शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, राजकीय नाट्यावर पडदा; फडणवीस हाेणार नवे मुख्यमंत्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 6:23 AM

Maharashtra Political Crisis: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी विशेष अधिवेशन घेऊन आघाडी सरकारने २४ तासांच्या आत विश्वासमत सिद्ध करावे, असे आदेश दिले. त्यानुसार ३० जूनला विशेष अधिवेशन बोलविण्यातही आले.

मुंबई : विधानसभेत विश्वासमत सिद्ध करण्याला अवघे काही तास उरले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आघाडी सरकार कोसळले असून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासोबत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नवे उपमुख्यमंत्री असतील.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी विशेष अधिवेशन घेऊन आघाडी सरकारने २४ तासांच्या आत विश्वासमत सिद्ध करावे, असे आदेश दिले. त्यानुसार ३० जूनला विशेष अधिवेशन बोलविण्यातही आले. मात्र, शिवसेनेने लगेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. रात्री नऊ वाजता सर्वोच्च न्यायालयानेही विश्वासमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर अर्ध्याच तासात उद्धव ठाकरे यांनी जनतेशी ऑनलाइन संवाद साधत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. नंतर रात्री उशिरा राजभवनवर जाऊन त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला. २० जूनच्या रात्रीपासून घडलेल्या शिवसेनेतील बंडामुळे निर्माण झालेल्या नाट्यावर पडदा पडला.

प्रचंड वेगवान घडामोडी :  मंगळवारी सकाळपासून वेगवान घडामोडी घडल्या. २२ जूनपासून गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिंदे गटाचे आमदार रात्री गोव्याला पोहोचले. ते गुरुवारी सकाळी मुंबईत परततील.

सरकार वाचवण्यात अपयशशिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष/लहान पक्षांच्या आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार विश्वासमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना ठाकरे यांनी राजीनामा दिला.

आता पुढे काय?सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिलेले फडणवीस हे भक्कम संख्याबळासह पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.

फडणवीसांंचा आज सत्तास्थापनेचा दावादेवेंद्र फडणवीस हे आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना गुरुवारी देतील आणि शुक्रवारी (दि.१) फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विश्वासमत सिद्ध करण्यासाठीच शुक्रवारी विशेष अधिवेशन होणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने त्याची गरजच राहिली नाही. 

सर्वोच्च न्यायालयात काय घडले?राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज कायम राखला. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमताला सामोरे जाणे किंवा राजीनामा देणे, हे दोनच पर्याय आता महाविकास आघाडीपुढे उरले होते. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी राज्यपालांच्या बहुमत सिद्ध करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी आव्हान दिले होते. न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. सूर्य कांत यांच्या खंडपीठाने ही याचिका तातडीने सुनावणीसाठी घेतली. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेले युक्तीवाद साडेतीन तासानंतर रात्री साडेआठ वाजता संपले. रात्री ९ नंतर न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचा राज्यपालांचा आदेश कायम ठेवला.

यापूर्वी सुनील प्रभू यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी, बंडखोर आमदारांच्यावतीने नीरज किशन कौल व मनिंदर सिंग व सरकारची बाजू तुषार मेहता यांनी मांडली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ