शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

"उठसूठ मी हिंदू, मी हिंदू म्हणत रस्त्यावर नाचायचं..."; संजय राऊत कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 16:29 IST

आदित्य ठाकरे मुंबई, महाराष्ट्रात कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

अहमदनगर - आम्हाला राजकीय विरोध होतोय. हिंदुत्व नकली आहे असा आरोप आमच्यावर करतात. तुम्ही हिंदुत्वासाठी काय करताय? हिंदुत्व दाखवण्याची गोष्ट नसते. हिंदुत्व हा आपला संस्कार, संस्कृती, जगण्यातील भावना आहे. उठसूठ मी हिंदू, मी हिंदू म्हणत रस्त्यावर नाचायचं, मशिदीवर दगडे मारायची, मुस्लिमांविरोधात बोलायचे याला हिंदुत्व मानायला बाळासाहेब ठाकरे कधीच तयार नव्हते असं विधान उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

खा. संजय राऊत म्हणाले की, आमच्या हिंदुत्वाचा आधार सावरकर आहेत. जगभरात प्रत्येकाचा विचार असतो. ज्यांची विचारांचा पाया दिला त्यांचेही पुतळे लोकांनी पाडले होते. जगातील कामगारांनी एक व्हा या क्रांतीला बळ दिले असेल तर लेनिन मार्क्स यांनी. महाराष्ट्राच्या असंख्य चळवळीत डाव्या विचारांचे लोक होते. कॉ. डांगे, जॉर्ड फर्नाडिंस, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कम्युनिस्टांचा सहभाग होता असं राऊत यांनी सांगितले. 

तसेच पक्ष कोणाचा हे जनता ठरवेल. निवडणूक आयोग नाही. ही शिवसेना लोकांनी निर्माण केली आणि शिवसेनाप्रमुखपद जनतेने दिलेय हे बाळासाहेब ठाकरे नेहमी बोलायचे. निवडणूक आयोगाला विचारून शिवसेना स्थापन केली नव्हती. बाळासाहेब ठाकरे महापुरुष आहे हे नक्कीच आहे. आम्ही लोकांमध्ये असतो. लोकं निवडणुकीची वाट बघतायेत. खरोखर यांच्यात हिंमत असेल आणि स्वत:ला मर्द समजत असतील तर निवडणूक घ्या असं आव्हान खासदार संजय राऊत यांनी भाजपा-शिवसेनेला दिले. 

दरम्यान, आदित्य ठाकरे मुंबई, महाराष्ट्रात कुठेही उभे राहिले तरी निवडून येतील. मी ठाण्यात उभा राहीन असं ते म्हणालेत. ही लढाई आमच्यासाठी प्रेरणादायी असेल. ज्याने बेईमानांचे नेतृत्व केले अशा माणसांविरोधात ठामपणे आमचा नेता लढण्यासाठी उभा आहे. यातून महाराष्ट्राला, शिवसेनेला आणि तरुण पिढीला बळ मिळेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

काँग्रेसची ताकद वाढली पाहिजेकाँग्रेस हा स्वतंत्र पक्ष आहे. काँग्रेस एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. काँग्रेसची ताकद देशात वाढली पाहिजे. १०० पेक्षा जास्त जागा काँग्रेस जिंकत नाही तोवर परिवर्तन शक्य नाही. अनेक राज्यात काँग्रेसला विरोधाची स्पेस द्यायला तयार नाही. काँग्रेस कमकुवत होतेय. भाजपाला कमकुवत करून काँग्रेस टिकायला हवी. राष्ट्रीय स्तरावर काम करणारा कुठला तरी एक पक्ष हवा असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतHindutvaहिंदुत्वBJPभाजपा