शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
2
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
3
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
4
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
5
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
6
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
7
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
8
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
9
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
10
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
11
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
12
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
13
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
14
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
15
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
16
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
17
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
18
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
19
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
20
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 06:26 IST

पालिका निवडणुकांसाठी बराच कालावधी असला तरी पक्ष बदल करून नवीन ठिकाणी मोर्चेबांधणीची तयारी करण्याच्या तयारीत अनेक जण असल्याची कुजबुज आहे.  

...वहीं से लाईन शुरू होती है

ठाणे जिल्ह्यात शिंदेसेना आणि भाजप यांच्यात शह-काटशहचे राजकारण सुरू आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी आपण पालघरसह ठाणे, नवी मुंबईत जनता दरबार घेणार, ही घोषणा केल्यानंतर ते जास्तच तापले आहे. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्यासाठी नाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या नवी मुंबईलाच निवडले. नाईक यांचे कट्टर विरोधक रमाकांत म्हात्रेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर शिंदेसेनेत प्रवेश केला. शिंदेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला नाईक यांच्याच ऐरोली मतदारसंघात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी ते म्हणाले, आपल्याला जनता दरबार भरवण्याची गरज नाही. क्योंकी हम जहाँ खडे हाेते है, वहीं से लाईन शुरू होती है.

रेल्वेला मराठीचे वावडे

डोंबिवली रेल्वे स्थानकात पादचारी पूल, स्वयंचलित जीने बसवण्याचे काम सुरू आहे. यासाठी एमआरव्हीसीने एक फ्लेक्स लावला. त्यात मराठी भाषेच्या शुद्धलेखनाचा ‘मेगाब्लॉक’ आहे. ‘शिड्या किंवा पायऱ्यांसाठी उत्तर दिशाची सिदिचा वापर करावा’, असे म्हटले आहे. ‘प्लॅटफॉर्म’ ऐवजी ‘प्लेटफार्म’ लिहिले आहे. डोंबिवली ही सुशिक्षितांची नगरी असल्याने रेल्वेने येथे फलक लावताना पुरेशी काळजी घ्यायला हवी होती, मात्र तसे न झाल्याने रेल्वे प्रशासनाला मराठीचे वावडे असल्याची चर्चा चाकरमान्यांमध्ये सुरू आहे. तो अशुद्धलेखनाचा नमुना असलेला फ्लेक्स व्हायरल झाला आहे.

निकालानंतर मन परिवर्तन..!

दिल्ली निवडणुकीच्या निकालाचा परिणाम आगामी पालिका निवडणुकांवर होणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसला बसलेला फटका आणि भाजपची मुसंडी ही पालिका निवडणुकांची दिशा ठरवणारी मानली जात आहे. दिल्लीतील निकालानंतर उद्धवसेना आणि काँग्रेसमधील बऱ्याच नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ वर्तवत आहेत. पालिका निवडणुकांसाठी बराच कालावधी असला तरी पक्ष बदल करून नवीन ठिकाणी मोर्चेबांधणीची तयारी करण्याच्या तयारीत अनेक जण असल्याची कुजबुज आहे.  

सलमानने सांगितला ‘ब्रेकअप मंत्र’

सलमान खानचे सोमी अलीपासून ऐश्वर्या-कतरीनापर्यंत बऱ्याच जणींशी त्याचे नाव जोडले गेले. यात लुलीया वंतूरचाही समावेश आहे. सलमानने कधीच ब्रेकअपचे दु:ख बाळगले नाही. पुतण्या अरहानच्या पॅाडकास्टमध्ये त्याने ‘ब्रेकअप मंत्र’च सांगितला. तो म्हणाला, ब्रेकअपनंतर गर्लफ्रेंडला जाऊ द्यावे. ज्याप्रकारे बँडएड हळूहळू नव्हे, तर खेचून काढायचे असते, तसेच ब्रेकअपचे आहे. ब्रेकअपनंतर रुममध्ये जाऊन रडून प्रकरण संपवा. पुरुषांची चूक असल्यास त्यांनी माफी मागावी, असेही तो म्हणाला. ब्रेकअपनंतर जीवाचे बरे-वाईट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी सलमानचा मंत्र फायदेशीर ठरणारा असल्याची कुजबुज आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025Uddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे