शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिलीप सोपलांबाबतचा निर्णय उद्धव ठाकरेच घेतील !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:01 IST

जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांची भूमिका ; विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपची युती

ठळक मुद्देजिल्हा आता दुष्काळी नाही, बरेच क्षेत्र सिंचनाखाली - तानाजी सावंत समांतर पाईपलाईन झाली तरच उजनीचे नियोजन शक्य  - तानाजी सावंत महाराष्ट्रातील १३५ जागा कोणत्या हे आम्ही सांगणे उचित होणार नाही - तानाजी सावंत

सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल माझे अभिनंदन करायला आले होते. त्यांनी अभिनंदन केले याचा अर्थ ते शिवसेनेत आले किंवा आम्ही त्यांना आमंत्रित केले. किंवा ते फारच आतुर आहेत, असा होत नाही. त्यांच्याबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील, असे स्पष्टीकरण जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी दिले. 

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीतही शिवसेना आणि भाजपची युती आहे. पण कशा पध्दतीने लढायचे याचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय नेतृत्व आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे घेतील. त्याप्रमाणे आम्हाला आदेश देतील. 

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला किती जागा मागायच्या हे ठरलेले नाही. पण जे काही करायचे आहे ते पक्ष प्रमुखांकडे करु. ते आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही जागा मागू. सध्या भाजपला १३५ आणि शिवसेनेला १३५ जागा देणे निश्चित झाले आहे. मित्रपक्षांना १८ जागा मिळतील. 

बार्शीची जागा सेनेकडे राहणार का?, असे विचारले असता सावंत म्हणाले, आज कोणत्याही एका जागेबद्दल बोलता येणार नाही. महाराष्ट्रातील १३५ जागा कोणत्या हे आम्ही सांगणे उचित होणार नाही. ते पक्ष प्रमुख सांगतील. आदेश आले की, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांगण्यापूर्वी माध्यमांना सांगू. जिल्ह्यात शिवसेनेला पहिल्यांदा माझ्या माध्यमातून मंत्रीपद मिळाले. माढा विधानसभेबाबत आताच काही सांगणार नाही. पण आम्ही जिंकण्याच्या ताकदीने लढणार आहोत. कुणाला कौल द्यायचा हे शेवटी मतदार ठरविणार आहेत.

जिल्हा आता दुष्काळी नाही, बरेच क्षेत्र सिंचनाखाली- सोलापूर जिल्हा आता दुष्काळी जिल्हा राहिला नाही, असे मतही तानाजी सावंत यांनी व्यक्त केले. बरेच क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. जिल्ह्यातील अनेक उताºयावर केवळ जिरायती असे दिसणार नाही. उजनीच्या पाण्याच्या नियोजन काटेकोरपणे गरजेचे आहे. या पध्दतीने काही कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे. हे पाणी १२ महिने पुरले पाहिजे. आदेश अधिकाºयांना दिले आहेत. 

समांतर पाईपलाईन झाली तरच उजनीचे नियोजन शक्य - जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी उजनीच्या नियोजनावर भाष्य केले. सोलापूर शहराला अर्धा टीएमसी पाणी लागते. पण त्यासाठी चार टीएमसी पाणी सोडावे लागते. वर्षभरात जवळपास १५ टीएमसी पाणी जादा लागते. त्यातून उजनीच्या पाण्याचे नियोजन बिघडते. जोपर्यंत उजनी ते सोलापूर ही नवी पाईप लाईन होत नाही तोपर्यंत पाणी असेच वाया जाणार. उजनीच्या मूळ आराखड्यानुसार पाण्याचे नियोजन होणार नाही.  

टॅग्स :SolapurसोलापूरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDilip Sopalदिलीप सोपल