शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वाल्मीक कराडचं आत्मसमर्पण; उद्धव ठाकरेंच्या गोटातून आलेल्या प्रतिक्रियेने भुवया उंचावल्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 19:05 IST

आरोपी पुण्यासारख्या शहरात येऊन आत्मसमर्पण करतो, मात्र त्याआधी त्याच्यापर्यंत आपली तपास यंत्रणा पोहचू न शकल्याने विरोधी पक्षातून टीका होत आहे.

Walmik Karad: बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी फरार असलेला आरोपी वाल्मीक कराड याने आज सीआयडीच्या पुणे कार्यालयात आत्मसमर्पण केले. मागच्या २२ दिवसांपासून फरार असलेल्या वाल्मीक कराडला बेड्या ठोकण्यात अपयश आलेल्या पोलीस प्रशासनावर टीका होत आहे. महाराष्ट्राभर ज्या हत्या प्रकरणामुळे संताप व्यक्त केला जात होता त्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी पुण्यासारख्या शहरात येऊन आत्मसमर्पण करतो, मात्र त्याआधी त्याच्यापर्यंत आपली तपास यंत्रणा पोहचू न शकल्याने विरोधी पक्षातून टीका होत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषद आमदार मिलिंद नार्वेकर यांनी मात्र कराड हा शरण येताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

मिलिंद नार्वेकर यांनी म्हटलं आहे की, "मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड आज पुण्यात सीआयडीला शरण आला. याबद्दल  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पोलीस महासंचालक रश्मी शुक्लाजी यांचे अभिनंदन," अशी पोस्ट नार्वेकर यांनी सोशल मीडियावर केली आहे.

काँग्रेसने काय आरोप केलाय?

वाल्मिक कराड याच्या आत्मसमर्पणावरून काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुरावे नष्ट केल्यावर वाल्मीक कराडने सरेंडर केले? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी एक्सवरील पोस्टमध्ये केला आहे. "खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर २२ दिवस पोलीस-सीआयडी वाल्मीक कराडला पकडू शकले नाही. इतकेच नाही तर आज सरेंडर होताना हा कराड स्वतःच्या गाडीतून येतो. महाराष्ट्र पोलीस आणि गृहखात्याचे याहून मोठे अपयश असू शकत नाही! इतके दिवस वाल्मीक कराडला लपायला कोणी मदत केली? कोणाच्या संपर्कात तो होता? कोणाच्या सांगण्यावरून आज सरेंडर झाले या सगळ्यांचे सत्य समोर आले पाहिजे. महायुती सरकार आणि मंत्रिमंडळातील मोठ्या मंत्र्याविरोधात जनतेत वाढत असलेला रोष  बघता अखेर त्याला वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शक्तींनी सरेंडर करण्याचे आदेश दिले आहेत का?" असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडUddhav Thackerayउद्धव ठाकरेMilind Narvekarमिलिंद नार्वेकर