शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

देवेंद्र फडणवीसांपेक्षा शाह-शिंदेंची जवळीक का वाढली?; संजय राऊतांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 11:23 IST

देशाच्या पंतप्रधानांना दोनच कामे आहेत. जेव्हा त्यांना भरपूर वेळ असतो तेव्हा ते विदेशात असतात आणि विदेशात नसतात तेव्हा ते देशात प्रचारात गुंतलेले असतात अशी टीका राऊतांनी मोदींवर केली. 

मुंबई - घटनाबाह्य सरकारचा महायुती जो प्रकार आहे त्यांच्यात कधीही आलबेल नव्हतं. फक्त शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस तोडायची, फोडायची आणि महाराष्ट्र कमजोर करायचा यासाठी हे अघटित सरकार बनवलं गेले. या तिन्ही पक्षांत पहिल्या दिवसांपासून हाणामाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांना कुणीही विचारत नाही असं सांगत शाह आणि शिंदे यांच्याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाहांचा पूर्ण ताबा घेतला आहे. पूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसचे एस के पाटील हे नेते होते. मुंबईतून सगळ्यात जास्त पैसा ते दिल्लीला द्यायचे अशी त्यांची खाती होती. त्या सगळ्यांचा रेकॉर्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडला हे दिसते. त्यामुळे अमित शाह फडणवीसांपेक्षा सध्याच्या मुख्यमंत्र्‍यांच्या प्रेमात पडलेले दिसतात. परंतु हे प्रेम नसून अफेअर आहे लक्षात घ्या, ते कधीही तुटू शकते असा दावा राऊतांनी केला आहे.

तसेच सत्ताधारी पक्षच निवडणूक आयोग चालवतो, तेच तारखा ठरवतात. हरयाणासोबत महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणं अपेक्षित होते. परंतु सत्ताधाऱ्यांना सोयीचं नसल्याने, त्याशिवाय पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रात प्रचाराला वेळ नसल्यामुळे भाजपाच्या सूचनेनुसार या निवडणुका पुढे ढकलल्या असतील. देशाच्या पंतप्रधानांना दोनच कामे आहेत. जेव्हा त्यांना भरपूर वेळ असतो तेव्हा ते विदेशात असतात आणि विदेशात नसतात तेव्हा ते देशात प्रचारात गुंतलेले असतात. २-४ दिवसांत आचारसंहिता लागणार असेल असं सत्ताधारी सांगत असेल तर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू. आमची निवडणुकीची तयारी पूर्ण झालीय असा टोला संजय राऊतांनी भाजपाला लगावला. 

दरम्यान, हे सगळे खादाड सरकार आहेत. ४० टक्के कमिशन खातात, कमिशनबाजीमुळे या लोकांचे आपापसात पटत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्‍यांना इतर राज्यातील निवडणुकीचाही खर्च करण्याची जबाबदारी आहे. हरयाणातील भाजपाचा निवडणूक खर्च इथल्या मुख्यमंत्र्‍यांनी केला आहे. किती हजार कोटी इतके पैसे कुठून आले, पुढे इतर राज्यात होणाऱ्या निवडणुकीसाठीही मुख्यमंत्र्‍यांना पैसे द्यायचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात लूटच लूट सुरू आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेAmit Shahअमित शाहBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस