या याच महिला आहेत. पण काय करताय साहेब! आम्ही एका छोट्या जातीचे आहोत. आम्ही वंचितांचा आणि बहुजनांचा आवाज उठवतो. बी-टीम म्हणून शिव्या फक्त आम्हालाच देण्यात येतात आणि लोक त्यांना राजकीय पक्ष म्हणतात. हा जातिवाद नाही तर काय आहे?", असा सवाल वंचित बहुजन आघाडीने विचारला आहे.

आप आणि काँग्रेसने एकत्र यायला हवे होते - संजय राऊत

"महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीतही राबवण्यात आला. मतदार यादीत घोळ झाला आहे. निवडणूक आयोग शांत बसला होता. काँग्रेस आणि आप यांच्यात युती झाली असती तर बरे झाले असते. 'आप' आणि काँग्रेसमध्ये युती व्हायला हवी होती, असे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो. भाजपचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र यायला हवे होते," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025congressकाँग्रेसBJPभाजपा