शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

बऱ्याच वर्षांनी NDA नावाचा अमिबा जिवंत आहे हे कळलं; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 07:54 IST

मणिपूरमध्ये महिला अत्याचाराची दुसरी घटना समोर आली. महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड काढून अत्याचार केले. त्याची चीड बाळगा अशी टीका उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.

मुंबई - बऱ्याच वर्षांनंतर या देशात 'एनडीए' नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची 'इंडिया' नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी. त्याच दिवशी आपल्या पंतप्रधानांनी छत्तीस पक्षांची जेवणावळ यातली. खरं म्हणजे छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीय. त्यांच्या 'एनडीए'मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावला आहे.

उद्धव ठाकरे मुलाखतीत म्हणाले की, राज्यपाल नावाचं एक पद असतं, त्या पदावर केंद्राच्या अखत्यारीतून राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून एक व्यक्ती बसवली जाते. पण मणिपूरला राज्यपाल आहेत का? मणिपूरच्या राज्यपाल महिला, देशाच्या राष्ट्रपती महिला अशा देशात महिलांवर आपत्ती का येते? महिला म्हणून देशात जे चाललंय त्यावर राष्ट्रपती काय भूमिका घेणार? आपल्या देशाचा उल्लेख भारतमाता करतो त्या मातेचा अपमान आणि असे धिंडवडे निघत असतील तर काय करत आहात? असा सवालही त्यांनी विचारला.

त्याचसोबत मणिपूरमध्ये महिला अत्याचाराची दुसरी घटना समोर आली. महिलेची विवस्त्रावस्थेत धिंड काढून अत्याचार केले. त्याची चीड बाळगा, या घटनेचा तिथल्या तिथेच रोखठोक समाचार घ्यायला हवा होता पण तो घेतला गेला नाही हे दुर्दैव म्हणायचं. एवढे होऊनही आपले पंतप्रधान तिकडे जायला तयार नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने ताकीद दिल्यावर ३६ सेकंदच बोलले आणि राजस्थानला प्रचारासाठी निघून गेले. गेले २-३ महिने हिंसाचार चालूच आहे. ज्या महिलेवर अत्याचार झाला ती कारगिल जवानाची पत्नी होती हे तर जास्तच भयंकर आहे असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

शिवसेना नाव पुन्हा मिळेल

धनुष्यबाण आणि मशाल या माझ्यासाठी नंतर आलेल्या गोष्टी आहेत. पहिली आली ती शिवसेना. ते नाव फार महत्त्वाचे आहे. जे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीही सांगितलेले आहे की, शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी म्हणजे माझ्या आजोबांनी दिलेले आहे. मी वारंवार हे सांगतोय, निवडणूक आयोगाचे काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचे आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचे नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयत गेलोय. आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती  त्या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यामुळेच शिवसेना हे नाव पुन्हा आपल्याला मिळेल असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. शिवसेना पॉडकास्टमध्ये खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा