शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

"व्वा, ताई बी टीम म्हणून शिव्या आम्हालाच देता आणि..."; काँग्रेसच्या पराभवानंतर वंचितने साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:16 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसवर टीका केली

Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळवत भाजपने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा दारुण पराभव केला. भाजपने २७ वर्षांनी दिल्लीत सत्ता मिळवली आहे. दुसरीकडे, दिल्ली विधानसभेच्या ७० जागांपैकी काँग्रेसला एकही जागा मिळवता आलेली नाही. या निवडणुकीत इंडिया आघाडीत एकत्र असलेल्या काँग्रेस आणि आपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता निकालानंतरी काँग्रेसने आपवर निशाणा साधला होता. यावरुनच वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला लक्ष्य केलं आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर येताच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेस आणि आपवर निशाणा साधायला सुरुवात केली होती. त्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी आपवरच टीका केली. आपला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आमची नाही, आम्ही राजकीय पक्ष आहोत, असं सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या. सुप्रिया श्रीनेत यांच्या या विधानावरुन वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ढोंगीपणालाही मर्यादा असतात, असं वंचित बहुजन आघाडीने म्हटलं आहे.

"आम्ही आम आदमी पार्टीला विजयी करण्याची जबाबदारी घेतलेली नाही. आम आदमी पार्टीला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आमची नाही. आम्ही एनजीओ नाही, आम्ही एक राजकीय पक्ष आहोत," असं सुप्रिया श्रीनेत यांनी म्हटलं. त्यावर वंचित बहुजन आघाडीने एक्स पोस्टवरुन सुप्रिया श्रीनेत यांच्यावर हल्लाबोल केला.

"व्वा, ताई, व्वा! ढोंगीपणालाही मर्यादा असतात. लोकसभा निवडणुकीनंतर वंचितने काँग्रेसचा कसा पराभव केला याचे विश्लेषण करणाऱ्या याच महिला आहेत. पण काय करताय साहेब! आम्ही एका छोट्या जातीचे आहोत. आम्ही वंचितांचा आणि बहुजनांचा आवाज उठवतो. बी-टीम म्हणून शिव्या फक्त आम्हालाच देण्यात येतात आणि लोक त्यांना राजकीय पक्ष म्हणतात. हा जातिवाद नाही तर काय आहे?", असा सवाल वंचित बहुजन आघाडीने विचारला आहे.

आप आणि काँग्रेसने एकत्र यायला हवे होते - संजय राऊत

"महाराष्ट्र पॅटर्न दिल्लीतही राबवण्यात आला. मतदार यादीत घोळ झाला आहे. निवडणूक आयोग शांत बसला होता. काँग्रेस आणि आप यांच्यात युती झाली असती तर बरे झाले असते. 'आप' आणि काँग्रेसमध्ये युती व्हायला हवी होती, असे आम्ही पहिल्या दिवसापासून म्हणत होतो. भाजपचा पराभव करण्यासाठी आपण एकत्र यायला हवे होते," असं संजय राऊत यांनी म्हटलं.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025congressकाँग्रेसBJPभाजपा