शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

उजनी धरणाने गाठली मायनस ३५.६६ टक्केवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 11:56 IST

उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या बेसुमार पाण्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त.

ठळक मुद्देउजनी धरणात सध्या एकूण पाणीपातळी ४८७.८६० मीटर आहेउजनीत राहिलेले पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट अनधिकृत वीजपंप तातडीने बंद करून त्याचा वीजपुरवठा तातडीने पूर्णपणे खंडित

भीमानगर : उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या बेसुमार पाण्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला असून, त्यातच कृष्णा खोरे महामंडळाकडून पुण्याच्या विभागीय आयुक्तांना पत्र देऊन उजनी काठच्या भागातील पाण्याच्या उपशावर नियंत्रण आणण्यासाठीच्या उपाययोजना सुचविल्या आहेत.

उजनी धरणात सध्या एकूण पाणीपातळी ४८७.८६० मीटर आहे. एकूण पाणीसाठा १२६१.८२ दलघमी, उपयुक्त पाणीसाठा मायनस ५४०.९९ दलघमी, उजनीची टक्केवारी मायनस ३५.६६ टक्क्यांवर गेली आहे. एकूण टक्केवारी ४४.५६ तर उपयुक्त टक्केवारी १९.१० आहे.

गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीची पाणीपातळी प्लस १४.९३ टक्के होती. यंदाच्या पातळीत बरीच घट दिसत आहे. अजून मे आणि जून हे दोन महिने पाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने यंदा पाण्याचे संकट अधिक गडद होणार, असे जाणवत आहे.उजनीत राहिलेले पाणी काटकसरीने वापरण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे.

कालवा सल्लागार समितीच्या नियोजनानुसार सोलापूर शहर, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा व भीमा नदीकाठच्या पाणीपुरवठा योजनेसाठी भीमा नदीवरील एक आवर्तन द्यायचे शिल्लक आहे. ते येत्या १५ मे रोजी सोडण्यात येणार आहे. येणाºया काळात वेळेत पाऊस न झाल्यास जुलै २०१९ नंतर पाणी पिण्यासाठी ठेवण्याची खबरदारीही यंत्रणेला घ्यावी लागणार आहे. 

या सर्वांचा विचार करता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर, दौंड व नगर जिल्ह्यातील कर्जत व श्रीगोंदा या तालुक्यातील उजनी धरणाकाठी असलेले अनधिकृत वीजपंप तातडीने बंद करून त्याचा वीजपुरवठा तातडीने पूर्णपणे खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ