शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

उद्धव ठाकरेंनी दिलं होतं भाजपासोबत जाण्याचं आश्वासन; शिंदे गटाचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 11:22 IST

२१ जूनच्या बैठकीबाबत मला गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर सांगितले. परंतु ती बैठक कशाबाबत होती हे सांगितले नाही असं सामंत यांनी म्हटलं.

नागपूर - आमदार अपात्रतेप्रकरणी विधान भवनात अध्यक्षांकडे सुनावणी पार पडत आहे. यावेळी उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होतानाच एकनाथ शिंदेंसमोर अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी भाजपासोबत सरकार स्थापनेचे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला. 

उदय सामंत यांची ठाकरे गटाच्या वकिलांकडून उलटतपासणी सुरू आहे. त्यात वकील कामत यांनी सामंतांना प्रश्न विचारला की, तुम्ही प्रतिज्ञापत्रात दिल्यानुसार, निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने केल्या महाविकास आघाडीमुळे नाराज होता हे खरे की खोटे? यावर सामंत यांनी होय मी नाराज होतो, मी आणि माझ्या सहकारी आमदारांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदेंना विनंती केली होती. त्यानंतर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी भेट घेऊन आमदारांचे म्हणणं त्यांच्यासमोर मांडले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. पक्ष संघटनेतील बहुतांश ज्यात लोकप्रतिनिधीही आहेत त्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला होता असं त्यांनी म्हटलं. 

तसेच २१ जूनच्या बैठकीबाबत मला गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर सांगितले. परंतु ती बैठक कशाबाबत होती हे सांगितले नाही. मी या बैठकीला उपस्थित होतो. परंतु त्या दिवशी आणि त्यानंतरही मला कोणताही व्हिप देण्यात आला नाही. मी तो स्वीकारला नाही आणि कुठल्याही कागदावर माझी सही नाही. व्हिप हा सभागृहातील कामकाजासाठी किंवा मतदानासाठी असतो अशी मला माहिती आहे. माझ्या हातात जे पत्र दिले त्यावर माझी सही नाही असंही उदय सामंत यांनी सांगितले. 

दरम्यान, मी चार वेळा विधानसभेचा सदस्य राहिलो आहे. २ वेळा राष्ट्रवादी आणि २ वेळा शिवसेना.२०१४ वेळी सर्वच पक्ष निवडणूक स्वबळावर लढवत होते.शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती होती. २०१९ मध्ये याच युतीने निवडणुकीला सामोरे गेलो. ज्यावेळी आम्ही वेगळे लढलो तेव्हा ते का झाले हे मलादेखील माहिती नाही. मी गुवाहाटीला कधी गेलो याबाबत निश्चित तारीख आठवत नाही. २४ किंवा २५ जूनला गेलो असेन. ज्यावेळी मी मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्याआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही उद्धव ठाकरेंना भेटलो. तेव्हा जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीत लढलो भविष्यात तशीच कार्यवाही होईल. काही काळानंतर तुमची मागणी मान्य केली जाईल. भाजपासोबत सरकार स्थापन करू असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली असं सामंत यांनी म्हटलं.  

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा