शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द समजतात, पण…’’ भास्कर जाधवांच्या टीकेनंतर नितेश राणेंचं जहरी प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 15:56 IST

Nitesh Rane: कुडाळमध्ये वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ झालेल्या विराट मोर्चानंतर भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आता नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

मुंबई - दिवाळी तोंडावर आली असताना कोकणामध्ये पुन्हा एकदा राणे कुटुंबीय आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांची धुळवड सुरू झाली असून, राजकीय शिमगा होण्याची चिन्हे दिसू लागली आहे. आज कुडाळमध्ये वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ झालेल्या विराट मोर्चानंतर भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आता नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. बाळासाहेबांसारखा थेट हल्ला कऱण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्यांना अशी भटकी कुत्री सोंगाडे लागतात, असे नितेश राणे म्हणाले. 

भास्कर जाधव यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, भास्कर जाधव आमच्यावर भुंकण्याचं काम करून गेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बघतोय की, उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द म्हणवातात. मात्र बाळासाहेबांसारखा थेट हल्ला कऱण्याची हिंमत उद्धव ठाकरेंमध्ये नाही. त्यांना अशी भटकी कुत्री, सोंगाडे लागतात. जे येऊन राणेंवर प्रहार करणार. भाजपावर आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेवर प्रहार करणार आणि उद्धव ठाकरे मातोश्रीवर बसून मजा करणार, असा टोला नितेश राणे यांनी लगावला.

यावेळी त्यांनी भास्कर जाधव यांच्यावरही जोरदार टीका केली. भास्कर जाधव म्हणतात की मी शिक्षकाचा मुलगा आहे. मात्र मला वाटत नाही की, शिक्षकाचा मुलगा हा एवढा वात्रट निघेल, कार्टा निघेल. नेमका शिक्षक असलेल्या वडिलांनी काय संस्कार केलेले आहे. ते खरंच शिक्षकाचा मुलगा आहेत की चिपळूणच्या कचऱ्यातून उचलला आहे, संशोधनाचा विषय आहे, असे नितेश राणे म्हणाले. 

महाराष्ट्राच्या जनतेला आता कळलं असेल की, नेमकं उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाने आईसक्रिमचा कोन चिन्ह म्हणू का दिलं. उद्धव ठाकरेंमध्ये रग नाही हिंमत नाही. उद्धव ठाकरे एकदम थंड माणूस आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून आइस-क्रिमचा कोन दिला असेल. आता आदित ठाकरे आणि आईसक्रिमचा कोन यांचा काय संबंध हे डिनो मोरियाला विचारलं तर आदित्य ठाकरेंना आईसक्रीमचे कोन किती आवडतात हे तो तुम्हाला निश्चितपणे सांगेल. हे दोघेही रिझवी कॉलेजमागे बसून आईसक्रिमचे कोन खायचे, असो, असे नितेश राणे म्हणाले. 

दरम्यान, वैभव नाईक यांच्या एसीबी चौकशीवरूनही नितेश राणे यांनी मोठा दावा केला. ते म्हणाले की, एसीबीची चौकशी का झाली हा मूळ मुद्दा आहे. चोऱ्यामाऱ्या करायच्या वैभव नाईकांनी,भ्रष्टाचार करायचा वैभव नाईकांनी आणि ही भटकी कुत्री आमच्यावर भुंकत बसणार. त्यापैक्षा वैभव नाईक यांनी त्यांच्या मालमत्तेची माहिती दिली पाहिजे. २००९ ते २०१९ पर्यंत संपत्ती का वाढली याची माहिती दिली पाहिजे. एसीबीविरोधात मोर्चा निघालाय, मग त्याची माहिती कुडाळ-मालवणच्या जनतेला दिली पाहिजे होती. एसीबीला दिली पाहिजे होती. त्यापेक्षा या सर्व सोंगाड्यांनी नंगानाच केला.

या संपूर्ण प्रकरणातील मूळ तक्रारदार प्रदीप भालेकर हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. तसेच तो विनायक राऊत यांचा माणूस आहे. वसईतील त्यांचं घर हे विनायक राऊत यांनीच दिलं आहे. काल त्यांचा एक व्हिडीओ आला होता की, ही तक्रार २०२१ मध्ये दिली होती, मग २०२२ मध्ये मी मागे घेतली. मात्र मूळ तक्रार तुमचीच आहे ना, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे BJPभाजपाBhaskar Jadhavभास्कर जाधवUddhav Thackerayउद्धव ठाकरे