शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगर : चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात पाणी टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 18:08 IST

उल्हासनगरात पाण्यासाठी महिलांचे ठिय्या व रस्ता रोखो आंदोलन. अधिकाऱ्याचे पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत करण्याचे आश्वासन.

ठळक मुद्देउल्हासनगरात पाण्यासाठी महिलांचे ठिय्या व रस्ता रोखो आंदोलन.अधिकाऱ्याचे पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत करण्याचे आश्वासन.

उल्हासनगर : कॅम्प नं-३ परिसरातील चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात गेल्या महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या निषेधार्थ महिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ ठिय्या व रस्ता रोखो आंदोलन केले. यानंतर एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पाणी पुरवठा विभागाने दिले.

उल्हासनगरात पाणी पुरवठ्याचे वितरण असमान होत असून  काही ठिकाणी दिवसाला दोन वेळा तर शहर पूर्वेला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. कॅम्प नं-३ चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात गेल्या महिन्यापासून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांत नाराजी निर्माण झाली. काही दिवसा पासून टाकलेल्या नवीन जलवाहिनीतून पाणी पुरवठा न झाल्याने, जुन्याच जलवाहिनीतून पाणी पुरवठा करण्याची मागणी झाली. मात्र शेकडो महिला गुरवारी रस्त्यावर येऊन, त्यांनी चोपडा कोर्ट चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या खाली ठिय्या आंदोलन केले. पाणी द्या, पाणी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले. महापालिका पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासह देऊनही महिला व नागरिक ऐकत नव्हते. 

महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी आंदोलन करणाऱ्या महिला पैकी काही जणांना कार्यकारी अभियंता कार्यालयात चर्चेला बोलाविले. जुन्या जलकुंभात पुरेसा पाणी साठा जमा होत नसल्याने व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने चोपडा कोर्ट व आंबेडकरनगर परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती दिली. दोन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असलेतरी एक आठवडा पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी लागेल, असे रहेजा म्हणाले. शहर पूर्वेतील बहुतांश भागात दिवसाआड व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने, नागरिकांत खदखद आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाने शहर पूर्वेतील पाणी टंचाई सोडविली नाहीतर, येथेही असाच उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

शिवसेना नगरसेवकावर नाराजीकॅम्प नं-३ चोपडा व आंबेडकरनगर परिसरातून सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले. सत्तेत असूनही पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने, सर्वस्तरातून टीका होत आहे. पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी