शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टोलनाक्यांवर नवीन टोल प्रणाली सुरु; चाचणीनंतर वर्षभरात देशभर...; गडकरींची लोकसभेला माहिती
2
आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
3
FD पेक्षा जास्त परतावा देणाऱ्या 'या' ३ सरकारी योजना: तुमचे भविष्य होईल सुरक्षित, टॅक्समध्येही मोठी सूट!
4
पंतप्रधान मोदींसोबत कारमध्ये काय चर्चा झाली? पुतिन यांनी सांगितला चीनमधील 'तो' किस्सा...
5
"आम्ही कठीण प्रसंगातून जात आहोत...", भावाचं लग्न पुढे ढकलल्यानंतर पलक मुच्छलची प्रतिक्रिया
6
मोबाईलच्या चार्जरमुळे मुलाला लागला शॉक; तुमच्यासोबतही घडू शकते दुर्घटना! 'या' चुका आधीच टाळा
7
२००० मंत्र, २०० वर्ष असाध्य; १९ वर्षीय देवव्रतने ५० दिवसात केलेले दंडक्रम पारायण नेमके काय?
8
गुगल सर्चवर काय काय शोधत होते भारतीय? आत्ताची धर्मेंद्र यांच्या मृत्यूची अफवा ते जानेवारीपर्यंत...
9
तुमचा खिसा हलका होणार! मोबाईल, टीव्ही, एसी आणि गाड्यांच्या दरात ३ ते १० टक्क्यांची वाढ अटळ
10
AUS vs ENG : ऑस्ट्रेलियन सुंदरीचा 'तो' मेसेज अन् अखेर इंग्लंडच्या जो रुटचा शतकी दुष्काळ संपला!
11
पुतिन फक्त लँडलाइन का वापरतात? स्मार्टफोन टाळण्यामागे आहे भीती; हातही लावत नाहीत
12
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक! IT शेअर्सच्या बळावर सेन्सेक्स-निफ्टी हिरव्या रंगात बंद; टॉप गेनर्स-लूजर्स
13
वक्री गुरूचा गजकेसरी राजयोग: १० राशींना सुख-सुबत्ता, धनलक्ष्मी भरघोस देईल; ५४ तास वरदान काळ!
14
मदीनाहून १८० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बची धमकी, अहमदाबादमध्ये आपत्कालीन लँडिंग
15
'पंतप्रधान मोदी कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाहीत', ट्रम्प यांच्या 'टॅरिफ वॉर'वर व्लादिमीर पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं
16
पुतीन यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे फाईव्ह स्टार हॉटेल्सची चांदी, किमान भाडं ₹८५ हजारांच्या पार
17
सर्वात कर्जबाजारी देशांमध्ये अमेरिकेचाही आहे समावेश! बलाढ्य देशाला कोण देते कर्ज? जाणून घ्या..
18
"मी सर्वांचा नाश करेन", पूनमच्या शरीरात शिरायचा आत्मा; कुटुंबीयांनी सांगितलं कसं बदललं वागणं?
19
जैशची नवी 'लेडी आर्मी'! मसूद अजहरचा धक्कादायक खुलासा; मोठ्या कटासाठी ५००० हून अधिक महिलांची भरती
20
साधुग्रामसाठी राखीव १५० एकर जागा कुठे गायब झाली?; कुणाच्या आशीर्वादाने?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या पीक नुकसानीवर केंद्रीय कृषी मंत्र्यांचे २४ तासांत घुमजाव; कर्जमाफीसाठी दोन निवेदने मिळाल्याने गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:00 IST

महाराष्ट्रातील पीक नुकसानीवर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी केलेल्या विधानाने नवा गोंधळ निर्माण झाला आहे.

Maharashtra Loan Waiver: महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड पीक नुकसानीसाठी राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी कोणतेही निवेदन  पाठवले नसल्याचे विधान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंगळवारी संसदेत केले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर हे घडल्याने, महायुती सरकारला विरोधकांनी धारेवर धरलं. मात्र टीका सुरू होताच आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधवारी २७ नोव्हेंबर रोजी राज्याकडून निवेदन प्राप्त झाल्याचे स्पष्ट करत आपल्या विधानात बदल केला.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, राज्याने पीक नुकसानीच्या संदर्भात दोन निवेदन केंद्राकडे पाठवले आहेत. यापैकी एक २७ नोव्हेंबर रोजी आणि दुसरे १ डिसेंबर रोजी पाठवले गेले. राज्याच्या अंदाजानुसार, हे नुकसान जवळपास १०,००० कोटी रुपयांच्या घरात आहे. राज्य सरकारने केंद्राला दिलेल्या निवेदनात १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीतील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा उल्लेख केला. यानुसार, ८४ लाख हेक्टरवरील पीक नष्ट झाले  तर १.१ कोटी शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

यापूर्वी ऑक्टोबरमध्ये राज्याचा प्राथमिक अंदाज ६८.७ लाख हेक्टर पीक नष्ट झाल्याचा होता, पण 'पंचनामे' पूर्ण झाल्यावर नुकसानीची ही व्याप्ती खूप मोठी असल्याचे स्पष्ट झाले. राज्याने दोन निवेदन पाठवले असले तरी, केंद्राकडून मदतीची अंतिम रक्कम निश्चित करण्यापूर्वी केंद्र सरकारसोबत अनेक बैठका आणि चर्चा होतील, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं.

राज्याची मदत आणि कर्जाचा मुद्दा

राज्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाऊस थांबायला वेळ लागल्याने पंचनामे पूर्ण करण्यास उशीर झाला. मात्र, राज्य सरकारने आतापर्यंत जवळपास १४,००० कोटी रुपयांची मदत वितरित केली आहे. यापूर्वी ऑक्टोबरमध्ये सरकारने ३१,६२८ कोटी रुपयांचे विक्रमी मदत पॅकेज जाहीर केले होते, ज्यात पीक नुकसानीसोबतच पायाभूत सुविधांच्या नुकसानीसाठीही तरतूद करण्यात आली होती.

या घटनेनंतर विरोधी पक्षांनी सत्ताधारी महायुतीला लक्ष्य केले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेली पोस्ट आणि केंद्रीय मंत्र्यांनी बदललेले विधान, यामुळे केंद्राकडून मदतीचा ओघ सुरू होण्यास होत असलेल्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफी आणि तातडीच्या मदतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

जमिनीच्या नुकसानीसाठी विशेष मदत

सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात झालेली अतिवृष्टी इतकी तीव्र होती की अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे. यासाठी राज्य सरकार प्रती हेक्टर *४७,००० आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून ३ लाख पर्यंतची मदत पुरवत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Central Minister's U-turn on Maharashtra Crop Loss; Confusion Over Aid.

Web Summary : Union Agriculture Minister initially denied receiving Maharashtra's crop loss report, then reversed his statement. Two reports were submitted requesting ₹10,000 crore in aid after extensive crop damage affecting millions of farmers. The state government has already distributed ₹14,000 crore in assistance.
टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCrop Loanपीक कर्ज