शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
7
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
8
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
9
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
10
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
11
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
12
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
13
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
14
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
15
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
17
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
18
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
19
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
20
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा

Uddhav Thackeray: चंद्रकांत पाटलांचा राजीनामा नको, हकालपट्टीच करावी, अन्यथा...; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 1:28 PM

भाजपा शिवसेनेवर अन्याय करत आहे, तो पहावला जात नाहीय म्हणून राजीनामा देणार आहे, असे नाटक मिंध्यांनी कल्याणमध्ये केले होते, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करून दिली.

बाबरी पाडण्यामध्ये बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनी यांचा सहभाग होता, शिवसेनेचा एकही कार्यकर्ता नव्हता असे वक्तव्य भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा दिला आहे. विषय गंभीर असून काल चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले आहेत, जेव्हा बाबरी पाडली तेव्हा सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते, असे प्रत्यूत्तर ठाकरे यांनी दिले आहे. 

चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी असा दावा केला, "६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने पाडली तेव्हा शिवसेनेचा एकही कार्यकर्ता घटनास्थळी उपस्थित नव्हता. मला अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने तीन-चार महिने तिथे ठेवले होते. ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल नेहमीच बोलत असतात, पण मनात खरचं प्रश्न पडतो की ते त्यावेळी अयोध्येतही होते का?" असा सवाल केला होता. 

यावरून राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा मिंधे जे तिथे बसले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. राजीनामा नकोच पाटलांची हकालपट्टी करावी, अशी मागणी ठाकरे यांनी केली.  

भाजपा शिवसेनेवर अन्याय करत आहे, तो पहावला जात नाहीय म्हणून राजीनामा देणार आहे, असे नाटक मिंध्यांनी कल्याणमध्ये केले होते. हेच लोक जर भाजपासोबत राहणार असतील तर त्यांनी शिवसेनेचे नाव घ्यायचे नाही, बाळासाहेबांचा फोटो लावायचा नाही, नाहीतर त्यांनी थेट राजीनामा द्यावा, असे आव्हान ठाकरे यांनी शिंदे यांना दिले आहे. 

राम मंदिरातचा निकाल कोर्टाने दिला, त्याचे श्रेय भाजपाने घेऊ नये. हे उंदीर आता बिळातून बाहेर पडत आहेत. स्वत: अडवाणी म्हणाले होते, बाबरी पाडणारे लोक मराठी बोलत होते, ते कोणाचे ऐकायला तयार नव्हते आणि आता पाटील म्हणतात की शिवसेना नव्हती. बाळासाहेबांनी देखील आम्हीच बाबरी पाडल्याचे म्हटले होते, असे प्रत्यूत्तर ठाकरे यांनी दिले आहे. 

बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाही. पाटील बोलले आहेत. श्रेयवादाचा प्रश्नच नाही. पाटलांची हकालपट्टी व्हायला हवी. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसत ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाहीए म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. यांचे गोमूत्र धारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातलाय त्यात आत अत्यंत विकृत चेहरा त्यांचा आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत ? की स्वतः च स्वतःला जोडे मारणार आहेत? असा सवालही ठाकरे यांनी केला.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेchandrakant patilचंद्रकांत पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेbabri masjidबाबरी मस्जिद