शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग

By admin | Updated: March 3, 2017 01:28 IST

रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबरच माणसांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

जयदीप हिरवे,पेठ- रासायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबरच माणसांचेही आरोग्य धोक्यात आले आहे. यासाठी झिरो बजेट नैसर्गिकशेती हाच एकमेव पर्याय असल्याने पेठ येथील उमेश कंधारे या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतात झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा प्रयोग करत लसूण या पिकाचे यशस्वी उत्पादन घेतले आहे.कंधारे यांनी सुमारे ४० गुंठे शेतीक्षेत्रात लसूण या पिकाच्या ४ गोण्यांची लागवड केली. या लसूण पिकामध्ये आंतरपीक म्हणून हरभरा या पिकाचेदेखील यशस्वी उत्पादन त्यांनी घेतले. शेतात सऱ्या पाडून लसूण पिकाची लागवड करण्यात आली. दोन सऱ्यांमध्ये टोकण पद्धतीने हरभरा पीक घेतले. लसूण पिकाला पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धत वापरण्यात आली. लसूण पिकाची लागवड, मजुरी व काढणीसाठी असा एकूण ४५ ते ५० हजार रुपये भांडवली खर्च आला. सुमारे साडेतीन महिन्यांतच लसूण काढणीस आला. लसणाच्या एका गोणीपाठीमागे १० गोण्या अशा एकूण ४० गोणी लसूण पिकाचे भरघोस उत्पादन निघाले.शेतीतज्ज्ञ सुभाष पालेकर यांच्यापासून प्रेरणा घेत कंधारे यांनी आपल्या शेतात रासायनिक खतांचा वापर न करता संपूर्णपणे झिरो बजेट नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली. कंधारे यांनी सर्वप्रथम देशी गायींचे संगोपन करण्यास सुरुवात केली. आज त्यांच्या गोठ्यात ५ देशी गायी आहेत. देशी गायीचे दूध व मलमूत्र आरोग्यवर्धक आहे. तसेच शेतामध्येही मलमूत्रापासून तयार केलेल्या जीवामृतच्या फवारण्या केल्या आहेत.मोकळी हवा व चांगल्या सूर्यप्रकाशामुळे लसणाचे पीक जोमदार आले. त्यात ठिबकने पाणीपुरवठा असल्याने पिकाला गरजेपुरतेच पाणी मिळाले. देशी गाईचे मलमूत्र, शेण, गूळ व डाळीच्या पिठापासून तयार केलेले जीवामृत याचा वापर केल्याने पिकांच्या अंगात अधिक रोगप्रतिकारक शक्ती येते. याचबरोबर वेगवेगळे औषधी गुणधर्म असणाऱ्या १० झाडांचा पाला देशी गायीच्या गोमूत्रात कुजवून त्याचे दशपर्णी अर्क तयार करून त्याच्या तीन फवारण्या या लसूण पिकावर करण्यात आल्या. याचबरोबर जीवामृत एकदा पाण्याबरोबर सोडण्यात आले, एकदा पिकांवर शिंपडले व एकदा त्याची फवारणी करण्यात आली. सर्वांत शेवटी अंतिम टप्यात देशी गायीच्या ताकाची एकदा संपूर्ण पिकावर फवारणी केली असल्याचे कंधारे यांनी सांगितले. >जमिनीची सुपीकता चांगली राहतेउमेश कंधारे या तरुण शेतकऱ्याने झिरो बजेट नैसर्गिक शेतीचा अवलंब करत शेतीमध्ये त्यांनी स्वत:ला अक्षरक्ष: वाहून घेतले आहे. त्यांच्याकडे या नैसर्गिक शेतीचे कृषी पदवीधरापेक्षाही अधिक ज्ञान आहे. सर्वांनीच या नैसर्गिक शेतीचा अवलंब केला पाहिजे. जेणेकरून जमिनीच्या सुपीकतेबरोबरच मानवाचेही आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असल्याचे कंधारे सांगतात.