शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
3
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
4
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
5
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
6
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
7
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
8
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
9
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
10
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
11
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
12
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
13
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
14
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
15
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
16
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
17
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
18
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
19
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
20
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेश; पाकिस्तानला लागणार मिरची..!

झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग

By admin | Updated: March 3, 2017 01:28 IST

रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबरच माणसांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

जयदीप हिरवे,पेठ- रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबरच माणसांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी झिरो बजेट नैसर्गिकशेती हाच एकमेव पर्याय असल्याने पेठ येथील उमेश कंधारे या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत लसूण या पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.कंधारे यांनी सुमारे ४० गुंठे शेतीक्षेत्रात लसूण या पिकाच्या ४ गोण्यांची लागवड केली. या लसूण पिकामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा या पिकाचेदेखील यशस्वी उत्पादन त्यांनी घेतले. शेतात सऱ्या पाडून लसूण पिकाची लागवड करण्यात आली. दोन सऱ्यांमध्ये टोकण पद्धतीने हरभरा पीक घेतले. लसूण पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरण्यात आली. लसूण पिकाची लागवड, मजुरी व काढणीसाठी असा एकूण ४५ ते ५० हजार रुपये भांडवली खर्च आला. सुमारे साडेतीन महिन्यांतच लसूण काढणीस आला. लसणाच्या एका गोणीपाठीमागे १० गोण्या अशा एकूण ४० गोणी लसूण पिकाचे भरघोस उत्पादन निघाले.शेतीतज्ज्ञ सुभाष पालेकर यांच्यापासून प्रेरणा घेत कंधारे यांनी आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे झिरो बजेट नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली. कंधारे यांनी सर्वप्रथम देशी गायींचे संगोपन करण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या गोठ्यात ५ देशी गायी आहेत. देशी गायीचे दूध व मलमूत्र आरोग्यवर्धक आहे. तसेच शेतामध्येही मलमूत्रापासून तयार केलेल्या जीवामृतच्या फवारण्या केल्या आहेत.मोकळी हवा व चांगल्या सूर्यप्रकाशामुळे लसणाचे पीक जोमदार आले. त्यात ठिबकने पाणीपुरवठा असल्याने पिकाला गरजेपुरतेच पाणी मिळाले. देशी गाईचे मलमूत्र, शेण, गूळ व डाळीच्या पिठापासून तयार केलेले जीवामृत याचा वापर केल्याने पिकांच्या अंगात अधिक रोगप्रतिकारक शक्ती येते. याचबरोबर वेगवेगळे औषधी गुणधर्म असणाऱ्या १० झाडांचा पाला देशी गायीच्या गोमूत्रात कुजवून त्याचे दशपर्णी अर्क तयार करून त्याच्या तीन फवारण्या या लसूण पिकावर करण्यात आल्या. याचबरोबर जीवामृत एकदा पाण्याबरोबर सोडण्यात आले, एकदा पिकांवर शिंपडले व एकदा त्याची फवारणी करण्यात आली. सर्वांत शेवटी अंतिम टप्यात देशी गायीच्या ताकाची एकदा संपूर्ण पिकावर फवारणी केली असल्याचे कंधारे यांनी सांगितले. >जमिनीची सुपीकता चांगली राहतेउमेश कंधारे या तरुण शेतकऱ्याने झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा अवलंब करत शेतीमध्ये त्यांनी स्वत:ला अक्षरक्ष: वाहून घेतले आहे. त्यांच्याकडे या नैसर्गिक शेतीचे कृषी पदवीधरापेक्षाही अधिक ज्ञान आहे. सर्वांनीच या नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. जेणेकरून जमिनीच्या सुपीकतेबरोबरच मानवाचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असल्याचे कंधारे सांगतात.