शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 09:56 IST

Uddhav Thackeray News: शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, तर कर्जमुक्ती हवी आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray News: राज्य सरकारने शेतकऱ्यांना पीक विम्याचे २, ३ रुपये आणि ६ रुपये देऊन थट्टा केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मिळायला पाहिजे, सरकारचे पॅकेज आम्हाला मान्य नाही. मात्र, जे जाहीर केले ते तातडीने द्या, असा हल्लाबोल उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर केला. मराठवाड्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ठाकरे हे ४ दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोचक टोला लगावला.

मुख्यमंत्री म्हणाले की, या निमित्ताने का होईना पण उद्धव ठाकरे घराबाहेर पडले. आता त्यांना उद्या उत्तर देईन. अजून काय म्हणाले की, उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारतात, विकासावर बोललेले भाषण दाखवा आणि हजार रुपये मिळवा. मग मी मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या हेलिकॉप्टरने इथेच या आणि विकासाचे बोला, होऊन जाऊ दे. बंधारे फुटत गेले, चला बोला विकासाचे. मराठवाड्यात पाणी नाही, आले तर ते थांबतच नाही अशी स्थिती आहे. काय विकासाचे बोलू मी? कुणासमोर बोलू? जो अन्नदाता आपल्याकडे आशेने पाहतो आहे त्याला काय सांगू उद्या पाच पदरी उड्डाण पूल उभारेन. तुम्ही म्हणाल घाला खड्ड्यात तो उड्डाण पूल. आत्ता काय करू ते सांग. काय विकासाचे बोलू? या शब्दांत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला. 

अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद

यांच्या उद्योगपती मित्रांची कर्जे माफ होत आहेत, ते परदेशात पळत आहेत. तुमच्यापैकी एक जण तरी परदेशात पळू शकतो का? कारण माझ्या शेतकऱ्यांची ती वृत्तीच नाही. घर सोडून फिरणारे हे मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्र संकटात सापडला आहे आणि मुख्यमंत्री बिहारला गेले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच अजित पवार हे कायम उप असतात. त्यांना अखंड उप भव हा आशीर्वाद दिला आहे, असा टोला ठाकरेंनी लगावला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यातील पाली येथेही शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला थेट आव्हान दिले. त्यांनी सरकारला 'दगाबाज' म्हणत, निवडणुकीत याच 'दग्याने' प्रत्युत्तर द्या, असा हल्लाबोल सरकारवर चढवला. शेतकरी गुन्हेगार नाही, तो अन्नदाता आहे, त्यामुळे त्याला 'माफी' नको, तर 'कर्जमुक्ती' हवी आहे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा व भूम तालुक्यांतील शेतकऱ्यांशीही संवाद साधला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray Criticizes Ajit Pawar, Attacks State Government on Farmer Issues.

Web Summary : Uddhav Thackeray slammed the state government for inadequate farmer compensation, demanding ₹50,000 per hectare. He mocked Deputy CM Ajit Pawar, wishing him 'eternal deputy status'. Thackeray also criticized the CM for neglecting Maharashtra's crisis while visiting Bihar.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारFarmerशेतकरीfarmingशेती