शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

वंचित बहुजन आघाडी आणि मविआ युती फिस्कटली?; संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2024 10:46 IST

अघोरी शक्ती, धनशक्ती यावर राहुल गांधी बोलले. दैवीशक्ती नाही. वारंवार मोदींना रडायची सवय आहे ते बंद करावे असंही राऊतांनी म्हटलं.

मुंबई - Sanjay Raut on Prakash Ambedrkar ( Marathi Newsवंचित बहुजन आघाडीचेप्रकाश आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत. त्यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. आम्ही त्यांना ४ जागांवर लढावे हा प्रस्ताव दिला. परंतु त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसतेय. तो प्रस्ताव मान्य केला असता तर नक्की आम्हाला आनंद झाला असता असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीवर भाष्य केले आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, हुकुमशाही विरोधातील लढ्याला संविधान वाचवण्याच्या लढाईला बाळासाहेब आंबेडकर हे आमच्यासोबत असण्यानं गती आणि बळ मिळालं असते. पण आम्हाला अजूनही खात्री आहे. सगळे प्रमुख नेते एकत्रित बसतील आणि ते पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील. त्यांच्या मनात जर काही नाराजी, अस्वस्थता असेल तर ती दूर करण्यात आम्हाला यश येईल. या लढाईत महाराष्ट्रातील दलित, शोषित वंचित समाज आमच्यासोबत असायलाच पाहिजे ही आमची भूमिका आहे असं त्यांनी सांगितले. 

तर सांगलीच्या जागेवर आम्ही ठाम आहोत. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूरची जागा महाविकास आघाडीत ऐक्य राहावे यासाठी दिली आहे. तिथे विद्यमान खासदार शिवसेनेचा आहे. हातकणंगलेच्या जागेवर आमची राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील एखादी जागा आमच्याकडे असावी आणि ती आम्ही ताकदीने लढावी. ही आमची भूमिका असेल तर त्यात काही चुकीचे असेल वाटत नाही असं सांगत राऊतांनी पुन्हा सांगलीच्या जागेवर दावा सांगितला. 

दरम्यान, आमचं भाषण पंतप्रधान ऐकतात, २-४ वाक्य ऐकतात आणि त्यावर पुढची रणनीती बनवतात. राहुल गांधींनी शिवाजी पार्कवर भाषण केले त्यात एक शक्ती मोदींच्या मागे आहे असं बोलले, त्यावर मोदी रडायला लागले. अघोरी शक्ती, धनशक्ती यावर राहुल गांधी बोलले. दैवीशक्ती नाही. वारंवार मोदींना रडायची सवय आहे ते बंद करावे. देशाचे पंतप्रधान आहेत असा टोलाही राऊतांनी पंतप्रधानांना लगावला. 

आम्ही औरंगजेबावर बोललो, मोदी कुठून आले? 

जिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचा जन्म झाला तिथे आमची सभा होती. महाराष्ट्रावर काही लोक दिल्ली, गुजरातहून आक्रमण करतायेत. परंतु ज्याप्रकारे महाराष्ट्राने ज्याप्रकारे औरंगजेबाचे आक्रमण संपवले, त्याची कबर महाराष्ट्रात खोदली. त्यामुळे याठिकाणी औरंगजेबाची वागणूक चालणार नाही. यात मोदीजी कुठे आहे. आमची देशभक्ती, राष्ट्रवादाची डिक्सनरी आहे. त्यांचा स्वार्थाची डिक्सनरी आहे. पंतप्रधानपदाची गरिमा ठेवावी अशी टीका राऊतांनी मोदींवर केली. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Rautसंजय राऊतMahavikas Aghadiमहाविकास आघाडीVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४