शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

उद्धव ठाकरेंनी दिलं होतं भाजपासोबत जाण्याचं आश्वासन; शिंदे गटाचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2023 11:22 IST

२१ जूनच्या बैठकीबाबत मला गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर सांगितले. परंतु ती बैठक कशाबाबत होती हे सांगितले नाही असं सामंत यांनी म्हटलं.

नागपूर - आमदार अपात्रतेप्रकरणी विधान भवनात अध्यक्षांकडे सुनावणी पार पडत आहे. यावेळी उदय सामंत यांनी गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होतानाच एकनाथ शिंदेंसमोर अनेक आमदारांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी भाजपासोबत सरकार स्थापनेचे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिल्याचा गौप्यस्फोट उदय सामंत यांनी केला. 

उदय सामंत यांची ठाकरे गटाच्या वकिलांकडून उलटतपासणी सुरू आहे. त्यात वकील कामत यांनी सामंतांना प्रश्न विचारला की, तुम्ही प्रतिज्ञापत्रात दिल्यानुसार, निकालानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने केल्या महाविकास आघाडीमुळे नाराज होता हे खरे की खोटे? यावर सामंत यांनी होय मी नाराज होतो, मी आणि माझ्या सहकारी आमदारांनी गटनेते म्हणून एकनाथ शिंदेंना विनंती केली होती. त्यानंतर शिंदे यांनी उद्धव ठाकरेंशी भेट घेऊन आमदारांचे म्हणणं त्यांच्यासमोर मांडले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. पक्ष संघटनेतील बहुतांश ज्यात लोकप्रतिनिधीही आहेत त्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला होता असं त्यांनी म्हटलं. 

तसेच २१ जूनच्या बैठकीबाबत मला गुलाबराव पाटील यांनी वर्षा बंगल्यावर गेल्यानंतर सांगितले. परंतु ती बैठक कशाबाबत होती हे सांगितले नाही. मी या बैठकीला उपस्थित होतो. परंतु त्या दिवशी आणि त्यानंतरही मला कोणताही व्हिप देण्यात आला नाही. मी तो स्वीकारला नाही आणि कुठल्याही कागदावर माझी सही नाही. व्हिप हा सभागृहातील कामकाजासाठी किंवा मतदानासाठी असतो अशी मला माहिती आहे. माझ्या हातात जे पत्र दिले त्यावर माझी सही नाही असंही उदय सामंत यांनी सांगितले. 

दरम्यान, मी चार वेळा विधानसभेचा सदस्य राहिलो आहे. २ वेळा राष्ट्रवादी आणि २ वेळा शिवसेना.२०१४ वेळी सर्वच पक्ष निवडणूक स्वबळावर लढवत होते.शिवसेना-भाजपा ही नैसर्गिक युती होती. २०१९ मध्ये याच युतीने निवडणुकीला सामोरे गेलो. ज्यावेळी आम्ही वेगळे लढलो तेव्हा ते का झाले हे मलादेखील माहिती नाही. मी गुवाहाटीला कधी गेलो याबाबत निश्चित तारीख आठवत नाही. २४ किंवा २५ जूनला गेलो असेन. ज्यावेळी मी मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्याआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आम्ही उद्धव ठाकरेंना भेटलो. तेव्हा जी निवडणूक आपण नैसर्गिक युतीत लढलो भविष्यात तशीच कार्यवाही होईल. काही काळानंतर तुमची मागणी मान्य केली जाईल. भाजपासोबत सरकार स्थापन करू असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही मंत्रिपदाची शपथ घेतली असं सामंत यांनी म्हटलं.  

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा