शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, राजकीय नाट्यावर पडदा; फडणवीस हाेणार नवे मुख्यमंत्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 06:24 IST

Maharashtra Political Crisis: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी विशेष अधिवेशन घेऊन आघाडी सरकारने २४ तासांच्या आत विश्वासमत सिद्ध करावे, असे आदेश दिले. त्यानुसार ३० जूनला विशेष अधिवेशन बोलविण्यातही आले.

मुंबई : विधानसभेत विश्वासमत सिद्ध करण्याला अवघे काही तास उरले असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आघाडी सरकार कोसळले असून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांच्यासोबत बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नवे उपमुख्यमंत्री असतील.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी विशेष अधिवेशन घेऊन आघाडी सरकारने २४ तासांच्या आत विश्वासमत सिद्ध करावे, असे आदेश दिले. त्यानुसार ३० जूनला विशेष अधिवेशन बोलविण्यातही आले. मात्र, शिवसेनेने लगेच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. रात्री नऊ वाजता सर्वोच्च न्यायालयानेही विश्वासमत सिद्ध करण्याच्या राज्यपालांच्या आदेशावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर अर्ध्याच तासात उद्धव ठाकरे यांनी जनतेशी ऑनलाइन संवाद साधत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. नंतर रात्री उशिरा राजभवनवर जाऊन त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सोपवला. २० जूनच्या रात्रीपासून घडलेल्या शिवसेनेतील बंडामुळे निर्माण झालेल्या नाट्यावर पडदा पडला.

प्रचंड वेगवान घडामोडी :  मंगळवारी सकाळपासून वेगवान घडामोडी घडल्या. २२ जूनपासून गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले शिंदे गटाचे आमदार रात्री गोव्याला पोहोचले. ते गुरुवारी सकाळी मुंबईत परततील.

सरकार वाचवण्यात अपयशशिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष/लहान पक्षांच्या आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार विश्वासमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना ठाकरे यांनी राजीनामा दिला.

आता पुढे काय?सर्वात मोठ्या पक्षाचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहिलेले फडणवीस हे भक्कम संख्याबळासह पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.

फडणवीसांंचा आज सत्तास्थापनेचा दावादेवेंद्र फडणवीस हे आपल्याला पाठिंबा असलेल्या आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना गुरुवारी देतील आणि शुक्रवारी (दि.१) फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. विश्वासमत सिद्ध करण्यासाठीच शुक्रवारी विशेष अधिवेशन होणार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याने त्याची गरजच राहिली नाही. 

सर्वोच्च न्यायालयात काय घडले?राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेला बहुमत सिद्ध करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आज कायम राखला. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुमताला सामोरे जाणे किंवा राजीनामा देणे, हे दोनच पर्याय आता महाविकास आघाडीपुढे उरले होते. शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी राज्यपालांच्या बहुमत सिद्ध करण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आज सकाळी आव्हान दिले होते. न्या. जे. बी. पारडीवाला व न्या. सूर्य कांत यांच्या खंडपीठाने ही याचिका तातडीने सुनावणीसाठी घेतली. सायंकाळी ५ वाजता सुरू झालेले युक्तीवाद साडेतीन तासानंतर रात्री साडेआठ वाजता संपले. रात्री ९ नंतर न्यायालयाने बहुमत सिद्ध करण्याचा राज्यपालांचा आदेश कायम ठेवला.

यापूर्वी सुनील प्रभू यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी, बंडखोर आमदारांच्यावतीने नीरज किशन कौल व मनिंदर सिंग व सरकारची बाजू तुषार मेहता यांनी मांडली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ