शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

उल्हासनगर : चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात पाणी टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 18:08 IST

उल्हासनगरात पाण्यासाठी महिलांचे ठिय्या व रस्ता रोखो आंदोलन. अधिकाऱ्याचे पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत करण्याचे आश्वासन.

ठळक मुद्देउल्हासनगरात पाण्यासाठी महिलांचे ठिय्या व रस्ता रोखो आंदोलन.अधिकाऱ्याचे पाणीपुरवठा लवकरच पूर्ववत करण्याचे आश्वासन.

उल्हासनगर : कॅम्प नं-३ परिसरातील चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात गेल्या महिन्यापासून पाणी टंचाई निर्माण झाल्याच्या निषेधार्थ महिलांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ ठिय्या व रस्ता रोखो आंदोलन केले. यानंतर एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन पाणी पुरवठा विभागाने दिले.

उल्हासनगरात पाणी पुरवठ्याचे वितरण असमान होत असून  काही ठिकाणी दिवसाला दोन वेळा तर शहर पूर्वेला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. कॅम्प नं-३ चोपडा कोर्ट, आंबेडकरनगर परिसरात गेल्या महिन्यापासून कमी दाबाने व अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांत नाराजी निर्माण झाली. काही दिवसा पासून टाकलेल्या नवीन जलवाहिनीतून पाणी पुरवठा न झाल्याने, जुन्याच जलवाहिनीतून पाणी पुरवठा करण्याची मागणी झाली. मात्र शेकडो महिला गुरवारी रस्त्यावर येऊन, त्यांनी चोपडा कोर्ट चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या खाली ठिय्या आंदोलन केले. पाणी द्या, पाणी द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडले. महापालिका पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांनी एका आठवड्यात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासह देऊनही महिला व नागरिक ऐकत नव्हते. 

महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर रहेजा यांनी आंदोलन करणाऱ्या महिला पैकी काही जणांना कार्यकारी अभियंता कार्यालयात चर्चेला बोलाविले. जुन्या जलकुंभात पुरेसा पाणी साठा जमा होत नसल्याने व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने चोपडा कोर्ट व आंबेडकरनगर परिसरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती दिली. दोन दिवसात समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले असलेतरी एक आठवडा पाणी पुरवठा नियमित करण्यासाठी लागेल, असे रहेजा म्हणाले. शहर पूर्वेतील बहुतांश भागात दिवसाआड व कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने, नागरिकांत खदखद आहे. महापालिका पाणी पुरवठा विभागाने शहर पूर्वेतील पाणी टंचाई सोडविली नाहीतर, येथेही असाच उद्रेक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

शिवसेना नगरसेवकावर नाराजीकॅम्प नं-३ चोपडा व आंबेडकरनगर परिसरातून सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले. सत्तेत असूनही पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्याने, सर्वस्तरातून टीका होत आहे. पाणी टंचाईची समस्या कायमस्वरूपी सोडविण्याची मागणी आंदोलनकर्त्या महिलांनी यावेळी केली.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी