शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

"व्वा, ताई बी टीम म्हणून शिव्या आम्हालाच देता आणि..."; काँग्रेसच्या पराभवानंतर वंचितने साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:16 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसवर टीका केली

Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत भाजपने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा दारुण पराभव केला. भाजपने २७ वर्षांनी दिल्लीत सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे, दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही. या निवडणुकीत इंडिया आघाडीत एकत्र असलेल्या काँग्रेस आणि आपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता निकालानंतरी काँग्रेसने आपवर निशाणा साधला होता. यावरुनच वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेस आणि आपवर निशाणा साधायला सुरुवात केली होती. त्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी आपवरच टीका केली. आपला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आमची नाही, आम्ही राजकीय पक्ष आहोत, असं सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या. सुप्रिया श्रीनेत यांच्या या विधानावरुन वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ढोंगीपणालाही मर्यादा असतात, असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं आहे.

"आम्ही आम आदमी पार्टीला विजयी करण्याची जबाबदारी घेतलेली नाही. आम आदमी पार्टीला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आमची नाही. आम्ही एनजीओ नाही, आम्ही एक राजकीय पक्ष आहोत," असं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं. त्यावर वंचित बहुजन आघाडीने एक्स पोस्टवरुन सुप्रिया श्रीनेत यांच्यावर हल्लाबोल केला.

"व्वा, ताई, व्वा! ढोंगीपणालाही मर्यादा असतात. लोकसभा निवडणुकीनंतर वंचितने काँग्रेसचा कसा पराभव केला याचे विश्लेषण करणाऱ्या याच महिला आहेत. पण काय करताय साहेब! आम्ही एका छोट्या जातीचे आहोत. आम्ही वंचितांचा आणि बहुजनांचा आवाज उठवतो. बी-टीम म्हणून शिव्या फक्त आम्हालाच देण्यात येतात आणि लोक त्यांना राजकीय पक्ष म्हणतात. हा जातिवाद नाही तर काय आहे?", असा सवाल वंचित बहुजन आघाडीने विचारला आहे.

आप आणि काँग्रेसने एकत्र यायला हवे होते - संजय राऊत

"महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीतही राबवण्यात आला. मतदार यादीत घोळ झाला आहे. निवडणूक आयोग शांत बसला होता. काँग्रेस आणि आप यांच्यात युती झाली असती तर बरे झाले असते. 'आप' आणि काँग्रेसमध्ये युती व्हायला हवी होती, असे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो. भाजपचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र यायला हवे होते," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025congressकाँग्रेसBJPभाजपा