शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 06:26 IST

पालिका निवडणुकांसाठी बराच कालावधी असला तरी पक्ष बदल करून नवीन ठिकाणी मोर्चेबांधणीची तयारी करण्याच्या तयारीत अनेक जण असल्याची कुजबुज आहे.  

...वहीं से लाईन शुरू होती है

ठाणे जिल्ह्यात शिंदेसेना आणि भाजप यांच्यात शह-काटशहचे राजकारण सुरू आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी आपण पालघरसह ठाणे, नवी मुंबईत जनता दरबार घेणार, ही घोषणा केल्यानंतर ते जास्तच तापले आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी नाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईलाच निवडले. नाईक यांचे कट्टर विरोधक रमाकांत म्हात्रेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिंदेसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला नाईक यांच्याच ऐरोली मतदारसंघात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी ते म्हणाले, आपल्याला जनता दरबार भरवण्याची गरज नाही. क्योंकी हम जहाँ खडे हाेते है, वहीं से लाईन शुरू होती है.

रेल्वेला मराठीचे वावडे

डोंबिवली रेल्वे स्थानकात पादचारी पूल, स्वयंचलित जीने बसवण्याचे काम सुरू आहे. यासाठी एमआरव्हीसीने एक फ्लेक्स लावला. त्यात मराठी भाषेच्या शुद्धलेखनाचा ‘मेगाब्लॉक’ आहे. ‘शिड्या किंवा पायऱ्यांसाठी उत्तर दिशाची सिदिचा वापर करावा’, असे म्हटले आहे. ‘प्लॅटफॉर्म’ ऐवजी ‘प्लेटफार्म’ लिहिले आहे. डोंबिवली ही सुशिक्षितांची नगरी असल्याने रेल्वेने येथे फलक लावताना पुरेशी काळजी घ्यायला हवी होती, मात्र तसे न झाल्याने रेल्वे प्रशासनाला मराठीचे वावडे असल्याची चर्चा चाकरमान्यांमध्ये सुरू आहे. तो अशुद्धलेखनाचा नमुना असलेला फ्लेक्स व्हायरल झाला आहे.

निकालानंतर मन परिवर्तन..!

दिल्ली निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आगामी पालिका निवडणुकांवर होणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसला बसलेला फटका आणि भाजपची मुसंडी ही पालिका निवडणुकांची दिशा ठरवणारी मानली जात आहे. दिल्लीतील निकालानंतर उद्धवसेना आणि काँग्रेसमधील बऱ्याच नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत. पालिका निवडणुकांसाठी बराच कालावधी असला तरी पक्ष बदल करून नवीन ठिकाणी मोर्चेबांधणीची तयारी करण्याच्या तयारीत अनेक जण असल्याची कुजबुज आहे.  

सलमानने सांगितला ‘ब्रेकअप मंत्र’

सलमान खानचे सोमी अलीपासून ऐश्वर्या-कतरीनापर्यंत बऱ्याच जणींशी त्याचे नाव जोडले गेले. यात लुलीया वंतूरचाही समावेश आहे. सलमानने कधीच ब्रेकअपचे दु:ख बाळगले नाही. पुतण्या अरहानच्या पॅाडकास्टमध्ये त्याने ‘ब्रेकअप मंत्र’च सांगितला. तो म्हणाला, ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडला जाऊ द्यावे. ज्याप्रकारे बँडएड हळूहळू नव्हे, तर खेचून काढायचे असते, तसेच ब्रेकअपचे आहे. ब्रेकअपनंतर रुममध्ये जाऊन रडून प्रकरण संपवा. पुरुषांची चूक असल्यास त्यांनी माफी मागावी, असेही तो म्हणाला. ब्रेकअपनंतर जीवाचे बरे-वाईट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी सलमानचा मंत्र फायदेशीर ठरणारा असल्याची कुजबुज आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे