शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
3
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
7
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
8
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
9
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
10
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
11
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
12
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
13
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
14
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
16
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
17
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
18
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
19
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
20
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
Daily Top 2Weekly Top 5

उंबर्डेवासीयांची न्यायालयात धाव

By admin | Updated: May 12, 2015 02:02 IST

केडीएमसी परिक्षेत्रातील घनकचऱ्याचा मुद्दा दिवसागणिक चिघळत चालला आहे. आता उंबर्डेवासीयांनीदेखील कचरा डम्पिंगच्या विरोधात उच्च

कल्याण : केडीएमसी परिक्षेत्रातील घनकचऱ्याचा मुद्दा दिवसागणिक चिघळत चालला आहे. आता उंबर्डेवासीयांनीदेखील कचरा डम्पिंगच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्याने घनकचऱ्याच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.घनकचऱ्याच्या मुद्यावर कार्यवाहीचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या केडीएमसीला फटकारताना उच्च न्यायालयाने नव्या बांधकामांना परवानगी देण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करत नाही तसेच घनकचऱ्याबाबत ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत नवीन बांधकामे करण्यास परवानगी नाही, असे पुनश्च सुनावण्यात आले आहे. यावर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उंबर्डे येथे उभारण्याचा निर्णय केडीएमसी प्रशासनाने घेतला आहे. तसेच हा प्रकल्प उभारण्यासाठी लागणारा १८ महिन्यांचा कालावधी पाहता तोपर्यंत मांडा आणि बारावे येथे कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे.दरम्यान, मांडावासीयांनी यास विरोध दर्शविला असताना उंबर्डेवासीयांनी तर आता न्यायालयात धाव घेतली आहे. आधारवाडी येथील डम्पिंग ग्राउंड बंद करून उंबर्डे येथे कचरा डम्प करण्याचा केडीएमसीच्या महासभेने २६ जून २०१३ रोजी केलेला ठराव रद्द करावा, या प्रमुख मागणीबरोबरच कचरा डम्प केल्यास १ लाख ७ हजार नागरिकांना याचा त्रास होणार आहे. उल्हास नदी नजीक असल्याने तीही यामुळे प्रदूषित होईल, तसेच घनकचरा प्रकल्प राबविण्यासंदर्भात महापालिकेचे कोणतेही नियोजन नाही. उंबर्डेआणि आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले आणि इमारती, शाळा उभ्या राहत आहेत. प्रदूषित वातावरणाचा त्यांनाही त्रास होणार असल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. (प्रतिनिधी)