शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

नामर्द राज्यकर्त्यांमुळेच मराठी भाषिकांवर अन्याय - उद्धव ठाकरे

By admin | Updated: July 28, 2014 10:27 IST

विद्यमान राज्यकर्ते नामर्द आणि शेळपट असल्यानेच बेळगावमधील सीमावासीयांना कर्नाटक सरकारचा अन्याय सोसावा लागतो अशा तिखट शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २८ - राज्यातील विद्यमान राज्यकर्ते नामर्द आणि शेळपट असल्यानेच बेळगावमधील सीमावासीयांना कर्नाटक सरकारचा अन्याय सोसावा लागतो अशा तिखट शब्दांत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सीमावादावर टीकास्त्र सोडले आहे. महाराष्ट्र सदनातील चपाती प्रकरणावरुन लोकसभेत निवेदन करुन 'कार्यतत्परता' दाखवणा-या केंद्र सरकारने कानडी दहशतवादावरही कार्यतत्परता दाखवून त्यावर लगाम घालावा अशी मागणीही ठाकरेंनी केंद्र सरकारकडे केली आहे. 
येळ्ळुरमधील महाराष्ट्र राज्याचा फलक कर्नाटक पोलिसांनी उद्धवस्त केला होता. तसेच फलक लावणा-या येळ्ळुरमधील ग्रामस्थांवर अमानूष लाठीमार करण्यात आला होता. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून सीमावासीयांच्या प्रश्नावर भाष्य केले आहे. यात उद्धव ठाकरे म्हणतात, महाराष्ट्र - कर्नाटक सीमारेषेवरील मराठी कुटुंबांचा 'रोजा' नसला तरी त्यांना दररोज कानडी अत्याचार सोसावा लागतो. मात्र दुर्दैवाने याविरोधात कोणीही आवाज उठवत नाही. बेळगावात मराठी अस्मितेची पुसटशी खूणही कर्नाटकच्या मस्तवाल सरकारला नको असून या कर्नाटकी अरेरावीला महाराष्ट्राच्या मर्द जनतेने उत्तर दिल्यास काय होईल याचा विचार त्यांनी करावा असा इशाराच त्यांनी दिला आहे. 
मुंबईत कर्नाटक संघ आणि कर्नाटक भवनाच्या इमारती दिमाखात उभ्या असतानाच कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचा फलकही चालत नाही असे ठाकरेंनी निदर्शनास आणून दिले. राज्यातील जनतेने मुंबईत हॉटेल्स, उद्योग चालवणा-या कानडी मंडळींच्या केसालाही धक्का लावला नसतानाच कर्नाटकात मराठी भाषिकांना पोलिस पायदळी तुडवतात. हे कृत्य हाफीज सईदच्या दहशतवादाप्रमाणे असून न्यायप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व कणखर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणात सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा असे ठाकरेंनी म्हटले आहे.