शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचे आमंत्रण उद्धव ठाकरे यांना द्यायला हवे; पण...: गोविंदगिरी महाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 17:17 IST

भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जवळपास १५०-२०० लोकांना निमंत्रण देण्याचे नियोजन

ठळक मुद्देपण कुणाला द्यायचं, नाही द्यायचं याची यादी तयार करण्याचं काम सुरू

पुणे : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, शिवसेनेच्या या भूमिकेला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस या मित्र पक्षांनी जोरदार विरोध केला आहे. पण असे असताना उध्दव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे की नाही यावरून बरीच चर्चा रंगली आहे. परंतु, एकीकडे यावरून राजकीय वातावरण तापलेले असताना उद्धव ठाकरे यांना या सोहळ्याचे निमंत्रण असावं असे मत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले आहे. तसेच भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला जवळपास १५०-२०० लोकांना निमंत्रण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पण कुणाला द्यायचं, नाही द्यायचं याची यादी तयार करण्याचं काम सुरू आहे असे सांगत त्यांनी आमंत्रणाचा सस्पेन्स कायम ठेवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या येत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गोविंदगिरी महाराज म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण असावं तसेच देशाच्या प्रत्येक मुख्यमंत्र्यालाया गौरवशाली सोहळ्याचे निमंत्रण दिलं गेलं पाहिजे. पण सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं तर ही सर्व मंडळी हेलिकॉप्टरने येतील.इतक्या मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर त्या कार्यक्रम स्थळी आली तर त्यांची व्यवस्था करणे शक्य होणार नाही..पण तरीही ज्यांना यायचं असेल त्यांचं स्वागत असेल त्यांनी अवश्य यावे. अयोध्येत उत्सव होत असताना सर्वच जण प्रत्यक्षात तिथे जाऊ शकणार नाहीत..अशा परिस्थितीत ज्यांना शक्य आहे त्या नागरीकांनी आपल्या घरात, गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पळून उत्सव साजरा करावा. 

..............................

अन् मोदी भूमिपूजनाला यायला तयार झाले..   कोरोनाचे संकट तर आहेच..पण काही कामांसाठी प्रत्यक्षात जावं लागते. त्यामुळे बंगालमध्ये चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये मोदी तिथे जाउ शकतात तर इथे यायला काय हरकत आहे असे मी त्यांना सांगितले होते..त्यामुळे मोदी भूमिपूजनाला यायला तयार झाले  असे गोविंदगिरी महाराज म्हणाले. 

अयोध्येतील राममंदिर हा फक्त मंदिर आणि एका वास्तूचा प्रश्न नाही तर स्वाभिमानाचा विषय आहे.कोरोनाच्या या परिस्थितीत देशातील लोकांचे मनोबल वाढले पाहिजे आणि मंदिरा या भूमीपूजनाच्या कार्यक्रमामुळे देशातील लोकांचं मनोबल नक्कीच वाढेल.औषधापेक्षा आत्मविश्वास या मंदिराच्या निर्माण होणार आहे.राष्ट्राचा मनोबल वाढवणारा आहे,हा सर्वात महत्वाचा उपाय आहे असेही मत गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले.  

टॅग्स :pune airportपुणे विमानतळUddhav Thackerayउद्धव ठाकरेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना