शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरेंना 'भारतरत्न' जाहीर करावं; उद्धव ठाकरे गटाची केंद्र सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 13:08 IST

इकडे येऊन भाषणात बाळासाहेब ठाकरेंबाबत आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही त्यांचा भारतरत्नने सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. 

मुंबई -  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विटरवर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली आहे. जर आपल्याला  बाळासाहेब ठाकरेंचा खरंच सन्मान करायचा असेल तर येत्या २६ जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न जाहीर करावं. ही महाराष्ट्रातील आणि देशातील हिंदुंची मागणी आहे ती मान्य करावी अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी खासदार अरविंद सावंत आणि नेते दिवाकर रावतेही उपस्थित होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की,  देशातील लोकमान्य नेते असलेले बाळासाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. २०२६ मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होईल. बाळासाहेब ठाकरे असे नेते होते जे ५० वर्ष कुठल्याही संविधानिक, सत्तेच्या पदावर बसले नाही तरीही त्यांनी जनतेवर अधिराज्य केले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी यांच्यानंतर इतके यशस्वी नेते बाळासाहेब ठाकरे होते. बाळासाहेब ठाकरेंनी महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या स्वाभिमानाची लढाई लढली. हिंदूवर हल्ले सुरू झाले तेव्हा ते हिंदूंसाठीही उभे राहिले. आज अयोध्येत राम मंदिर उभं राहिले आहे ते बनवण्यात आणि त्यामागच्या आंदोलनात बाळासाहेब ठाकरेंचं योगदान सर्वोच्च आहे. आज बाळासाहेब ठाकरे नाहीत, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी कधी स्वत:साठी काही मागितले नाही. मात्र राज्यातील, देशातील आणि जगभरातील हिंदुंची मागणी आहे. बाळासाहेब ठाकरे यांना देशातील सर्वोच्च सन्मान मिळाला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

तसेच हा केंद्राचा विषय आहे, एखाद्या राज्याने भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करू शकतात पण भारतरत्न, पद्म पुरस्कार देण्याचा अधिकार पंतप्रधान आणि गृह मंत्रालयाचा असतो. आतापर्यंतची यादी पाहिली तर अनेकांना शिफारस देण्याची गरज भासली नाही. एपीजे अब्दुल कलाम, सर्वपल्ली राधाकृष्ण, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी.व्ही नरसिम्हराव, पंडित नेहरू, स्वामीनाथन, लता मंगेशकर, भीमसेन जोशी, एनटीआर यांना कुठल्या राज्याने शिफारस केली नाही. भारतरत्नसाठी कुणीही शिफारस करत नाही. हा केंद्र सरकारचा निर्णय असतो. त्यासाठी केंद्रीय समिती किंवा गृह मंत्रालय, पंतप्रधान कार्यालाय यांच्या अख्यात्यारित्य विषय आहे. त्यामुळे नुसते ट्विट करण्यापेक्षा, इकडे येऊन भाषणात बाळासाहेब ठाकरेंबाबत आम्हाला ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही त्यांचा भारतरत्नने सन्मान करावा ही आमची साधी नम्र विनंती आहे असा खोचक सल्ला संजय राऊत यांनी भाजपाला दिला आहे. 

दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा ही आम्ही वारंवार सभागृहात आणि बाहेरही मागणी केली. या सगळ्यांचे वीर सावरकरांवरील प्रेम ढोंगी आहे. या लोकांचे हिंदुत्व ढोंगी आहे. हिंदुत्वासाठी २ नेत्यांनीच सर्वोच्च बलिदान दिले ते स्वातंत्र्यवीर सावरकर, बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकरांचा सन्मान द्यावा. वीर सावरकरांचा विचार बाळासाहेब ठाकरेंनी पुढे नेले. मात्र या २ हिंदुहृदयसम्राटांना उपेक्षित ठेवण्याचं काम स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सरकारने केले आहे असा आरोप संजय राऊतांनी केला. 

टॅग्स :Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाAmit Shahअमित शाहSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा